बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

श्री विष्णु पुराण… ५० बायका आणि १५० पुत्र असलेल्या सौभरी ॠषींची विवाह कथा…

by Gautam Sancheti
ऑगस्ट 20, 2023 | 5:06 am
in इतर
0
bhagwan vishnu

अधिक मास विशेष-३५
श्री विष्णु पुराण अंश-४ (भाग -२ )
५० बायका आणि १५० पुत्र असलेल्या
सौभरी ॠषींची विवाह कथा

त्याच काळात बऱ्हाच सौभरी नावाचा एक ऋषी बारा वर्षांपर्यंत पाण्यातच रहात होता. त्याच पाण्यामध्ये सम्मद नावाचा एक अति विशाल असा मासा तिथेच होता. त्या माशाचा परिवार फार मोठा होता. त्याचे पुत्र, कन्या, नातू, पणतू वगैरेंच्या सहित क्रीडा करीत मोठ्या आनंदात तो रहात असे. त्यांच्या लीला पाहताना सौभरी मुनींना भान रहात नसे व तोदेखील समाधी सोडून तासंतास बघत राही. त्याला त्यांचे मोठे आकर्षण वाटे.
त्याचा परिणाम असा झाला की, सौभरीच्या मनात प्रपंचाविषयी तीव्र आसक्ती उत्पन्न झाली; मग तो उठून पाण्यातून उठून बाहेर आला आणि मान्धात्यापाशी गेला. राजाने त्याचे स्वागत करून आगमनाचा हेतू विचारला असता तो म्हणाला की, त्याला गृहस्थाश्रम करावयाचा आहे तरी राजाने आपली एक कन्या द्यावी. “तुझ्या वंशातील पुरुष दानी म्हणून विख्यात आहेत तरी तू आपल्या पन्नास कन्यांतील एखादी मला दे.”

vijay golesar
विजय गोळेसर मो. ९४२२७६५२२७

तेव्हा राजाने त्यांचे तपाने वाळलेला व जराजर्जर असा देह पाहिला व तो काहीच न बोलता मुकाट्याने मान खाली करून बसून राहिला. सौभरीने पुन्हा विचारले तेव्हा राजाने मनात असा विचार केला की, याचे रूप पाहिल्यावर प्रौढ स्त्रियाही मान फिरवतील. तरुणी तर नाकारतील “महाराज!
यात काही शंकाच नाही; मग तो उघडपणे म्हणाला आमच्या घराण्यात अशी रीत आहे की, कन्या स्वत: ज्याला पसंत करते त्यालाच ती दिली जाते. तरी मी काय करावे ते तुम्हीच सुचवा.’
सौभरीने राजाचा डाव ओळखला व तो एवढेच म्हणाला की, “काही हरकत नाही. मी एकदा अंतःपुरातून फिरून येतो. जर कुठल्याही कन्येला मी आवडलो नाही तर मी माघारी परतून जाईन.”

तेव्हा राजाने एक सेवक सोबत देऊन सौभरी मुनीला अंत:पुरात पाठविले. तिथे प्रवेश करतेवेळी सौभरीने योगाच्या सामथ्याने आपले स्वरूप देवादिकांपेक्षाही तेजस्वी बनविले व आत प्रवेश केला. सेवकाने राजकन्यांना सांगितले की, राजाने यांना कोणतीही एक कन्या देण्याचे ठरविले आहे. तरी कुणा एकीने यांना पसंत करावे. तेव्हा ऋषीचे दिव्य स्वरूप पाहताच सर्व जणींना तो आवडला आणि ‘मीच यांच्याशी लग्न करणार’ असे म्हणत त्या भांडू लागल्या.
हा वृत्तान्त सेवकाकडून समजला तेव्हा राजाचा नाइलाज झाला; मग त्याने त्या सर्वजणींचा विवाह सौभरीशी मोठ्या थाटामाटाने लावून दिला. जेव्हा त्या बायकांसह ऋषी परतला तेव्हा त्याने विश्वकर्म्याला सांगून पन्नास दालने असलेला सुखसोयींनी युक्त असा महाल बनवून घेतला व तो तिथे राहू लागला. योगसामर्थ्याने तो एकाच वेळी सर्व जणींशी रममाण होत असे.

पुढे एकदा राजा सहज कन्यांना भेटावयास गेला तेव्हा त्यांच्याकडून त्याला समजले की, त्या सगळ्या जणी परमसुखात आहेत. तेव्हा राजा सौभरीला भेटला व त्याचा पाहुणचार घेऊन माघारी गेला.
नंतर त्या सर्वजणींना मिळून दीडशे पुत्र झाले. सौभरीसुद्धा त्यांच्या बाललीला पहात आनंदीत होई; मग तो त्यांच्या मोठेपणाची, विवाहांची, नातवंडाची स्वप्ने पहात राही. अशी कितीतरी वर्षे उलटली.
पण पुढे तो भानावर आला व मनाच्या मोहाने आपण केवढी तपश्चर्या व्यर्थ दवडली याचा त्याला पश्चात्ताप झाला आणि सर्व प्रपंच पुत्रांच्या हवाली करून, सर्व बायकांना सोबत घेऊन वनात निघून गेला. पुढे पुन्हा तपस्या करून तो मोक्षाप्रत गेला. असे हे सौभरीचे परम पावन चरित्र जो कुणी ऐकेल, शिकेल, शिकवील, स्मरण करील, लिहिल, लिहवून घेईल व दुसऱ्यांना ऐकवील तो सहा जन्मांपर्यंत सर्व शुभ फळे प्राप्त करील.

