इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहेत. केंद्र सरकाराच्या या बजेटमध्ये नेमकं काय असणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. या बजेट सत्रात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यानी सांगितले की, नवीन कर विधेयक पुढील आठवड्यात सभागृहात मांडले जाईल. नवीन कायदा आयकर कायदा १९६१ ची जागा घेईल. आता नवीन करप्रणातील १२ लाखापर्यंत आयकर लागणार नाही. त्याचप्रमाणे या अर्थसंकल्पात गंभीर आजारावरील ३६ औषधे ड्युटी फ्रि केली आहेत. त्यामुळे ही औषधे स्वस्तात मिळणार आहेत.
या अर्थसंकल्पात ३६ जीवन रक्षक औषधांचा ड्युटी टॅक्स पूर्णपणे रद्द केला आहे. सर्व सरकारी रुग्णालयात कॅन्सर डे केअर सेंटर बनवण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे. कॅन्सरवरील उपचारासाठीची औषधे आता स्वस्त होणार आहे. सहा जीवन रक्षक औषधांवरील कस्टम ड्यूटी ५ टक्के करण्यात आली आहे.
मेडिकलच्या जागाही वाढवल्या
यावेळी त्यांनी ५ वर्षात १० हजार मेडिकलच्या जागा वाढवण्यात येणार आहे. आयआयटी मध्ये ६५०० सीटें वाढवण्यात येणार आहे. ३ एआय सेंटर उघडण्याची घोषणाही त्यांनी केली..एआय शिक्षणासााठी ५०० कोटीचा बजेट टेवण्यात आला आहे.