सोमवार, नोव्हेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयात वाढतोय तणाव; आता पुढे काय होणार?

डिसेंबर 13, 2022 | 5:15 am
in राष्ट्रीय
0
SC2B1

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात सध्या अनेक मुद्द्यांवरून खडाजंगी सुरू असल्याचे दिसून येत आहे. कॉलेजियमच्या शिफारशींचं पालन न करणं असो, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचं प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयात तणाव सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी याविषयी एक वक्तव्य केले असून, त्यांनी कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्यावर निशाणा साधला आहे. रिजिजू यांनी लक्ष्मणरेषा ओलांडली असल्याचे म्हणले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच सरकारकडून अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाल्याची अधिसूचना जारी करण्यात आली होती. या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयाकडून आव्हान देण्यात आलं तसेच अनेक प्रश्नदेखील न्यायालयाकडून उपस्थित केले गेले होते. तसेच सर्वोच्च न्यायालयानं सरकारकडे या नियुक्तीसंदर्भातील संपूर्ण तपशील मागितले होते. २४ तासांपेक्षा कमी कालावधीत हा निर्णय कसा घेतला गेला, असा जाबदेखील विचारला होता. अरुण गोयल यांना निवृत्तीनंतर लगेचच या पदावर बसवल्याचा आरोप केंद्र सरकारवर होत आहे. जे नियमांच्या विरुद्ध आहे. यावर सरकारनं उत्तर दिले की, यापूर्वीही असं घडलं आहे आणि कोणत्याही नियमांच उल्लंघन केलं गेलेलं नाही. यावरुन केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील वाद आता चिघळत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

आता कायदामंत्र्यांच्या त्या वक्तव्याचा संदर्भ देत ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी एका कार्यक्रमादरम्यान रिजिजू यांनी लक्ष्मणरेषा ओलांडल्याचं म्हटलं आहे. बार अँड बेंचच्या म्हणण्यानुसार, हरिश साळवे म्हणाले की, “मला वाटतं की, कायदेमंत्र्यांनी जे वक्तव्य केले आहे. ते बोलून त्यातून लक्ष्मणरेषा ओलांडली आहे. जर कायदामंत्र्यांना असं वाटत असेल की, सर्वोच्च न्यायालयानं घटनाबाह्य असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं आणि कायद्यात सुधारणा करण्यासाठी सरकारच्या दयेवर अवलंबून राहायला हवं, तर माफ करा, हे पूर्णपणे चुकीचं आहे.” आपल्या भाषणादरम्यान साळवे यांनी राजद्रोह कायद्याचाही उल्लेख केला आहे. ज्यामध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयानं राजद्रोह कायदा रद्द करावा, असं म्हटलं आहे. त्यांच्या मते हा वसाहतवादी कायदा असून ते व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्याच्या विरुद्ध आहे.

Union Government Supreme Court Tussle Legal

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘आप’ झाला राष्ट्रीय पक्ष; आगामी निवडणुकींमध्ये कुणाचे गणित बिघडणार? कुणाला फायदा? कुणाचे नुकसान?

Next Post

G20 परिषदेतून नक्की काय साध्य होणार आहे? भारतातील बैठकांचे विषय काय आहेत? घ्या जाणून सविस्तर…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
G20 India

G20 परिषदेतून नक्की काय साध्य होणार आहे? भारतातील बैठकांचे विषय काय आहेत? घ्या जाणून सविस्तर...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011