मान्धात्याचा वंशविस्तार – त्रिशंकू व सगर यांची कथा
आता मांधात्याचा वंशविस्तार कसा होत गेला ते ऐका. मांधात्याचा पुत्र अंबरीष आणि त्याचा युवनाश्च होता. युवनाश्वाचा हारीत व त्याचे हारीतगण होते. पूर्वी रसातळात रहाणाऱ्या सहा कोटी गंधर्वांनी तिथल्या सर्व नागांची संपत्ती व अधिकार हिरावून घेतले.
तेव्हा सर्व नागप्रमुखांनी परमात्म्याची करुणा भाकली असता देव त्यांना म्हणाला की, “युवनाश्वाच्या पुरुकुत्स नावाच्या पुत्राच्या अंगात संचार करून मी त्या दुष्ट गंधर्वांचा नायनाट करीन.”
असे ऐकल्यावर सर्व नागप्रमुख माघारी परतले आणि त्यांनी नर्मदेला पाठवून पुरुकुत्साला बोलावणे पाठविले. त्याप्रमाणे पुरुकुत्साने येऊन सर्व गंधर्वांना मारून टाकले व तो परतून गेला, तेव्हा सर्व नागांनी नर्मदेला असा वर दिला की, जो कुणी तुझे स्मरण करून तुझे नाव उच्चारील त्याला केव्हाही सर्पविषाची बाधा होणार नाही. तो श्लोक असा आहे.
‘नर्मदायै नमो प्रातर्नर्मदायै नमो निशि
नमोऽस्तु नर्मदे तुभ्यं रक्ष मां विषसर्पतः।।’
या मंत्राचे उच्चारण करण्याने सर्प दंश करीत नाही व अन्नातील विषसुद्धा बाधत नाही. पुरुकुत्साने समस्त नागांना असा वर दिला की नागांचा वंश कधीही खंडित होणार नाही. पुढे नर्मदेला पुरुकुत्सापासून त्रसदस्यु नावाचा पुत्र झाला.

या त्रसदस्युचा अनरण्य त्याचा पृषदूश्व त्याचा हर्यश्च – त्याचा हस्त त्याचा सुमना त्याचा त्रिधन्वा त्याचा त्रैयारुणि व त्याचा सत्यव्रत नावाच पुत्र होता, तो पुढे त्रिशंकू या नावाने ओळखला गेला. नंतर तो त्रिशंकू चांडाळ बनला.
एकदा असे झाले की, बारा वर्षांपर्यंत पाऊसच न पडल्याने दुष्काळ पसरला. तेव्हा विश्वामित्र मुनी व त्यांच्या परिवाराच्या पोषणासाठी त्रिशंकू दररोज एका वडाच्या झाडाला हरिणाचे मांस टांगून ठेवीत असे. ते त्याचे कृत्य पाहून संतुष्ट झालेल्या मुनी विश्वामित्रांनी त्याला सदेह (मानवी शरीरासह) स्वर्गात पाठविला.


श्री विष्णु पुराण अंश-४ भाग -२ ( क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल- ९४२२७६५२२७

vishnu puran saubhari rishi wedding story by vijay golesar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्री शिवलीलामृत अध्याय तिसरा… गोकर्ण महाबळेश्वरचे काय महत्त्व आहे? व्हिडिओ

Next Post

भारत : एक दर्शन (भाग ९)…. ‘कर्मयोगिन्’चे कार्य

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

भूमित्र या चॅटबॉट सेवेचे उद्घाटन 3
संमिश्र वार्ता

महसूल विभागाने ‘महाभूमी’ संकेतस्थळावर ‘भूमित्र’ या चॅटबॉट सेवेची केली सुरुवात

ऑगस्ट 27, 2025
Milind Kadam M4B
संमिश्र वार्ता

मुंबई येथून रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी प्रवासी जलवाहतूक सेवा…इतक्या तासाचा असेल प्रवास

ऑगस्ट 27, 2025
Sadan Ganesh 1 11 913x420 1
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाचा जल्लोष; आज ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा

ऑगस्ट 27, 2025
ajit pawar e1706197298508 1024x770 1
महत्त्वाच्या बातम्या

लंडनमधील ‘महाराष्ट्र भवन’ साठी ५ कोटींचा निधी….उपमुख्यमंत्री अजित पवार

ऑगस्ट 27, 2025
ganeshotsav 1 e1738348574343
मुख्य बातमी

यंदा बाप्पा वाजत गाजत येणार… अशी करा श्रीगणेशाची स्थापना… असा आहे मुहूर्त…

ऑगस्ट 27, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना जुने मित्र भेटेल, जाणून घ्या, बुधवार, २७ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 26, 2025
IMG 20250826 WA0402
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्हा परिषद विकास निर्देशांकात राज्यात प्रथम…मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गौरव

ऑगस्ट 26, 2025
Untitled 44
संमिश्र वार्ता

३० महिला शेतकऱ्यांनी उच्च दर्जाची हिरवी मिरची पिकवून तब्बल ४० मेट्रिक टन उत्पादनची दुबईला केली निर्यात

ऑगस्ट 26, 2025
Next Post
bharatmata

भारत : एक दर्शन (भाग ९).... 'कर्मयोगिन्'चे कार्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011