शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

देशद्रोह कायद्याबाबत केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय; सुप्रीम कोर्टात दिले प्रतिज्ञापत्र

by India Darpan
मे 9, 2022 | 5:53 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
SC2B1

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची माहिती दिली आहे. देशद्रोह कायद्यामधील तरतुदींवर फेरविचार करण्याचा आणि चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे. सरकारकडून चौकशी पूर्ण होईपर्यंत या प्रकरणावर सुनावणी घेऊ नये अशी विनंती केंद्र सरकारने केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करून देशद्रोह कायद्यातील दंड संहिता (आयपीसी)च्या कलम १२४ए च्या वैधतेची चौकशी आणि फेरविचार करणार असल्याचे केंद्राने सांगितले. प्रतिज्ञापत्रात सरकारने म्हटले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनातून देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. पारतंत्र्यात असताना बनवलेल्या या कायद्यावर फेरविचार करणे आवश्यक आहे. देशद्रोह कायद्याच्या आक्षेपांबद्दल केंद्र सरकारला माहिती आहे. अनेकदा मानवाधिकारावरूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखणे हे या कायद्याचे उद्दिष्ट असायला हवे.

प्रतिज्ञापत्रानुसार, आयपीसीच्या १२४ ए या कलमातील तरतुदींवर फेरविचार करण्याची वेळ आली आहे. या कायद्याच्या वैधतेच्या चौकशीची प्रक्रिया सुरू असताना वेळ वाया घालवू नये, अशी विनंती केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. देशावर इंग्रजांचे राज्य असताना बनवलेल्या या कायद्याची चौकशी करण्याची मागणी अनेक याचिकांद्वारे करण्यात आली होती. केंद्राने याच याचिकांना उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

देशद्रोह कायद्याचा आढावा घेण्याची गरज नाही, असे केंद्राने यापूर्वी सांगितले होते. या कायद्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिका रद्द कराव्यात अशी मागणीही केंद्राने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. देशद्रोह कायद्याविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया, टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांचा समावेश आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इयत्ता १०वी आणि १२वीच्या निकालाची तारीख ठरली; बोर्डाने केली घोषणा

Next Post

नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागात एकूण ४ जणांची आत्महत्या

Next Post
प्रातिनिधीक फोटो

नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागात एकूण ४ जणांची आत्महत्या

ताज्या बातम्या

accident 11

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार मायलेकी जखमी

मे 9, 2025
crime 88

घरफोडीत चोरट्यांचा १० लाखाच्या ऐवजावर डल्ला…वडाळा पाथर्डी मार्गावरील घटना

मे 9, 2025
GqfRvQmXwAE eHd e1746774742475

आयपीलचे उर्वरीत सर्व सामने स्थगित…बीसीसीआयने घेतला निर्णय

मे 9, 2025
jail11

अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने चैनस्नॅचिंग करणारा चोर गजाआड…१० गुन्ह्याची कबुली, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

मे 9, 2025
LtoR Mr. Hardeep Singh Brar Sr. VP Sales Marketing Kia India and Mr. Gwanggu Lee MD Kia India 1

किया इंडियाकडून कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस लाँच…आकर्षक डिझाइनसह ही आहे वैशिष्‍ट्ये

मे 9, 2025
INDIA GOVERMENT

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका…दिले हे निर्देश

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011