रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

न्यायालयीन प्रक्रियेत कामाची गती वाढली पाहिजे; अ‍ॅड. नितीन ठाकरे (बघा पूर्ण व्हिडीओ)

by Gautam Sancheti
मे 31, 2022 | 1:00 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220531 WA0156

 

नाशिक: न्यायालयीन प्रक्रियेत कामाची गती वाढावी, विलंब होऊ नये यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. लोकअदालत हा त्यातलाच एक प्रकार. पण केसेसची संख्या खूप असते आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयात अनेक जागा रिक्त आहेत त्यामुळे बऱ्याचदा कामांना विलंब होतो, पण यावर उपाय शोधणं गरजेचे आहे, असे मत नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले.

इंडिया दर्पण फेसबुक लाइव्हमध्ये ते बोलत होते. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. नितीन ठाकरे हे तिसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. या आधीच्या कामाचा आढावा घेताना ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून नाशिक न्यायालयाच्या जागेच्या विस्तारीकरणाचा मुद्दा चर्चेत होता. नवीन जागेच काम आता सुरू झाले आहे. शासनाच्या प्रस्तावानुसार आताच्या जागेपासून १० किमी अंतरावर मेरी म्हसरूळ जवळ २५ एकर जागा शासन देत होते पण न्यायालयाच्या आसपास १ किमी अंतरावर अनेक वकिलांचे ऑफिसेस आहेत त्याची किंमत शून्य झाली असती. त्यामुळे आम्हाला आहे त्या जागेत जास्त जागा हवी होती आणि त्यात आम्ही यशस्वी झालो, असे त्यांनी सांगितले.

बार असोसिएशनविषयी ते म्हणाले की, ज्याप्रमाणे डॉक्टरांची, कामगारांची संघटना असते त्याप्रमाणे वकिलांसाठी कार्यरत असणारी ही संघटना आहे. न्यायालयीन प्रकियेत वकिलांना येणाऱ्या अडचणी, न्यायाधीश आणि वकील यांच्यामध्ये समन्वय साधणे अशा विविध समस्यांवर संघटना काम करते. सद्यस्थितीत वकिलांच्या समस्यांविषयी त्यांनी सांगितले की, सध्या वकिलांना बसण्यासाठी जागा उपलब्ध नाही. एकाच आवारात वकिलांना काम करावे लागते. त्यामुळे नवीन इमारतीत वकिलांना जागा कशी उपलब्ध करून देता येईल याचा आम्ही प्रामुख्याने विचार केला आहे. नवोदित वकिलांसाठीही जागा उपलब्ध करण्यात येणार आहे.

विधी शिक्षण मातृभाषेतून सुरू करावे अशी मागणी मध्यंतरी जोर धरत होती त्याविषयी ते म्हणाले की, वकील झाल्यावर तुम्ही महाराष्ट्रातच काम कराल अस होत नाही. तुम्ही गुजरात, हैदराबाद अशा विविध ठिकाणी गेलात तर मराठी किंवा मातृभाषेतून काम करताना अडचणी येतात. आज न्यायालयीन कामकाज हे इंग्रजीतून सगळीकडे चालते. कायद्याची पुस्तके इंग्रजीतच उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत मराठीत कसे शिकवावे हा प्रश्न आहे. आजकाल जिल्हा किंवा तालुका स्तरावर बरच कामकाज हे मराठीत होते पण अजूनही उच्च न्यायालयात इंग्रजी भाषा वापरली जाते. त्यात बदल करायचा असेल तर घटनादुरुस्तीत बदल करावा लागेल. कलम ३४८ मध्ये बदल करून राज्य सरकारकडून ते केंद्र सरकारकडे पाठवावे लागेल, त्यावर राष्ट्रपतींनी मान्यता दिली तर कामकाजाची भाषा बदलता येते. सध्या राजस्थानमध्ये हा बदल करण्यात आला आहे.

वकिली क्षेत्रात संयम खूप महत्त्वाचा आहे. सुरुवातीची ३ ते ४ वर्षे संघर्ष करावा लागतो. तुम्ही लगेच आर्थिक दृष्ट्या स्थिर होत नाही. या काळात सिनिअर वकिलांकडे काम केले पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे. शिक्षण घेतलं आणि वकिली करायला सुरुवात केली अस या क्षेत्रात होत नाही. व्यावहारिक शिक्षण, अनुभव गरजेचा आहे. आज न्यायालय आणि लॉ कॉलेज यांची चांगल्या पद्धतीने सांगड घातली आहे. शिकत असताना त्यांना प्रॅक्टिकल अनुभवासाठी कोर्टात हजर राहणे आवश्यक असते. एखादी केस कशी लढायची, कोणते प्रश्न विचारायचे, कोणते प्रश्न विचारायचे नाही या गोष्टी हळूहळू अनुभवातून शिकणे आवश्यक आहे, असा सल्ला त्यांनी नवोदितांना दिला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मालेगावच्या नर्सिंग कॉलेजमध्ये पकडले इंडियन कोब्रा जातीचे दोन साप (बघा थरारक व्हिडीओ)

Next Post

मनमाड जवळच्या पानेवाडी येथील ऑइल कंपन्यासमोर पेट्रोल पंप चालकांचे आंदोलन (बघा व्हिडीओ )

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

modi 111
राष्ट्रीय

पंतप्रधानाच्या हस्ते मणिपूरमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन…

सप्टेंबर 14, 2025
भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा1 971x420 1
संमिश्र वार्ता

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संरक्षण उत्पादन उद्योगासाठी सहाय्यभूत ठरेल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 14, 2025
Kia Range 1
संमिश्र वार्ता

किया इंडियाची घोषणा…ग्राहकांना मिळणार १.७५ लाख रूपयांपर्यंत हा फायदा

सप्टेंबर 14, 2025
crime1
क्राईम डायरी

पत्ता विचारण्याचा बहाणा करुन महिलेची अशी केली फसवणूक…पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सप्टेंबर 14, 2025
rain1
महत्त्वाच्या बातम्या

या दोन दिवसात महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 14, 2025
IMG 20250913 WA0446
महत्त्वाच्या बातम्या

अपघाती मृत्यू प्रकरणी वारसांना एक कोटींची भरपाई… लोकन्यायालयामध्ये प्रकरण निकाली

सप्टेंबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
Next Post
IMG 20220531 WA0165 e1653983069389

मनमाड जवळच्या पानेवाडी येथील ऑइल कंपन्यासमोर पेट्रोल पंप चालकांचे आंदोलन (बघा व्हिडीओ )

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011