बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गेल्या काही निवडणुकांमधील भाजप पराभवाचे हे आहे मुख्य कारण

by Gautam Sancheti
मे 4, 2021 | 12:35 am
in महत्त्वाच्या बातम्या
0

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
प्रचंड बहुमताने तिसर्यांदा ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांच्या या जादुई करिश्म्याच्या कारणांचा शेध घेतला तर अनेक कारणे समोर येतात. परंतु २०१४ नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केले तर एक मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. तो म्हणजे अस्मितेचा मुद्दा. हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या रणनीतीला निस्तेज करत आहे. २०१५ मध्ये बिहार आणि मागील विधानसभा निवडणुकीत झारखंडमध्ये याच अस्मितेच्या मुद्द्यावर भाजप पराभूत झाला होता. अस्मितेच्या मुद्द्यावरच गुजरातमध्ये मोदी यांना मागील निवडणुकीत विजय मिळाला होता.
गेल्या सात वर्षांमध्ये जितक्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या, त्यामध्ये भाजपचा अधिक ठिकाणी विजय झाला. ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला, तिथे अस्मितेचा मुद्दा होता. या मुद्द्याच्याच आधारावर प्रादेशिक पक्षांनी भाजपला धोबीपछाड दिला आहे. बंगालमधील संपूर्ण निवडणुकीवर नजर टाकल्यास एक गोष्ट महत्त्वाची निदर्शनास आली.
तृणमूल काँग्रेसने बंगाली अस्मितेवरून पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि भाजपच्या इतर नेत्यांना घेरले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एका प्रचारसभेत कविगुरू रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्मस्थानाचे चुकीचे नाव घेतले होते. या मुद्द्याला तृणमूल काँग्रेसने लगेच पकडले. ज्या लोकांना कविगुरू रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्मस्थाळाबाबत ज्या लोकांना माहिती नाही, असे लोक सोनार बांगला बनविण्याच्या गोष्टी करत आहेत, ही बाब तृणमूलच्या नेत्यांनी संपूर्ण प्रचारात सांगितली.
संपूर्ण प्रचारात ममता बॅनर्जींसह तृणमूलचे सर्व नेते हीच गोष्ट सांगत आले की, मोदी आणि शहा दोघेही गुजराती आहेत आणि गुजराती लोकांना बंगालमध्ये कधीच राज्य करू देणार नाही. भाजपने सुवेंदू अधिकारी, मुकूल रॉय, मिथून चक्रवर्तींसह काही नेत्यांना पुढे करून अस्मितेच्या मुद्दयाला दाबण्याचा प्रयत्न भाजपने केला. परंतु जनतेने त्याला स्वीकारले नाही.
२०१४ नंतर भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच समोर करून विधानसभा निवडणुका लढवत आहे. त्यात त्यांना काही ठिकाणी विजयही मिळाला. परंतु ज्या नेत्यांनी मोदी-शहा यांच्यासमोर अस्मितेचा मुद्दा ठेवला तिथे भाजपचा पराभव झाला आहे.
प्रशांत किशोर यांचे अस्त्र
बिहारमध्ये २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी नितीश कुमार यांच्या डीएनएवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी नितीश कुमार यांचे निवडणूक प्रचाराचे व्यवस्थापन सांभाळणार्या प्रशांत किशोर यांनी उत्तरादाखल संपूर्ण बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचा (जेडीयू) प्रचार करून एक संदेश देण्याचा प्रयत्न केला की, गुजरातमधून आलेले लोक बिहारी डीएनएवर प्रश्न उपस्थित करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला परंतु अखेर भाजपला निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सरकारी विभागांमध्ये बंपर नोकऱ्या; त्वरित करा अर्ज

Next Post

अभिनेता नकुल मेहताच्या पत्नीने शेअर केले बाळंतपणावेळचे फोटो

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना व्यवसायात लाभाचे संकेत, जाणून घ्या, गुरुवार, २८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 27, 2025
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणरायाची भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा 1024x682 1
राष्ट्रीय

दिल्लीत महाराष्ट्र सदनात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाची प्राणप्रतिष्ठा

ऑगस्ट 27, 2025
Screenshot 20250827 184001 Dailyhunt
महत्त्वाच्या बातम्या

उध्दव ठाकरे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी…बाप्पाचे घेतले दर्शन

ऑगस्ट 27, 2025
2 1 1 1024x681 1
संमिश्र वार्ता

कृषी क्षेत्रात ‘एआय’ वापरासाठी या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये मिळणार…

ऑगस्ट 27, 2025
539613361 1218995730272784 914712606899021038 n
स्थानिक बातम्या

मुंबई येथे नाशिकच्या उद्योजकांच्या संघटनेसोबत वीज दराबाबत महत्त्वपूर्ण बैठक….ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले हे निर्देश

ऑगस्ट 27, 2025
accident 11
क्राईम डायरी

देवदर्शनासाठी रस्त्याने पायी जाणा-या महिलेस दुचाकीची धडक…उपचारादरम्यान मृत्यू

ऑगस्ट 27, 2025
facebook insta
क्राईम डायरी

फेसबुकवरील फ्रेण्ड रिक्वेस्ट स्विकारणे महिलेस पडले महागात…सव्वा सोळा लाखाला गंडा

ऑगस्ट 27, 2025
GzWXER0a4AICfsU scaled e1756290053297
महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणेशाचे आगमन…बाप्पाला घातले हे साकडे (बघा, व्हिडिओ)

ऑगस्ट 27, 2025
Next Post
Capture

अभिनेता नकुल मेहताच्या पत्नीने शेअर केले बाळंतपणावेळचे फोटो

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011