गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोदी व शाह यांनी अवघा महाराष्ट्र लुटला…उद्धव ठाकरे यांचा हल्ला

by India Darpan
नोव्हेंबर 9, 2024 | 11:40 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
udhava

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नांदेडः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तिखट हल्ला चढवला. मोदी व शाह यांनी अवघा महाराष्ट्र लुटला. त्यानंतर आता ते महाराष्ट्रात मते मागण्यासाठी जागोजागी फिरत आहेत, असे ते म्हणाले. मुलगी शिकली, प्रगती झाली आणि पंधराशे देऊन घरी बसवली, हा विकास आहे का? असा उपरोधिक सवाल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला केला.

ठाकरे यांची शनिवारी नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात सभा झाली. या सभेत त्यांनी भाजप महायुतीवर विशेषतः मोदी शाह यांच्यावर तिखट टीका केली. ते म्हणाले, की मोदी व शाह यांना आता महाराष्ट्राची आठवण झाली आहे. आतापर्यंत त्यांना महाराष्ट्र केवळ लुटण्यासाठी आहे, असे वाटत होते; पण आता महाराष्ट्रातील लोकांना मतदानाचा अधिकार आहे हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यानुसार आता ते इथे येऊन मतांचा जोगवा मागत आहेत. या लोकांनी महाराष्ट्राचे सर्व उद्योग लुटून गुजरातला नेता आणि आता निर्लज्जपणे महाराष्ट्राची मते मागता? तुम्हाला काय वाटते? तुम्ही काही केले तरी चालले आणि महाराष्ट्र केविलवाणेपणाने मत देईल? ही लढाई केवळ उद्धव ठाकरे व शिवसेनेची नाही. आपल्याला सत्ता पाहिजे; पण हे सर्व केवळ महाविकास आघाडीसाठी नाही, तर येथील सर्वसामान्य जनतेसाठी आपल्याला सत्ता हवी आहे.

भाजपने आता ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा दिला आहे. कोण कापणारे आहेत? जे काही कापणारे आहेत ते तुमच्यासोबत सत्तेत बसलेले आहेत. त्यांनी माझ्या एका कार्यकर्त्याचे केवळ फेसबुक पोस्ट टाकली, म्हणून बोटे कापली. ज्यांनी माझ्या कार्यकर्त्याची बोटे कापली, त्यांना आम्ही आता राजकारणात कापणार आहोत, असे ठाकरे म्हणाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना इशारा त्यांनी दिला. चिखलीकर यांच्यावर ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याची बोटे छाटल्याचा आरोप आहे. मोदी येथे आले तर त्यांना हा माझा बोटे कापलेला कार्यकर्ता दाखवा. त्यांना विचारा कोण आहे हा? काय त्याचा गुन्हा? विरोधात पोस्ट टाकली म्हणून त्याचे बोटे छाटता? त्याने तर पोस्ट टाकली, मी तर तुमच्याविरोधात उघडपणे बोलत आहे, असे ते म्हणाले. ठाकरे यांनी या वेळी बोटे छाटलेल्या पीडित कार्यकर्त्याला आपल्याजवळ बोलावले. तसेच त्याला त्याच्यावर बेतलेल्या प्रसंगाचा बदला मी स्वतः घेणार, असा धीरवजा शब्द त्याला दिला. या वेळी उपस्थितांनी मोठी घोषणाबाजी केली.

आतापर्यंत भाजपवर मोदी व शहांची पोलादी पकड होती; पण आता त्यांची सर्वत्र छी-थू होत आहे. त्यांचे अनेक नेते आता या दोघांचे काहीही चालत नाही म्हणून भाजप सोडून जात आहेत. सर्वजण आमच्या हातातील मशालीच्या प्रकाशात येत आहेत. आमच्याकडे मशालीचा प्रकाश, तर भाजपमध्ये केवळ काळा अंधार पसरला आहे. महायुतीचे लोक आता शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची वल्गना करत आहेत; पण मी स्वतः शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले होते. त्यांनी सरकार पाडले नसते, तर मी दुसऱ्यांदा त्यांना कर्जमाफी दिली असती. तेवढी धमक आहे माझ्यात; पण आता त्यांनी रस्ते प्रकल्पाच्या माध्यमातून ठेकेदारांचे खिसे भरण्याचे काम सुरू केले आहे. विकासाच्या नावाखाली देशात ढोंग सुरू आहे. केवळ उड्डाणपूल बांधल्यामुळे विकास होत नाही; पण त्या उड्डाणखाली आमच्या बेरोजगारांवर भीक मागण्याची वेळ येत असेल तर उड्डाणपूल काय कामाचा? अरे त्या तरुणांच्या हातांना काम द्या, त्यानंतर आपोआपच विकास होईल, असे ते म्हणाले.

मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातील एकही उद्योग गुजरातला गेला नाही. भाजपच नव्हे तर मोदी-शाह यांची महाराष्ट्राकडे वाकडे पाहण्याची हिंमत नव्हती. कोरोना काळातही आम्ही हिंमतीने महाराष्ट्राचे उद्योग वाढवले; पण हे डोळ्यात सलत असल्यामुळे त्यांनी आमचे सरकार पाडले. त्यानंतर येथील सर्व उद्योग गुजरातला पळवले. आता ते आमच्यावर विकासाला खीळ घालण्याचा आरोप करीत आहेत. त्यांनीच आमच्या तरुणांच्या रोजगाराला खीळ घालण्याचे काम केले आहे, अशी टीका उद्धव यांनी केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ज्यांना मतदान केले, त्यांना नाकारा, राज यांचा सल्ला; माणसांची किंमत नसलेल्यांना का निवडून देता?

Next Post

संविधानात बदलाचा मोदींचा कट उधळला…शरद पवार यांची टीका

Next Post
Sharad Pawar

संविधानात बदलाचा मोदींचा कट उधळला…शरद पवार यांची टीका

ताज्या बातम्या

संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
Untitled 56

डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार; फाल्कन २००० जेटसची नागपुरात होणार निर्मिती

जून 19, 2025
Untitled 55

साहित्य अकादमीचे ‘युवा’ व ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर….यांना मिळाले पुरस्कार

जून 19, 2025
Untitled 54

स्विप्ट कार व पीकअप टेम्पोच्या भीषण अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू

जून 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011