शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बहुमत चाचणीत नेमकी कशी होते? सर्व प्रक्रीया कशी पार पडते? शिंदे गटाचे काय?

जून 29, 2022 | 11:01 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
vidhansabha

 

मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
राज्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय अस्थिरतेला आता आणखी वेगळे व गंभीर वळण मिळाले आहे. कारण भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यपालांनी महा विकास आघाडी सरकारला उद्या म्हणजे गुरूवार, दि. ३० विशेष अधिवेशन घेऊन बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. ही बहुमत चाचणी कशी असते? सर्व प्रक्रिया कशी पार पडते? शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे गटाची भूमिका काय असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्या सर्वांची उत्तरे आपण जाणून घेऊया…

राज्यपालांनी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे आदेश विधीमंडळ सचिवांना दिले आहेत. सायंकाळी पाच पर्यंत बहुमत चाचणी घ्यावी. त्यात आवाजी मतदान घेऊ नये. प्रत्येक आमदारांचे मतदान घ्यावे व त्याची मोजणी करावी. विधानसभा बरखास्त करण्याचा प्रयत्न करू नये, असे देखील राज्यपालांनी बजावले आहे.

शिवसेनेच्या बंडखोर गटाने सरकार अल्पमतात असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करावे लागेल. परंतु नेमकी बहुमत चाचणी कशी होते? त्यासाठी किती संख्याबळ आवश्यक असते? शिंदे गट गैरहजर राहिला तर काय होऊ शकते? शिंदे गट सभागृहात उपस्थित राहून तटस्थ राहिला तर काय? क्रॉस व्होटिंग केली तर काय होऊ शकते? सरकारला बहुमत सिद्ध करता आलं नाही तर सरकार कोसळणार का? विरोधकांची भूमिका काय असेल? असे अनेक प्रश्न या सर्वांच्या मनात सध्या आहेत.

बहुमत चाचणी किंवा फ्लोअर टेस्ट म्हणजे विद्यमान सरकारकडे बहुमताचा आकडा आहे की नाही हे ठरविण्यात येते. यात निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपल्या मताद्वारे सरकारचे भवितव्य ठरवतात. विधानसभेत ही बहुमत चाचणी होते. बहुमत चाचणी ही पारदर्शक प्रक्रिया आहे. त्यात राज्यपालांचा हस्तक्षेप नसतो. विधानसभेत आमदारांना व्यक्तिश: उपस्थित राहावे लागते. तसेच सर्वांच्या समोर मतदान करावं लागतं. त्यांनी विधानसभेत उपस्थित राहावे म्हणून पक्षाचा व्हीप काढला जातो. विशेष म्हणजे बहुमत चाचणीत राज्यपालांचा कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो. बहुमत चाचणी घेण्याचा राज्यपाल केवळ आदेश देतात. बहुमत चाचणी पार पाडण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांची असते. विधानसभा अध्यक्ष नसतील तर हंगामी किंवा प्रभारी विधानसभा अध्यक्ष हे कार्य पार पाडत असतो.

विधानसभेत मतदान होण्याच्या आधी आवाजी मतदान घेतलं जाते. त्यानंतर कोरम बेल वाजवली जाते. त्यानंतर आमदार सभागृहातील होय आणि नाहीच्या बाजूने मतदान करतात. त्यानंतर आमदारांची गणना केली जाते. त्यानंतर स्पीकर निकाल जाहीर करतात. अविश्वासाचा प्रस्ताव आणला जातो. तेव्हा बहुमत चाचणीतूनच सरकारच्या भवितव्याचा फैसला होतो.

महत्त्वाचे म्हणजे व्हीप हा पक्षादेश असतो. तो पाळणे आमदारांना बंधनकाकर असते. व्हीप काढण्यात आला तरी मतदान करायचे की नाही हा निर्णय आमदारांचा असतो. पण पक्षाच्या आदेशानुसार मतदान केले नाही तर व्हीपचे उल्लंघन केले म्हणून आमदारांचे निलंबन करण्यात येते.

आता शिंदे गट जर बहुमत चाचणीवेळी हजर राहिला नाही तर बहुमता अभावी ठाकरे सरकार कोसळेल. मात्र, त्यापूर्वी शिवसेनेकडून त्यांना व्हीप जारी केला जाईल. पण पक्षाचा व्हीप पाळला नाही म्हणून गैरहजर राहणाऱ्या आमदारांचं निलंबन केल्या जाईल.

विधानसभेची एकूण आमदार संख्या २८८ इतकी आहे. परिणामी बहुमतचा जादूई आकडा १४५ इतका आहे. म्हणजेच १४५ किंवा त्यापेक्षा अधिक संख्या सत्ताधारी सरकारला दाखवावी लागेल. म्हणजेच, एवढ्या संख्येने आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान करायला हवे.

एकनाथ शिंदे गटामध्ये ४६ आमदार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळेच आता बहुमत चाचणी झाल्यास ठाकरे सरकारला १४५ आमदारांचा किंवा त्यावेळी जेवढे आमदार सभागृहामध्ये उपस्थित असतील त्यापैकी ५० टक्के आमदारांचा पाठिंबा मिळवणे आवश्यक असणार आहे. त्यात सध्याचे पक्षीय बलाबल असे आहे : शिवसेना- १६ राष्ट्रवादी ५४, काँग्रेस – ४४, बंडखोर शिंदे गट -५१ आणि भाजप-१०६ तसेच भाजप समर्थक सहा अपक्ष -६ तर इतर-११. ही सर्व गणती बघितली तर असे लक्षात येते की भाजपकडे १२६ हे संख्याबळ आहे तर महाविकास आघाडीकडे ११३.

What is Floor Test all procedure Maharashtra Political Crisis

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यपालांनी बोलवले विधीमंडळाचे विशेष अधिवेशन; ठाकरे सरकारची अग्नीपरीक्षा उद्याच

Next Post

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा यापूर्वीच द्यायला हवा होता का? शरद पवारांचे ऐकायला हवे होते की नाही?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
uddhav thackeray sharad pawar.1jpg

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा यापूर्वीच द्यायला हवा होता का? शरद पवारांचे ऐकायला हवे होते की नाही?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011