गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पालकमंत्री व कृषीमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत हे झाले निर्णय

मे 3, 2021 | 11:55 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210503 WA0026

नाशिक – कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या काळात शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागामार्फत नियोजन करण्यात येत आहे. तसेच कृषी विभागाच्या योजनांमध्ये ३० टक्के प्राधान्य माहिला लाभार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखली झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत कृषीमंत्री  भुसे दूरदृश्यप्रणालीद्वारे मालेगाव येथून बोलत होते. या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार डॉ. भारती पवार, आमदार सर्वश्री किशोर दराडे, नरेंद्र दराडे, दिलीप बनकर, दिलीप बोरसे, सौ. सरोज अहिरे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी उपसंचालक के. एस. शिरसाठ आदी उपस्थित होते.
कृषीमंत्री दादा भुसे यावेळी म्हणाले की, येणाऱ्या खरीप हंगामात जिल्ह्यातील महत्वाच्या पिकांची उत्पादकता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी एक गाव एक वाण ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर खते व बियाणांचे वाटप करण्याच्या मोहिमेला गेल्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने शेतकऱ्यांना बांधावर खतांचे वाटप करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. कृषी योजनांमध्ये महिलांनी सहभाग घेतल्यास त्याचा अधिक फायदा होतो, त्याअनुषंगाने महिलांना कृषीविषयक आधुनिक प्रशिक्षण देण्यात येवून कृषी योजनांमध्ये ३० टक्के महिलांना प्राधान्य देण्यात सोबतच अनुसुचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना देखील कृषी योजनांचा योग्य लाभ मिळण्यासाठी त्यांच्या आवश्यक माहितीचे संकलन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
खरीप हंगामाच्या दृष्टिने करण्यात येणाऱ्या नियोजनांविषयी बोलतांना कृषीमंत्री  भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना खरप हंगामासाठी वेळेत पिक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी नियमित पिककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शुन्य टक्के दराने कर्ज वाटप करण्यासाठी नियोजन करण्यात येत असून त्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येणार आहे. तसेच 10 टक्के नाविन्यपूर्ण पिकांच्या उत्पादन घेण्यासाठी कृषी विभागा नियोजनपूर्वक प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून विकेल ते पिकेल योजना यशस्वीपणे राबविण्यात आली असून यायोजनेसदेखील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच कापूस बियांणांची दरवाढ कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. रासायनिक खतांची  10 टक्के बचत करून जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
कडक निर्बंधांच्या काळात कृषीपूरक व्यवसायांच्या दुकानांना मुभा देण्यात यावी अशी मागणी कृषीमंत्री श्री. भुसे यांनी योवळी बैठकीत केली. तसेच  माननीय बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट योजनेंतर्गत अल्प आणि अत्यल्प भुधारक शेतकरी व कृषी उद्योजकांना केंद्र स्थानी ठेवून स्पर्धात्मक व सर्वसमावेशक कृषी मुल्य साखळ्या विकसीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून या योजनेचा शेतकऱ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन कृषीमंत्री श्री. भुसे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करणार : छगन भुजबळ
यावेळी बैठकीत मार्गदर्शन करतांना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जनतेला अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना वेळेत पिककर्ज उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
विधानसभा उपाध्यक्ष नररी झिरवळ म्हणाले, जिल्ह्याच्या आदिवासी भागातील शेतकरी आंबा, मशरूम, स्ट्रॉबेरी अशा विविध फळांची शेती करीत आहेत. याअनुषंगाने कृषी विभागाने या शेतकऱ्यांना ते घेत असलेल्या पिके व त्यांच्या उत्पादनाच्या वाढीच्या दृष्टिने योग्य मार्गदर्शन करण्यात यावे, असे विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवळ यांनी यावेळी सांगितले.
याबैठकीत जिल्हा परिषेदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार डॉ. भारती पवार, आमदार दिलीप बनकर, दिलीप बोरसे, किशोर दराडे यांनी चर्चेत सहभाग घेतला. तसेच बैठकीच्या सुरूवातील जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी लॉकडाऊन काळात कृषी विभागाने केलेल्या कामाची माहिती दिली. तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. शिरसाठ यांनी सादरीकरीणाद्वारे कृषी विभागाने जिल्ह्यात केलेल्या कामांची व खरीप हंगामासाठी केलेल्या नियोजनाची माहिती सादर केली.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चिंताजनक! कोरोनातच आता म्युकरमाक्रोसिस आजाराला सुरुवात

Next Post

प्रशांत किशोर आता काय करणार? त्यांनीच केला हा खुलासा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
E0ZCmgqVoAAWyhC

प्रशांत किशोर आता काय करणार? त्यांनीच केला हा खुलासा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011