शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शिंदेंसह सर्व समर्थक गुवाहाटीलाच का गेले? अन्य भाजपशासित राज्यामध्ये का नाही? हे आहे कारण…

जून 23, 2022 | 11:23 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
guwahati e1656000310476

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या महाराष्ट्रातील राजकारणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. सेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नाहीत. शिंदे यांच्या समर्थकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण, सर्वांना प्रश्न हाच पडला आहे की, शिंदेसह  समर्थक आमदार सर्वप्रथम सूरत येथे जमले. त्यानंतर हे सर्व जण आसाममधील थेट गुवाहाटी येथे गेले. या सर्व प्रकाराला भाजपचे समर्थन असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, गुवाहाटीचीच निवड का करण्यात आली. भाजपशासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वा अन्य राज्यांचा पर्याय का निवडण्यात आला नाही. यासंदर्भातील एक वेगळी खेळी सध्या समोर येत आहे.

भाजप हे महाराष्ट्राबाहेर गुजरात येथेच सर्व राजकीय नियोजन करणार होते. त्यानंतर महाराष्ट्रात येऊन सत्ता हस्तगत करण्याचा भाजप आणि शिवसेनेतील बंडखोर नेत्यांसह आमदारांचा डाव होता. मात्र त्यामध्ये अचानक बदल करावा लागला. याला कारण म्हणजे महाराष्ट्रातील कार्यकर्ते व जनतेमध्ये निर्माण झालेली भावना तसेच त्याचा परिणाम गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीवर होऊ नये. यासाठी गुजरातमधून सर्व आमदारांना तातडीने आसाम मधील गुवाहाटी येथे हलविण्यात आले.

महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजप पुरस्कृत सरकार स्थापण्याच्या खेळीसाठी भाजपने खरे तर गुजरातची निवड केली होती. गुजरातमधूनच महाराष्ट्रातील नव्या सरकारची मुहूर्तमेढ करण्याचा डाव होता. मात्र ऐनवेळी बदललेल्या राजकीय घटनांमुळे विरोधकांकडून नवी खेळी खेळली जाण्याची शक्यता ल७ात घेत आणि सर्व प्रकारची खबरदारी घेत गुवाहाटीचा पर्याय निवडण्यात आला.

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या मतमोजणीत सर्वच राजकीय पक्ष दंग असताना शिंदे हे आपल्या समर्थकांसह गुजरातच्या दिशेने रवाना झाले. या आमदारांच्या सोयीसुविधेसाठी गुजरातमधील भाजपचे नेते तसेच पोलीस प्रशासन यापूर्वीच सक्रिय झाले होते. गुजरातमध्ये प्रवेश करताच बलसाड येथे या आमदारांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर या सर्व आमदार व मंत्र्यांनी सुरत येथील हॉटेल गाठले आणि तेथेच मुक्काम ठोकला.

या हॉटेलमध्ये सर्व डावपेच ठरले आणि त्यानंतर गुजरातमधील भाजपचे नेते दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. सूरत येथून या सर्व आमदारांना गुजरातमधील आनंद, अहमदाबाद किंवा गांधीनगर या तीन ठिकाणी हलविण्याचे नियोजन होते. त्यासाठी आनंद व अहमदाबाद येथे हॉटेल आणि रिसोर्टचे बुकिंगही करण्यात आले होते. याचठिकाणी दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व आमदारांना आणण्यात येणार होते. तेथेच सर्व जुळवाजुळव करून त्यानंतर नवीन सरकार स्थापन करण्याचा अखेरचा डाव टाकण्यात येणार होता.

सूरतच्या हॉटेलमध्ये एका आमदाराची तब्येत बिघडली तर एका आमदाराने महाराष्ट्राचा रस्ता धरला. तसेच, आमदाराच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिल्याने महाराष्ट्र पोलिस सूरतमध्ये येण्याचीही चिन्हे होती. या सर्व बाबीचा विचार करण्यात आला. येत्या काही महिन्यातच होऊ घातलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीवर राजकीय परिणाम होऊ नये, शिवाय महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे खापर भाजपच्या सत्ता असलेल्या गुजरातवर येऊ नये, यासाठी आमदारांना गुवाहाटीत हलविण्यात आले. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश हे भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या जवळ आहे. त्यामुळे थेट ईशान्येतील आसामची निवड करण्यात आली. आता तेथे सर्व आमदार सुरक्षित राहू शकतात. तसेच, आमदारांचे पलायनही होऊ शकणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.

why guwahati city chosen for rebel sena mla Maharashtra political crisis

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदेंकडे आहेत केवळ हे ३ पर्याय; कुठलाही एक निवडावाच लागणार

Next Post

शिवसेनेमध्ये फूट पडण्यास मिलिंद नार्वेकरही कारणीभूत? कोण आहेत ते?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
milind narvekar

शिवसेनेमध्ये फूट पडण्यास मिलिंद नार्वेकरही कारणीभूत? कोण आहेत ते?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011