ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. त्याचे पडसाद आता पक्षामध्ये उमटत आहेत. पवार यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा यासाठी पक्षातून दबाव वाढत आहे. त्यातच आता पक्षात राजीनामासत्र सुरू झाले आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव जितेंद्र आव्हाड यांनी आता त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनीही त्यांचे राजीनामे दिले आहेत.
यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे की, आदरणीय शरद पवार साहेब नेहमी म्हणतात की,”लोकशाही मध्ये जनतेचा कौल नेहमी मान्य करायचा असतो.मग तो आपल्या स्वत:च्या मर्जीविरुद्ध का असेना.हीच खरी लोकशाही आहे..!” अस असताना आता खुद्द पवार साहेबांनीच त्यांच्या या विचारांशी फारकत घेत काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.लोकशाहीत विश्वास ठेवणारे पवार साहेब असा निर्णय घेवूच कसा शकतात.हा निर्णय घेताना त्यांनी आम्हाला विश्वासात का नाही घेतलं..? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
आव्हाड पुढे म्हमाले की, राज्यात आणि देशात सध्या ज्या प्रकारच वातावरण आहे त्यात आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या शिवाय कसे लढू शकतो..आम्हाला त्यांची गरज आहे. आणि म्हणूनच मी जितेंद्र आव्हाड,पवार साहेबांनी घेतलेल्या धक्कादायक निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे.माझ्यासहित ठाण्यातील माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1653660002048147456?s=20
Thane Politics NCP Jitendra Awhad Resignation