चाळीसगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा): चाळीसगाव तालुक्यातील मौजे कोंगानगर येथे रविवारी दुपारी शेतात काम करत असताना विजेचा अचानक फटका बसून तिघांचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे.
या घटनेत लखन दिलीप पवार (वय १४ वर्षे, रा. कोंगानगर),दशरथ उदल पवार (वय २४ वर्षे, रा. कोंगानगर), समाधान प्रकाश राठोड (वय ९ वर्षे, रा. जेहूर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांचा मृत्यू झाला. तर दिलीप उदल पवार (वय ३५ वर्षे) हे जखमी झाले असून त्यांच्यावर चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी चाळीसगाव, तहसीलदार चाळीसगाव, नायब तहसीलदार महसूल, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी शासकीय रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांना धीर दिला. पुढील मदत कार्यासाठी महसूल प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.