मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – तरंग – समाज माध्यमांच्या प्रभावी माध्यमांची गरज!

by Gautam Sancheti
एप्रिल 11, 2021 | 12:43 am
in इतर
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


समाज माध्यमांच्या प्रभावी माध्यमांची गरज!

समाजमाध्यमे ही एक महत्त्वाचे व मोठे शस्त्र आहे. त्याचा वापर आपण कसा, किती आणि कुठे करतो यावर सारे काही अवलंबून आहे. अनेक संकटे आणि समस्यांवर समाज माध्यमांनी उत्तम तोडगा काढला आहे. हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.
IMG 20200829 WA0014
अशोक पानवलकर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
[email protected]
मी पाच जानेवारी २०२१ रोजी माझ्या वैयक्तिक ब्लॉगवर (www.ashokpanvakar.com ) एक पोस्ट लिहिली होती. तिचा काही भाग  आज पुन्हा शेअर करण्याचा मोह होतो आहे. – ”कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन झाल्यावर अनेक ज्येष्ठ नागरिकांची खूप अडचण झाली. रोजच्या जीवनावश्यक वस्तू घरात आणणे ही सुद्धा अडचणीची गोष्ट झाली. अशावेळी शेजारी-पाजारी अथवा मित्रमंडळींनी त्यांना जमेल तितकी मदत केली. अशा परिस्थितीत बेंगळुरूच्या ३९ वर्षीय महिता नागराज यांना ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका मैत्रिणीचा फोन आला. या मैत्रिणीचे वृद्ध आईवडील बेंगळुरूत राहतात आणि त्यांना मदतीची गरज आहे, काही करता येईल का, असे तिने महिता याना विचारले. महिता यांनी आवश्यक ती मदत तातडीने केली. परंतु, अशा प्रकारची मदत अनेकांना लागत असेल हे त्यांच्या लक्षात आले.
त्यामुळे त्यांनी एक चळवळ उभारायचे ठरवले. त्यातून स्थापना झाली ‘Caremongers India’ नावाची संघटना. अडचणीतल्या लोकांना मदत करायची इच्छा कोणाला आहे, असे त्यांनी फेसबुकवर विचारताच काही हजार लोकांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रत्येकाने जमेल तसे अडचणीतल्या लोकांना मदत करायला सुरुवात केली. हे काम सोयीचे व्हावे म्हणून त्यांनी फेसबुक ग्रुप सुरु केला, आज त्यांच्या कामात थोड्याथोडक्या नव्हे तर ५५,००० स्वयंसेवकांचा समावेश आहे. म्हणजे किती स्तरावर हे चांगले काम चालले असेल ते लक्षात येते. महिता फक्त फेसबुकपुरत्या थांबल्या नाहीत. त्यांनी whatsapp ग्रुपही केले आणि अधिक लोकांना जोडून घेतले. त्यांना मदतीसाठी रोज ८०० ते १५०० फोन येतात. तसेच whatsapp व SMS द्वारे २५०० लोक सपंर्क साधतात. त्यांना सर्व स्वयंसेवकांच्या मदतीने आधार देण्यात आला.
whatsapp

त्यांना फक्त बेंगळुरूमधूनच फोन येतात असे नाही, अन्य राज्यांमधूनही येतात. एकदा केरळमधील एका तान्ह्या मुलाला ७२ तासांच्या आत एक विशिष्ट इंजेक्शन देण्याची गरज आहे असे त्यांना कळले. ते इंजेक्शन सहज उपलब्ध होत नव्हते. महिता यांनी स्वयंसेवकांच्या मदतीने ते शोधले. ते पुण्यात उपलब्ध असल्याचे त्यांना कळले. तातडीने ते मिळवून ४८ तासांच्या आत त्या मुलाला मिळेल अशी व्यवस्था केली. विशेष म्हणजे ज्या हजारो लोकांना त्यांनी व स्वयंसेवकांनी मदत केली त्यांना त्या प्रत्यक्षात एकदाही भेटल्या नाहीत. सारे काही फेसबुक आणि whatsapp च्या माध्यमातून चाललेले असते. हे काम प्रामुख्याने चार गटातल्या लोकांसाठी चालते. १. ज्येष्ठ नागरिक २. शारीरिकदृष्ट्या अपंगत्व असलेले लोक. ३. बारा महिन्यांच्या खालील वयोगटातील अर्भके ४. ज्याना अन्य गंभीर आजार आधीपासून आहेत असे लोक.”

