कोची – विवाह झालेल्या नवदांपत्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वर-वधूंना वैयक्तिक उपस्थित न राहतासुद्धा विवाह नोंदणी करता येऊ शकते, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने विशेष विवाह अधिनियमअंतर्गत सुनावणीदरम्यान दिले आहेत. या प्रकरणी दोन्ही पक्षकारांच्या लोकांची ओळख पटवणे आव्हान होते. परंतु आता पर्याय म्हणून फेशिअल रिकॉग्निशन आणि बायोमीट्रिकसारखे तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायमूर्ती मोहम्मद मुश्ताक आणि कौसर एडप्पागठ यांच्या खंडपीठाने या संबंधित पक्षकारांची ओळख पटविण्यासाठी फेशिअल रिकॉग्निशन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर केंद्र सरकारकडून धोरणात्मक निर्देश घ्यावे, असे केंद्राच्या महाधिवक्त्यांना सांगितले. खंडपीठाच्या एकल पीठाचे न्यायमूर्ती पी. बी. सुरेश कुमार म्हणाले, की विवाह नोंदणी करताना वर आणि वधूने वैयक्तिक उपस्थित राहणे गरजेचे नाही. दोन्ही अधिकारी उभयंताची ओळख सुनिश्चित करण्याच्या परिस्थितीत असणे आवश्यक आहेत. ही प्रक्रिया ऑनलाइन करण्याबाबत विचार करण्याची गरज आहे.
परदेशात राहणा-या दांपत्याची समस्या
विवाह नोंदणीदरम्यान वर-वधूंना अधिकार्यांच्या समोर उपस्थित राहणे गरजेचे आहे. कोणत्याही एका पक्षाचा व्यक्ती विवाह नोंदणी अधिकारी क्षेत्रिय रहिवासी राहणे आवश्यक आहे. त्यामुळे परदेशात राहणा-या दांपत्याची विवाह नोंदणी केली जाऊ शकत नाही, असा दावा सरकारने एकल पीठाच्या सुनावणीत केला.