शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांनी एवढा त्याग का केला? शिंदेंना मुख्यमंत्री का केले? ही आहेत कारणं…

by Gautam Sancheti
जून 30, 2022 | 5:53 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
fadanvis shinde

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस हे विराजमान होतील, अशी दाट शक्यता असताना फडणवीस यांनीच मोठा धक्का संपूर्ण महाराष्ट्राला दिला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांनी थेट एकनाथ शिंदेंचे नाव घोषित केले. याद्वारे नव्या सरकारमध्ये फडणवीस हे किंग नव्हे तर चक्क किंगमेकर असतील, असे स्पष्ट केले आहे. फडणवीसांच्या या निर्णयामुळे राजकीय पंडितांनाही धक्का बसला आहे.

दुपटीपेक्षा जास्त जागा (१२० आमदार) असूनही भाजपने शिंदे यांच्याकडे म्हणजेच अपक्षांसह सुमारे ५० आमदार असलेल्या व्यक्तीकडे सत्ता सोपवली आहे. असे काही होईल, याचे भाकीत कोणीही केले नव्हते. पण ते आज घडले आहे. फडणवीस हे ड्रायव्हिंग सीटवर बसण्याऐवजी त्यांनी शिंदे यांना पुढे का केले, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्याची काही कारणे आपण जाणून घेऊ…

खुद्द एकनाथ शिंदे यांनी भाजप आणि फडणवीस यांच्या त्यागाचे कौतुक करत आजच्या काळात तसे घडेल असे वाटत नसल्याचे सांगितले. संपूर्ण देशासाठी हे एक मोठे उदाहरण आहे. शिंदे म्हणाले की, आज भाजप आणि फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सैनिकाला पाठिंबा दिला आहे, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अध्यक्ष जेपी नड्डाजी यांचे आभार मानतो. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, कारण ते स्वतः हे पद भूषवू शकले असते. हे या राज्यात नव्हे तर देशातील उदाहरण असेल. आजच्या काळात असे कोणी करू शकेल असे मला वाटत नाही. भाजपने जो विश्वास व्यक्त केला आहे, तो पूर्ण करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.

असा आहे प्लॅन
मुळात देवेंद्र फडणवीस यांचा हा मोठा गेमप्लॅन आहे. ‘साप भी मार जाये और लाठी भी ना तोटे’ अशा प्रकारची रणनिती फडणवीस यांची आहे. हा जुगार खेळून भाजपने २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंच्या ‘विश्वासघाताचा’ बदला घेतला आहे, तेव्हा शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवून सूड उगवला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. अजित पवारांना फोडल्यानंतर फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, पण बहुमत सिद्ध करू न शकल्याने त्यांना २४ तासांतच खुर्चीवरून पायउतार व्हावे लागले. तो बदला फडणवीस यांनी ठाकरे यांचे सरकार पाडून साधला आहे. मात्र या सत्तापालटानंतर फडणवीस यांना मुख्यमंत्री न करून भाजपने सत्तेच्या लालसेपोटी उद्धव यांचे सरकार पाडले गेले नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवसेनेच्या ३९ आमदारांची शिंदेंसोबत बंडखोरी झाल्यापासून या संपूर्ण घटनेत उद्धव ठाकरेंच्या छावणीत सातत्याने भाजपला खलनायक म्हणून मांडण्याचा प्रयत्न सुरू होता. सत्तेच्या लालसेपोटी भाजपने त्यांच्यावर बंडखोरी आणि घोडेबाजार केल्याचा आरोप सुरू केला होता. भाजपने हे सर्व कथन क्षणार्धात उद्ध्वस्त केले आहे. या सर्व प्रकरणात भाजप कुठेही नव्हते, असा स्पष्ट संदेश दिला आहे.

नंतर मोठी झेप
फडणवीस यांनी काही पावले मागे घेत मोठी झेप घेतल्याचेही राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. या वाटचालीतून जनतेला संदेश देण्याचा प्रयत्न केला जाईल की, त्यांनी शिवसेनेचे सरकार पाडले नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या शिवसैनिकाला साथ दिली. शिवाय, उद्धव गटाची हकालपट्टीही योग्य पद्धतीने करण्यात आली आहे. आता उद्धव यांचा गटही कदाचित नव्या सत्तेत सहभागी होऊ शकतो. हिंदुत्वाच्या अजेंड्यापासून उद्धव हे विचलित झाल्याचा संदेश पसरविण्यातही फडणवीस यांना आता यश येत आहे. त्याचा फायदा पुढील निवडणुकीत भाजपला मिळू शकतो, असे मानले जात आहे.

Why Fadanvis declare Eknath Shinde as a CM Politics Plan

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘फडणवीसांनी मनाचा मोठे पणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं’- एकनाथ शिंदे

Next Post

नाशिक – जिल्हयात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime11
क्राईम डायरी

डिजीटल अ‍ॅरेस्टचा बहाणा नाशिकच्या सेवानिवृत्तास सव्वा २१ लाख रूपयाला गंडा

सप्टेंबर 12, 2025
Untitled 13
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये शिवसेना मनसे तर्फे जन आक्रोश मोर्चा…खा. संजय राऊत, बाळा नांदगावकरही झाले सामील

सप्टेंबर 12, 2025
kangana
संमिश्र वार्ता

अभिनेत्री कंगना राणौतने सर्वोच्च न्यायालयातील दाखल केलेली याचिका घेतली मागे…हे आहे कारण

सप्टेंबर 12, 2025
Untitled 12
संमिश्र वार्ता

मेरे पास बंगला है, गाडी है, पैसा है, शोहरत है, तुम्हारे पास क्या है?….मेरे पास तेरे जैसे चार…नर्तकी पूजा गायकवाडचा व्हिडिओ व्हायरल

सप्टेंबर 12, 2025
GST 4
महत्त्वाच्या बातम्या

७.५६ कोटी रुपयांची करचोरी…मुंबईत केपी क्रिएशन वर्ल्डचे अंकित गांधी यांना अटक

सप्टेंबर 12, 2025
cbi
संमिश्र वार्ता

१२१ कोटी रुपयांची बँक फसवणूक….सीबीआयने खाजगी कंपनीच्या संचालकांविरुद्ध केला गुन्हा दाखल

सप्टेंबर 12, 2025
accident 11
क्राईम डायरी

भरधाव अ‍ॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत ७४ वर्षीय पादचारी वृध्द ठार…देवळाली गावातील घटना

सप्टेंबर 12, 2025
image001NMQN
महत्त्वाच्या बातम्या

रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तींना २५ हजाराचे बक्षीस तर जखमींना १.५ लाखाचा विमा

सप्टेंबर 12, 2025
Next Post
carona 11

नाशिक - जिल्हयात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011