इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सुप्रीम कोर्टने ओबीसींचे आरक्षण जसेच्या-तसे ठेऊन स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घ्याव्यात असा निर्णय दिला आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काही ठिकाणी वॉर्ड आणि काही ठिकाणी प्रभाग पद्धत आहे.शासनाने प्रभाग ३ की ४ चा ठेवणार आहेतच खुलासा करावा, प्रभाग लवकरात लवकर जाहीर करावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
ते म्हणाले की, राज्य सरकारला आमची विनंती आहे की, प्रभागरचना, वॉर्ड रचना, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघाची फोड करण्यात यावी.
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि बृहन्मुंबई महानगरपालिका वॉर्ड पद्धत असल्यामुळे त्यांच्या रचनेसाठी महाराष्ट्र निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात सीमांकन (Delimitation) समिती गठीत करावी.
कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ४ महिन्यात घ्यायला सांगितली आहे. राज्य शासनाने महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग रचना ३ ची असणार आहे की ४ ची याचा खुलासा तातडीने केला पाहिजे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही लढवणार आहोत. स्थानिक पातळीवर युतीचे अधिकार आमच्या जिल्हा कमिटीला देण्यात आले आहेत. जिल्ह्यात भाजपला सोडून युती करण्यास हरकत नाही, त्या जिल्ह्यातील युती संदर्भातील मान्यता पक्षाची महाराष्ट्र कमिटी घेईल.