इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाने भारत आणि पाकिस्तानला लष्करी कारवाई हा उपाय नसल्याचा सल्ला दिला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची क्लोज डोर मीटिंग झाली. त्यात कोणताही ठोस असा निर्णय झाला नाही.
या बैठकीनंतर संयुक्त राष्ट्राने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही व कोणताही ठराव पारित केला नाही. या बैठकीनंतर पाकिस्तानचे दूर असीम इप्तिखारने सांगितले की, यूएनएससी बैठकीनंतर जो उद्देश होता, जे हवे होते ते पूर्ण झाले. ते म्हणाले की या बैठकीत जम्मू – कश्मीर वाद सोडवण्यावरही चर्चा झाली. पण, हे सर्व खोटं असल्याचे आता बोलले जात आहे.
या बैठकीत पहलगाम हल्ल्यावरुन प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर या दहशवादी हल्ल्यात लश्कर – ए- तैयबाच्या भूमिकेवर पाकिस्थानला कडे बोल सुनावले. सर्वात महत्त्वाची गोष्ट या बैठकीत चीनने सुध्दा पाकिस्तानची साथ दिली नाही. चीन या परिषदेचा अस्थाई सदस्य आहे. या बैठकीत सदस्य देशांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. धर्म विचारुन पर्यटकांवर निशाणा साधण्यावरही प्रश्न उपस्थित केला. व्दिपक्षीय मुद्दा सांगत दखल देण्यास नकार दिल्याचेही सांगण्यात येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशांत हा तणाव आहे. पण आता मात्र हा तणाव परमोच्च पातळीवर पोहोचला आहे, असंही संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या या सल्ल्यानंतर आता पुढे नेमकं काय घडतं हे महत्त्वाचे असणार आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दोन्ही देशांना लष्करी कारवाई हा काही वाद मिटवण्याचा पर्याय नसल्याचे म्हटलं असले तरी पहलगामची घटना घडल्यानंतर पाकिस्तानचे नेते आमच्याकडे अणुबॉम्ब आहे, अशा प्रकारची धमकी देत आहेत. तर भारताने आमच्यावर हल्ला केला तर आम्ही प्रत्युत्तर देण्यास तयार आहोत, आमचे सैन्य सज्ज आहे, असं पाकिस्तानचे सत्ताधारी सांगत आहेत.