सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘वंचित’सत्तेसोबत जाणार…प्रकाश आंबेडकर यांचे सूतोवाच

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 16, 2024 | 11:21 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
vanchit

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अकोलाः राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीच्या निकालानंतर वंचित सत्तेसोबत जाण्याचे सूतोवाच केले आहे. या वेळी त्यांनी राज्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याचा अंदाजही व्यक्त केला.

२८८ सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी येत्या २० तारखेला एका टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यानंतर २३ तारखेला मतमोजणी होऊन राज्यात नवे सरकार अस्तित्वात येईल. तूर्त राज्यात सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराला अवघे २ दिवस शिल्लक असताना आंबेडकर यांनी सत्तेसोबत जाण्याचे संकेत दिले. ते म्हणाले, की राज्यातील सध्याचे राजकारण तत्वहीन आहे. सध्याच्या परिस्थितीत कुणीही कुठेही जाऊ शकते. आम्हालाही सद्यस्थितीत पाहता सत्तेसोबत जाणे महत्त्वाचे वाटते. आमच्यापुढे निवडणूक निकालानंतर महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांसोबत जाण्याचे पर्याय खुले आहेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत जाण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या अनेक बैठका महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत झाल्या होत्या. आंबडेकर स्वतः शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याशी बोललेही होते; पण अचानक त्यांच्यात वितुष्ट आले आणि ‘वंचित’ने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवली. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही त्यांनी बहुतांश मतदारसंघात आपले उमेदवार दिले आहेत. त्यांच्यावर भाजपची बी टीम असल्याचाही आरोप होतो. या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी निवडणुकीनंतर सत्तेसोबत जाण्याचे सूतोवाच केले आहे. यामुळे त्यांच्या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात खमंग चर्चा रंगली आहे.

आंबेडकर यांनी या वेळी भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या मुद्याचाही समाचार घेतला. भाजपकडे विकासाचा कोणताच मुद्दा उरला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून मतांचे धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठीच त्यांच्याकडे ‘बटेंगे तो कटेंगे’ सारख्या घोषणांचा वापर केला जात आहे, असे ते म्हणाले. आंबेडकर यांनी या वेळी माध्यमांवर ‘वंचित’कडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्याचाही आरोप केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोदी यांना स्मृतिभंशाचा गंभीर आजार…राहुल गांधी यांची खरपूस टीका

Next Post

फटाक्याचा आवाज बांद्र्यापर्यंत पोचवा….मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरेंना टोला

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 20
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा…बघा, व्हिडिओ

सप्टेंबर 15, 2025
PETROL PUMP
संमिश्र वार्ता

टँकरमधून होणारी इंधन चोरी….पेट्रोल डीलर्स असोसिएशनने चोरीचा असा केला पर्दाफाश

सप्टेंबर 15, 2025
Untitled 19
स्थानिक बातम्या

नाशिकच्या केंब्रिज स्कूलमध्ये बॅाम्ब…शाळा प्रशासनाने दिली ही माहिती

सप्टेंबर 15, 2025
accident 11
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया अपघातात भरधाव वाहनांनी दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू

सप्टेंबर 15, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

वक्फ संशोधन कायद्याला आव्हान देणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

सप्टेंबर 15, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274
महत्त्वाच्या बातम्या

पराभवानंतरही पाकिस्तान संघाला मिळाले इतके कोटी….संजय राऊत यांनी सांगितला धक्कादायक आकडा

सप्टेंबर 15, 2025
VO7rnvQq 400x400 e1757903064573
राष्ट्रीय

संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण खरेदी नियामावलीला दिली मंजुरी…हा होणार फायदा

सप्टेंबर 15, 2025
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन 5 1024x683 1
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन…आज शपथविधी

सप्टेंबर 15, 2025
Next Post
Eknath Shinde e1714057426383

फटाक्याचा आवाज बांद्र्यापर्यंत पोचवा….मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरेंना टोला

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011