शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

न्यायालयीन प्रक्रियेत कामाची गती वाढली पाहिजे; अ‍ॅड. नितीन ठाकरे (बघा पूर्ण व्हिडीओ)

मे 31, 2022 | 1:00 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220531 WA0156

 

नाशिक: न्यायालयीन प्रक्रियेत कामाची गती वाढावी, विलंब होऊ नये यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. लोकअदालत हा त्यातलाच एक प्रकार. पण केसेसची संख्या खूप असते आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयात अनेक जागा रिक्त आहेत त्यामुळे बऱ्याचदा कामांना विलंब होतो, पण यावर उपाय शोधणं गरजेचे आहे, असे मत नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले.

इंडिया दर्पण फेसबुक लाइव्हमध्ये ते बोलत होते. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. नितीन ठाकरे हे तिसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. या आधीच्या कामाचा आढावा घेताना ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून नाशिक न्यायालयाच्या जागेच्या विस्तारीकरणाचा मुद्दा चर्चेत होता. नवीन जागेच काम आता सुरू झाले आहे. शासनाच्या प्रस्तावानुसार आताच्या जागेपासून १० किमी अंतरावर मेरी म्हसरूळ जवळ २५ एकर जागा शासन देत होते पण न्यायालयाच्या आसपास १ किमी अंतरावर अनेक वकिलांचे ऑफिसेस आहेत त्याची किंमत शून्य झाली असती. त्यामुळे आम्हाला आहे त्या जागेत जास्त जागा हवी होती आणि त्यात आम्ही यशस्वी झालो, असे त्यांनी सांगितले.

बार असोसिएशनविषयी ते म्हणाले की, ज्याप्रमाणे डॉक्टरांची, कामगारांची संघटना असते त्याप्रमाणे वकिलांसाठी कार्यरत असणारी ही संघटना आहे. न्यायालयीन प्रकियेत वकिलांना येणाऱ्या अडचणी, न्यायाधीश आणि वकील यांच्यामध्ये समन्वय साधणे अशा विविध समस्यांवर संघटना काम करते. सद्यस्थितीत वकिलांच्या समस्यांविषयी त्यांनी सांगितले की, सध्या वकिलांना बसण्यासाठी जागा उपलब्ध नाही. एकाच आवारात वकिलांना काम करावे लागते. त्यामुळे नवीन इमारतीत वकिलांना जागा कशी उपलब्ध करून देता येईल याचा आम्ही प्रामुख्याने विचार केला आहे. नवोदित वकिलांसाठीही जागा उपलब्ध करण्यात येणार आहे.

विधी शिक्षण मातृभाषेतून सुरू करावे अशी मागणी मध्यंतरी जोर धरत होती त्याविषयी ते म्हणाले की, वकील झाल्यावर तुम्ही महाराष्ट्रातच काम कराल अस होत नाही. तुम्ही गुजरात, हैदराबाद अशा विविध ठिकाणी गेलात तर मराठी किंवा मातृभाषेतून काम करताना अडचणी येतात. आज न्यायालयीन कामकाज हे इंग्रजीतून सगळीकडे चालते. कायद्याची पुस्तके इंग्रजीतच उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत मराठीत कसे शिकवावे हा प्रश्न आहे. आजकाल जिल्हा किंवा तालुका स्तरावर बरच कामकाज हे मराठीत होते पण अजूनही उच्च न्यायालयात इंग्रजी भाषा वापरली जाते. त्यात बदल करायचा असेल तर घटनादुरुस्तीत बदल करावा लागेल. कलम ३४८ मध्ये बदल करून राज्य सरकारकडून ते केंद्र सरकारकडे पाठवावे लागेल, त्यावर राष्ट्रपतींनी मान्यता दिली तर कामकाजाची भाषा बदलता येते. सध्या राजस्थानमध्ये हा बदल करण्यात आला आहे.

वकिली क्षेत्रात संयम खूप महत्त्वाचा आहे. सुरुवातीची ३ ते ४ वर्षे संघर्ष करावा लागतो. तुम्ही लगेच आर्थिक दृष्ट्या स्थिर होत नाही. या काळात सिनिअर वकिलांकडे काम केले पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे. शिक्षण घेतलं आणि वकिली करायला सुरुवात केली अस या क्षेत्रात होत नाही. व्यावहारिक शिक्षण, अनुभव गरजेचा आहे. आज न्यायालय आणि लॉ कॉलेज यांची चांगल्या पद्धतीने सांगड घातली आहे. शिकत असताना त्यांना प्रॅक्टिकल अनुभवासाठी कोर्टात हजर राहणे आवश्यक असते. एखादी केस कशी लढायची, कोणते प्रश्न विचारायचे, कोणते प्रश्न विचारायचे नाही या गोष्टी हळूहळू अनुभवातून शिकणे आवश्यक आहे, असा सल्ला त्यांनी नवोदितांना दिला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मालेगावच्या नर्सिंग कॉलेजमध्ये पकडले इंडियन कोब्रा जातीचे दोन साप (बघा थरारक व्हिडीओ)

Next Post

मनमाड जवळच्या पानेवाडी येथील ऑइल कंपन्यासमोर पेट्रोल पंप चालकांचे आंदोलन (बघा व्हिडीओ )

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
IMG 20220531 WA0165 e1653983069389

मनमाड जवळच्या पानेवाडी येथील ऑइल कंपन्यासमोर पेट्रोल पंप चालकांचे आंदोलन (बघा व्हिडीओ )

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011