गुरूवार, डिसेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पुन्हा नव्या वादाला तोंड! पर्यटनमंत्री लोढांकडून एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना थेट शिवरायांच्या आग्रामधील सुटकेशी

नोव्हेंबर 30, 2022 | 8:14 pm
in संमिश्र वार्ता
0
Mangal Prabhat Lodha e1669819240529

सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे अत्यंत आदराचे स्थान आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते आपल्या बेताल वक्तव्यातून कोणात्याही नेत्याची शिवाजी महाराजांबरोबर तुलना करून एक प्रकारे शिवरायांचा अपमान करीत आहेत. राज्यपालांच्या शिवरायांचा संबंधित वादग्रस्त वक्तव्यानंतर आता महाराष्ट्रातील आणखी एका मंत्र्यांनी असेच वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे तसेच विरोधी पक्षांनी या संदर्भात तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यातच आता राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा येथे औरंगजेब बादशाहने कैद करुन ठेवले होते. परंतु शिवरायांनी स्वत:साठी नाही, तर हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन अतिशय चतुराईने तिथून निसटले. तसेच आमचे नेते एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले. पण शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी तिकडून म्हणजे शिवसेना पर्यायाने मविआ मधून बाहेर पडले, असे म्हणत मंगलप्रभात लोढा यांनी शिवसेना-मविआची तुलना औरंगजेबाशी तर एकनाथ शिंदे यांची तुलना शिवरायांशी केली आहे.

लोढा यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाने जोरदार निषेध नोंदवला असून या प्रकरणावरुन आता नवा वाद सुरू झाला आहे. आधीच छत्रपती शिवरायांवरून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठे वादंग सुरुच असतानाच आता पर्यटनमंत्री लोढा यांनी केलेल्या वक्तव्याची भर पडली आहे. प्रतापगडावर आज दि. ३० नोव्हेंबर रोजी ३६३ शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेश शिंदे आदी नेते उपस्थित होते. त्यावेळी भाषणात लोढा यांनी हे वादग्रस्त विधान केले.

यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत सरकारला चांगलेच सुनावले आहेत. या वाचाळविरांना आवरा हे मी सातत्याने सांगत आहे. एखाद्याला ठेच लागली तर दुसरा, ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करतो. परंतु, यांच्यात चूका करण्याची स्पर्धा लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासमोर ही तुलना करण्यात आली. पण, आपल्यावर जबाबदारी काय आहे, कोणाची तुलना करतो, कसे वागले आणि बोलले पाहिजे, याचं भान असायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाची तुलना होऊ शकते का? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले की , लोढा हे चुकून बोलले किंवा बोलण्याच्य ओघात अशी तुलना केल्याचे मी मानत नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराजांचा अपमान हा भाजपचा एककलमी कार्यक्रम झाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, मंगलप्रभात लोढा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा काही संबंध असेल, असे मला वाटत नाही. त्यांच्याकडे जरी पर्यटन खाते असले तरी त्यांना शिवरायांच्या इतिहासाबाबत कितपत माहिती आहे? हा अभ्यासाचा विषय आहे. त्यांना इतिहासाची जाण असेल किंवा त्याची बुद्धी असेल, असं मला वाटत नाही. मात्र याबाबत सारवासारव करताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, मंगल प्रभात लोढांनी जे उदाहरण दिले त्याचा अर्थ चुकीचा घेऊ नये. शिंदे हे दबावाखाली होते, कडेकोट बंदोबस्तात होते. त्यातून सुटका त्यांनी केली.

Tourism Minister Mangal Prabhat Lodha Controversial Statement
Eknath Shinde Shivaji Maharaj Agra Comparison

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अहमदनगर जिल्ह्यात १३ डिसेंबरपर्यंत लागू झाले हे आदेश; यावर असेल सक्त मनाई

Next Post

गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
1140x570 5

गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011