विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
भारतीय क्रिकेट संघातील नेतृत्त्वात पुढील काही दिवसांत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कारण संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरात आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी -२० विश्वचषकानंतर पायउतार होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर रोहित शर्माला कर्णधाराचे स्थान देण्याची अपेक्षा आहे.
या संदर्भात सूत्रांनी माहिती देताना सांगितले की, सध्या सर्व प्रकारच्या सामान्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( वय ३२ ) असून भारताचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे, कोहलीने गेल्या काही महिन्यांपासून उपकर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाशी या विषयावर दीर्घ चर्चा केली आहे. तीनही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाचा दबाव कोहलीच्या फलंदाजीवर परिणाम करत आहे.
कोहली यांच्या मतानुसार, त्याच्या फलंदाजीला सर्व स्वरूपांमध्ये अधिक वेळ आणि अधिक वेग आवश्यक आहे. त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे याची जाणीव आहे. त्याला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हटले जाते कारण त्याला फलंदाजीबद्दल खूप माहिती आहे. आता २०२२ ते २०२३ दरम्यान भारताला दोन विश्वचषक म्हणजेच एकदिवसीय आणि टी -२० खेळायचे आहेत, त्यामुळे कोहलीची फलंदाजी महत्त्वाची मानली जाते. कर्णधार कोहलीला असेही वाटते की, सर्व स्वरूपांमध्ये कर्णधार म्हणून त्याच्या एकूण जबाबदाऱ्या त्याच्या फलंदाजीवर परिणाम करत आहेत. यासाठी त्याने स्वत: ला ताजेतवाने ठेवणे आवश्यक आहे. आता रोहितने मर्यादित षटकांमध्ये संघाचे कर्णधारपद स्वीकारले, तर कोहली कसोटीत भारतीय संघाचे कर्णधारपद तसेच ट्वेंटी २० आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजीवर काम करू शकतो.
महेंद्रसिंग धोनीच्या राजीनाम्यानंतर कोहली २०१४ मध्ये भारतीय संघाचा कसोटी कर्णधार बनला. यानंतर धोनीने २०१७ मध्ये सर्व स्वरूपातील कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर कोहलीला कसोटीनंतर टी -२० आणि एकदिवसीय संघाचे कर्णधार बनवण्यात आले. कोहलीने आतापर्यंत ६५ कसोटी सामन्यांचे नेतृत्व केले आहे, त्यात त्याने ३८ सामने जिंकले आहेत. तसेच एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ९५ सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे आणि ६५ जिंकले आहेत. कोहलीने टी -20 च्या ४५ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, त्यात त्याने २९ सामने जिंकले आहेत.