इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भाषणाची संधी मिळाली नाही, निधी मिळाला नाही, केंद्रीय मंत्र्यांसोबत स्नेहभोजन आणि चहापाणी हे सर्व विषय MPSC विद्यार्थ्यांच्या भवितव्यापेक्षा अधिक महत्त्वाचे सरकारला वाटतात का? असा सवाल करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी सरकार प्राधान्यक्रम कशाला असे सांगत महाराष्ट्रातील #MPSC परीक्षार्थी रस्त्यावर उतरून आपल्या हक्कांसाठी लढत आहे. हे चित्र अत्यंत निराशाजनक असल्याचे म्हटले आहे.
वडेट्टीवार यांनी सांगितले की, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळावा, Combine परीक्षेसाठी जागावाढ व्हावी. इतक्या मागण्या आहेत आणि हे विषय आयोग आणि सरकारच्या अखत्यारितील असूनही दुर्लक्ष का केले जात आहे? की सरकारसाठी हे महत्वाचे नाही?
महायुती मधील तिन्ही पक्षाच्या लोकप्रतिनिधींना MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल मुख्यमंत्र्यांना साधं पत्र लिहून त्यांच्या मागण्या मांडायला वेळ नाही का? की ते महत्वाचं नाहीये? आपला निधी मिळाला की काम झालं असे आहे का?
सरकारच्या या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चीड निर्माण होत आहे. या आंदोलनाला सरकारने हलक्यात घेऊ नये आणि मागण्या त्वरित मान्य कराव्यात.