रविवार, नोव्हेंबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

टार्गेट किलिंगमुळे काश्मिरमध्ये १९९०पेक्षा वाईट स्थिती; शेकडो जणांचे सामूहिक स्थलांतर

आत्तापर्यंत १८०० जणांसह तीन हजार कर्मचाऱ्यांनी खोरे सोडले

जून 3, 2022 | 12:43 pm
in संमिश्र वार्ता
0
FUObpk VIAA7LH1 e1654240361485

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काश्मीरला भारताचे मस्तक म्हटले जाते, तसेच भारताचे नंदनवन किंवा देशातील स्वर्गीय ठिकाण असे देखील म्हटले जाते. परंतु गेल्या काही दिवसात काश्मीर मधील वातावरण पुन्हा एकदा तणावपूर्ण बनले आहे. याला कारण म्हणजे दहशतवादी हल्ले आणि काश्मिरी पंडितांसह शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या हत्या सूत्र होय. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी काश्मीर मधून स्थलांतर करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळेच काश्मीर खोऱ्यात १९९० पेक्षा अत्यंत वाईट अवस्था असल्याचे दिसून येत आहे.

दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात ४८ तासांच्या आत आणखी एका हिंदू कर्मचाऱ्याच्या हत्येनंतर काश्मिरी पंडितांनी खोऱ्यातील सर्व ठिकाणी निदर्शने मागे घेतली आहेत. यासोबतच शुक्रवारी जम्मूच्या दिशेने मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व साथीदारांना काझीगुंड येथील नवयुग बोगद्याजवळ जमण्यास सांगितले आहे. आतापर्यंत 1800 काश्मिरी पंडितांसह तीन हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी खोरे सोडले आहे.

श्रीनगरच्या इंदिरा नगर परिसरात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी कडक निर्बंध कायम आहेत. काश्मिरी पंडित जिथे राहतात, तिथल्या परिसराबाहेर पोलीस आणि निमलष्करी दलांची मोठी तैनाती असते. कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. प्रसारमाध्यमांनाही त्याच्याजवळ जाऊ दिले जात नाही. काश्मीर खोर्‍यातील अशा जवळपास सर्वच ठिकाणांहून तशाच बातम्या येत आहेत. सूत्रांनी सांगितले की, काश्मिरी पंडितांच्या कॅम्पसला बाहेरून वेढा घालण्यात आला आहे

कुलगाममध्ये बँक मॅनेजरच्या हत्येनंतर दहशत आणखी वाढली आहे. काश्मिरी पंडित महिला कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती महिला जम्मूला जाण्याचे आवाहन करताना दिसत आहे. आता पुरे झाले असे ती म्हणत आहे. आपण अनेक वर्षांपासून येथे राहत आहोत पण आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाबाहेर आहे. त्यामुळे आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी घाटी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता आम्हाला तिथे नोकऱ्या द्यायची की नाही हे सरकारवर अवलंबून आहे.

बारामुल्ला जिल्ह्यातील वीरावण पंडित कॉलनीतील अवतार भट यांनी सांगितले की, आता आम्ही आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, दररोज होणाऱ्या हत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. काश्मीर अल्पसंख्याक मंचाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विजय कुमार यांच्या हत्येनंतर काश्मीरमधील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय एका विशेष बैठकीत घेण्यात आला. त्यांनी सांगितले की, आता अल्पसंख्यांकांकडे दुसरा पर्याय नाही, त्यामुळे त्यांनी शुक्रवारी जम्मूमध्ये स्थलांतर करावे. सर्वांना नवयुग बोगद्याजवळ जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तेथूनच पुढील रणनीती ठरवली जाईल.

https://twitter.com/ANI/status/1532583589245689856?s=20&t=6-SBw2HPUzRMGFNFQb_xWQ

गुरुवारी सकाळपासून काश्मिरी पंडितांनी अनेक ठिकाणी स्थलांतर करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या वसाहतीबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा दलांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले. दरम्यान, अनंतनागमधील मट्टान येथून सुमारे 21 कुटुंबे, बारामुल्ला येथून 5, शेखपोरा येथून 12, श्रीनगरमधून 7 कुटुंबे निघाली आहेत. एका काश्मिरी पंडिताने सांगितले की, यापेक्षा जास्त बाहेर पडले असते, पण सकाळी लवकर बाहेर पडणारा कोणीही निघू शकतो, पण तेव्हापासून कोणालाही बाहेर जाऊ दिले जात नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटीत सुमारे 8000 कर्मचारी आहेत, त्यापैकी सुमारे 1,800 असे आहेत, त्यांच्या कुटुंबातील सुमारे 3 ते 4 सदस्य आहेत. सुमारे 1300 लोकांना संक्रमण शिबिरात निवासी सुविधा मिळाली आहे तर उर्वरित भाड्याच्या घरात राहत आहेत. 12 मे रोजी राहुल भट यांच्या हत्येनंतर सुमारे 1800 काश्मिरी पंडित खोऱ्यातून जम्मूमध्ये स्थलांतरित झाले आहेत. आता जम्मूमध्ये आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

पीएम पॅकेज अंतर्गत कर्मचारी अमित कौल यांनी सांगितले की, परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. पुन्हा 4 खून झाले आहेत. 30-40 कुटुंबे शहर सोडून गेली आहेत. आमची मागणी पूर्ण झाली नाही. त्यांची (सरकारची) सुरक्षित ठिकाणे फक्त शहरात आहेत, श्रीनगरमध्ये सुरक्षित जागा उपलब्ध नाही. आणखी एक व्यक्ती आशु यांनी सांगितले की, येथे सुरक्षा कर्मचारीही सुरक्षित नाहीत, नागरिक स्वत:ला कसे वाचवतील. आणखी कुटुंबे श्रीनगर सोडतील. पोलिसांनी काश्मिरी पंडितांच्या छावण्या सील केल्या आहेत.

https://twitter.com/NCPspeaks/status/1532643443347820545?s=20&t=6-SBw2HPUzRMGFNFQb_xWQ

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हाजीर हो! राहुल गांधींना ईडीचे नवे समन्स; १३ जूनला होणार चौकशी

Next Post

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वड्रा यांनाही कोरोनाची लागण

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
priyanka gandhia

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वड्रा यांनाही कोरोनाची लागण

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011