बुधवार, ऑक्टोबर 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

तुळजापूर आणि शनिशिंगणापूर देवस्थानचा असा आहे कारभार; माहिती अधिकारात उघड

ऑक्टोबर 31, 2021 | 5:12 am
in संमिश्र वार्ता
0
tuljabhavani tuljapur

– वीरेंद्र इचलकरंजीकर (राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता, हिंदू विधीज्ञ परिषद)
‘चांगले व्यवस्थापन व्हायला पाहिजे’, ‘भाविकांची गैरसोय होत होती’, ‘गैरकारभार होत होता’ आदी अनेक कारणे देऊन महाराष्ट्र शासनाने राज्यातील केवळ हिंदूंची अनेक मोठी मंदिरे स्वत:च्या नियंत्रणात घेतली. त्यापैकी वर्ष 2015 मध्ये तुळजापूर येथील श्री तुळजाभवनी मंदिर आणि वर्ष 2018 मध्ये शनिशिंगणापूर येथील श्री शनि मंदिर शासकीय नियंत्रणात घेतले; मात्र वर्ष 2016 पासून आतापर्यंत या दोन मंदिरांना महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागाने एकदाही ना भेट दिली, ना तेथील व्यवस्थापनाची पाहणी केली. त्यामुळे ‘सुव्यवस्थापन’ सोडा; पाच वर्षांत सरकार तुळजापूर आणि शनिशिंगणापूर येथे एकदाही फिरकलेले सुद्धा नाही; मग हे कसले मंदिरांवरील सरकारी नियंत्रण ?

माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीत वरील धक्कादायक माहिती उघड झाली आहे. माहितीच्या अधिकाराखाली पुढील प्रश्‍न महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागाला विचारण्यात आले होते. त्यात वर्ष 2016 पासून सदर मंदिरांना विभागाने किती वेळा भेटी दिल्या, विभागाने केलेल्या सूचना, विभागाने तयार केलेला अहवाल, विभागाच्या सूचनांच्या आधारे मंदिरांनी सादर केलेला अनुपालन अहवाल, मंदिराचे लेखा परीक्षण अहवाल आणि त्यावरील आक्षेपांच्या निराकरणाच्या प्रती आदींची मागणी केली होती; मात्र या सर्वांना शासनाने ‘‘निरंक’’ असे उत्तर दिलेले आहे. मुळात निधर्मी शासनाने मंदिरांचे व्यवस्थापन ताब्यात घेणे, हाच मोठा क्रूर विनोद आहे. हिंदूंच्या धार्मिक भावनांशी निगडीत जागा धर्मनिरपेक्ष शासन कसे घेऊ शकते ? हा कळीचा आणि कायमस्वरूपी मांडला गेलेला महत्त्वाचा मुद्दा एकवेळ बाजूला ठेवला, तरी व्यावहारिक स्तरावरही शासन पूर्ण अपयशी ठरले आहे, हेच स्पष्ट होते.

श्री तुळजाभवानी मंदिरात शेकडो कोटींचा सिंहासनपेटी घोटाळा, 267 एकर भूमी घोटाळा आदी गैरकारभाराबाबत गुन्हे अन्वेषण यंत्रणेकडे तपास सोपवला होता. वर्ष 2017 मध्ये त्याचा अहवाल गृह खात्याला सादर झाल्यावरही झारीतील शुक्राचार्य तो अहवाल जनतेसमोर येऊ देत नाहीत. तर दुसरीकडे शनिशिंगणापूर येथील मंदिराबाबत राजकीय हस्तक्षेप किंवा मंदिराच्या निधीतून राजकीय नेत्यांना मोठे करणार्‍या जाहिरांतीचा खर्च अथवा तत्सम आरोप झाले होते. त्याचे पुढे काय झाले? कायद्यातील तरतुदींनुसार शासनाच्या नियंत्रणात मंदिर आले की, शासकीय लेखापरीक्षणही लागू होते. शासकीय लेखापरिक्षणाचे अहवाल विधी आणि न्याय विभागाकडे पाठवले जातात. तेथे त्याची चिकित्सा होणे आणि आवश्यक ती कारवाई होणे अपेक्षित असते; मात्र आलेल्या उत्तरानुसार काहीही होतांना दिसत नाही.

एकीकडे शासनाला स्वत:चे उद्योग धड चालवता येत नसल्यामुळे सतत तोटा होत आहे. उद्योग विकावे लागत आहेत. असे असतांना कोणत्या तोंडाने शासन ‘आम्ही मंदिरांचे व्यवस्थापन करू’ अशी आशा भक्तांना देते ? खरेतर या विषयांवरून हिंदूंनी शासनाला, त्याच्या संबंधित अधिकार्‍यांना धारेवर धरून जाब विचारला पाहिजे, असे परखड मतही अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी मांडले. ‘चांगले व्यवस्थापन व्हायला पाहिजे’, ‘भाविकांची गैरसोय होत होती’, ‘गैरकारभार होत होता’ आदी अनेक कारणे देऊन महाराष्ट्र शासनाने राज्यातील केवळ हिंदूंची अनेक मोठी मंदिरे स्वत:च्या नियंत्रणात घेतली. त्यापैकी वर्ष 2015 मध्ये तुळजापूर येथील श्री तुळजाभवनी मंदिर आणि वर्ष 2018 मध्ये शनिशिंगणापूर येथील श्री शनि मंदिर शासकीय नियंत्रणात घेतले; मात्र वर्ष 2016 पासून आतापर्यंत या दोन मंदिरांना महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागाने एकदाही ना भेट दिली, ना तेथील व्यवस्थापनाची पाहणी केली. त्यामुळे ‘सुव्यवस्थापन’ सोडा; पाच वर्षांत सरकार तुळजापूर आणि शनिशिंगणापूर येथे एकदाही फिरकलेले सुद्धा नाही; मग हे कसले मंदिरांवरील सरकारी नियंत्रण?

माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीत वरील धक्कादायक माहिती उघड झाली आहे. माहितीच्या अधिकाराखाली पुढील प्रश्‍न महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागाला विचारण्यात आले होते. त्यात वर्ष 2016 पासून सदर मंदिरांना विभागाने किती वेळा भेटी दिल्या, विभागाने केलेल्या सूचना, विभागाने तयार केलेला अहवाल, विभागाच्या सूचनांच्या आधारे मंदिरांनी सादर केलेला अनुपालन अहवाल, मंदिराचे लेखा परीक्षण अहवाल आणि त्यावरील आक्षेपांच्या निराकरणाच्या प्रती आदींची मागणी केली होती; मात्र या सर्वांना शासनाने ‘‘निरंक’’ असे उत्तर दिलेले आहे. मुळात निधर्मी शासनाने मंदिरांचे व्यवस्थापन ताब्यात घेणे, हाच मोठा क्रूर विनोद आहे. हिंदूंच्या धार्मिक भावनांशी निगडीत जागा धर्मनिरपेक्ष शासन कसे घेऊ शकते ? हा कळीचा आणि कायमस्वरूपी मांडला गेलेला महत्त्वाचा मुद्दा एकवेळ बाजूला ठेवला, तरी व्यावहारिक स्तरावरही शासन पूर्ण अपयशी ठरले आहे, हेच स्पष्ट होते.

श्री तुळजाभवानी मंदिरात शेकडो कोटींचा सिंहासनपेटी घोटाळा, 267 एकर भूमी घोटाळा आदी गैरकारभाराबाबत गुन्हे अन्वेषण यंत्रणेकडे तपास सोपवला होता. वर्ष 2017 मध्ये त्याचा अहवाल गृह खात्याला सादर झाल्यावरही झारीतील शुक्राचार्य तो अहवाल जनतेसमोर येऊ देत नाहीत. तर दुसरीकडे शनिशिंगणापूर येथील मंदिराबाबत राजकीय हस्तक्षेप किंवा मंदिराच्या निधीतून राजकीय नेत्यांना मोठे करणार्‍या जाहिरांतीचा खर्च अथवा तत्सम आरोप झाले होते. त्याचे पुढे काय झाले ? कायद्यातील तरतुदींनुसार शासनाच्या नियंत्रणात मंदिर आले की, शासकीय लेखापरीक्षणही लागू होते. शासकीय लेखापरिक्षणाचे अहवाल विधी आणि न्याय विभागाकडे पाठवले जातात. तेथे त्याची चिकित्सा होणे आणि आवश्यक ती कारवाई होणे अपेक्षित असते; मात्र आलेल्या उत्तरानुसार काहीही होतांना दिसत नाही. एकीकडे शासनाला स्वत:चे उद्योग धड चालवता येत नसल्यामुळे सतत तोटा होत आहे. उद्योग विकावे लागत आहेत. असे असतांना कोणत्या तोंडाने शासन ‘आम्ही मंदिरांचे व्यवस्थापन करू’ अशी आशा भक्तांना देते ? खरेतर या विषयांवरून हिंदूंनी शासनाला, त्याच्या संबंधित अधिकार्‍यांना धारेवर धरून जाब विचारला पाहिजे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

IRCTCचा शेअर्स सतत खाली जातोय; आता घ्यायचा की नाही?

Next Post

कौटुंबिक निवृत्तीवेतनाबद्दल केंद्र सरकारची दिवाळी भेट

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Home Flat e1681892298444
मुख्य बातमी

घरकुल बांधणीत या जिल्ह्याने रचला नवा विक्रम! ५० हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती…

ऑक्टोबर 22, 2025
PIC1OG8A
महत्त्वाच्या बातम्या

स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला लष्कराचा मिळाला हा बहुमान… गोल्डन बॉय आता या पदवीने ओळखला जाणार… 

ऑक्टोबर 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा भाऊबीजेचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार, २३ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 22, 2025
IMG 20210302 WA0026
संमिश्र वार्ता

दिवाळीनंतर फिरायला जायचंय? या बीचवर नक्की जा… येथील अभूतपूर्व नजारा पाहून खुशच व्हाल…

ऑक्टोबर 22, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय… काढला हा शासनादेश… अशी मिळणार मदत…

ऑक्टोबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस… जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 21, 2025
diwali padva balipratipada
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा- असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 21, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीत या ११ गोष्टी लक्षात ठेवा… ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी यांनी दिल्या या टीप्स…

ऑक्टोबर 21, 2025
Next Post
EPFO

कौटुंबिक निवृत्तीवेतनाबद्दल केंद्र सरकारची दिवाळी भेट

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011