शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

निवडणुकीत उमेदवारांची अनामत रक्कम केव्हा जप्त होते?…जाणून घ्या नियम

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 1, 2024 | 2:46 pm
in संमिश्र वार्ता
0
ELECTION

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उमेदवारी अर्ज सादर करताना उमेदवारास विहीत केलेली अनामत रक्कम भरावी लागते. विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वसाधारण उमेदवारासाठी अनामत रक्कम 10 हजार रुपये, तर अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती वर्गातील उमेदवारासाठी पाच हजार रुपये जमा करावी लागते. निवडणुकीत एकूण वैध मतांच्या एक षष्ठांशापेक्षा कमी मते मिळाल्यास अनामत रक्कम जप्त होते, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज म्हणजेच नामनिर्देशनपत्र दाखल करावयाची अंतिम मुदत होती. 30 ऑक्टोबर 2024 रोजी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून माघारीसाठी अंतिम मुदत 4 नोव्हेंबर 2024 अशी आहे. या दिवशी दुपारी 3.00 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.

उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध आहे आणि नाकारले गेले असेल, तर अनामत रक्कम परत मिळते. उमेदवाराने विहीत कालावधीत उमेदवारी मागे घेतली असल्यास सदरची रक्कम परत मिळते. निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारास अनामत रक्कम परत मिळते. मतदानाच्या प्रारंभापूर्वीच उमेदवार मृत्यू पावला, तर अनामत रक्कम त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधीस परत केली जाते. तसेच असे उमेदवार जे निवडून आलेले नाहीत मात्र निवडणुकीत सर्व उमेदवारांना पडलेल्या एकूण वैध मतांच्या एक षष्ठांशापेक्षा जास्त मते मिळाली असतील, तरी देखील अनामत रक्कम परत मिळते. जर उमेदवार निवडून आला मात्र सर्व उमेदवारांना पडलेल्या एकूण वैध मतांच्या एक षष्ठांशापेक्षा जास्त मते मिळाली नसतील, तरी देखील अनामत रक्कम परत मिळते. अनामत रक्कम परत करतेवेळी एकूण वैध मतांची गणना करताना नोटाला मिळालेली मते विचारात घेतली जात नाहीत.

वरील निकषात जर उमेदवार बसत असेल, तर त्यांनी विहीत नमुन्यात अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचा आहे. त्यानुसार निकष तपासून निवडणूक निर्णय अधिकारी अनामत रक्कम परत करण्याचे आदेश पारीत करतात. सर्व उमेदवारांना पडलेल्या एकूण वैध मतांच्या एक षष्ठांशापेक्षा कमी मते मिळाली, तर अनामत रक्कम जप्त करण्यात येते. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, अशा उमेदवारांची रक्कम शासन जमा करण्याचे आदेश पारीत करून रक्कम शासनाकडे जमा करतात, असेही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी म्हटले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सदा सरवणकरांची राज ठाकरे यांच्यावर टीका…एकही आमदार नाही, त्यांनी मुख्यमंत्री कोण हे सांगणं हास्यास्पद

Next Post

नाशिक जिल्हाधिकारी यांनी आधारश्रमातील बालकांसमवेत साजरी केली दिवाळी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20241101 WA0465 1

नाशिक जिल्हाधिकारी यांनी आधारश्रमातील बालकांसमवेत साजरी केली दिवाळी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011