इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
त्यांचा काहीच उपयोग नसतो
कोणताही वैयक्तिक हेतू, प्रसिद्धी किंवा लोकमान्यता किंवा लौकिक मोठेपणा अशा इच्छांविना कर्म करावे. तसेच कर्म करतांना स्वतःच्या मानसिक हेतू किंवा लालसा व मागण्या किंवा शारीरिक पसंती-नापसंती यांचा आग्रह नसावा. कोणत्याही बढाईविना किंवा असंस्कृत स्व-मताग्रहाविना किंवा एखादे पद वा प्रतिष्ठेसाठी कोणताही दावा न करता कर्म करावे. केवळ आणि केवळ ‘ईश्वरा’साठीच आणि ‘ईश्वरी आदेशा’ने जे कर्म केले जाते, केवळ असेच कर्म आध्यात्मिकदृष्ट्या शुद्धीकरण करणारे असते. सर्व कर्म जी जी अहंभावात्मक वृत्तीने केली जातात ती, या ‘अज्ञान’मय जगातील लोकांच्या दृष्टीने भलेही चांगली असू देत, पण ‘योगसाधना’ करणाऱ्या साधकाच्या दृष्टीने त्यांचा काहीच उपयोग नसतो.