समाजमाध्यमांचा किती प्रभावी वापर होऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. हे उदाहरण पुन्हा अशासाठी द्यावेसे वाटले की अशा अनेक उदाहरणांची आज गरज आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर कोरोना पुन्हा वेगाने वाढत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयावह स्वरूप धारण करील अशी भीती प्रत्यक्षात येऊ पाहात आहे. ”आता लस आली आहे, आपण निर्बंध पाळले नाहीत तरी चालेल ” अशाच भावनेतून लोक वागायला लागले.
आज लोकांना निर्बंध पाळायला सांगणाऱ्या नेत्यांनी मोठ्या गर्दीचे राजकीय मेळावे, लग्नसमारंभ याना हजेरी लावायला सुरुवात केली आणि आपण नक्की वागायचे कसे याबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला. खरे म्हणजे राजकीय नेत्यांनी स्वतःचे वर्तन आदर्श ठेवायला हवे होते. तसे काही नेत्यांच्या बाबतीत दिसले नाही. रस्त्यावरची बेबंद गर्दी वेगवेगळ्या कारणामुळे होती. कामावर जाण्याशिवाय पर्याय नाही म्हणून अपरिहार्यपणे रस्त्यावर आलेले लोक, भाज्या, औषधे आदी जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी आलेले लोक आणि आता निर्बंधांची गरज नाही असे वाटून मुक्तपणे (मास्कशिवाय) फिरणारे लोक अशा सगळ्यांनी गर्दी केली. त्याचा परिणाम काय झाला हे आपण पाहतो आहोतच.
मोबाईल
प्रातिनिधीक फोटो
आज बऱ्याच रुग्णालयांमध्ये नवीन रुग्णाला जागा उरलेली नाही. आपल्याला कोरोना झाल्यावर जेवढी भीती वाटत नाही त्याच्यापेक्षा जास्त भीती रुग्णालयात जागा मिळेल का याची वाटते अशी स्थिती आहे. त्यातच लसीच्या पुरवठ्यावरून वाद झाल्याने आजच्या घडीला बऱ्याच ठिकाणचे लसीकरण बंद झाले आहे. ते एकदोन दिवसात सुरु होण्यासारखे असले तरी नियमित लसीकरण चालू राहील का याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. या सगळ्या गदारोळात समाजमाध्यमांची आज फार गरज आहे असे मला वाटते.
आज बऱ्याच ठिकाणी Whatsapp , फेसबुकसारख्या माध्यमातून कोरोना रुग्णांना मदत करण्याचे काम चालू आहे. हे काम बरेचसे वैयक्तिक पातळीवर चालते. हे काम वर्तमानपत्रे किंवा टीव्ही चॅनेल करू शकणार नाहीत.
गुरुवारचे उदाहरण देतो. मुंबईत लशीअभावी अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली. ज्यांचे त्या दिवशी लसीकरण होणार होते त्यांना कोणतीही अधिकृत माहिती मिळत नव्हती. मोठ्या दैनिकांनीही मोघम बातम्या छापल्या होत्या. मुंबईपुरते बोलायचे तर लसीकरणासाठी बीकेसी व नेस्को मैदान या दोन मोठ्या सोयी महापालिकेने केल्या आहेत. कितीही गर्दी असली तरी तेथील काम अतिशय नियोजनबद्ध, शिस्तबद्ध पद्धतीने चालते असा माझा अनुभव आहे.
शिवाय इतर सरकारी व खासगी रुग्णालयांतही बऱ्यापैकी शिस्त पाळली जाते. परंतु, लसीच्या तुटवड्यामुळे गुरुवारी आपल्याला लस मिळणार की नाही, याची माहिती थेट बातमी हवी होती,  ती  कोणीही प्रसिद्ध केली नाही. वाचकाला थेट बातम्या लागतात. ‘मला आज लस मिळणार की नाही हे सांगा” असे त्याचे म्हणणे असते. त्याची नेमकी  माहिती न मिळाल्याने हजारो लोकांची गैरसोय झाली. अशा वेळेस समाजमाध्यमांचा वापर प्रभावीपणे झाला असता तर सारा गोंधळ टळला असता.
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो
हे मी मुंबईपुरते म्हणत नाही. अनेक शहरांमध्ये अनेक महिता नागराज पुढे येण्याची गरज आहे. (हे नाव प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे. केवळ महिलांनी पुढे यावे हे सांगण्याचा हेतू नाही) माझ्या माहितीप्रमाणे मुंबईत बरीच पोलिस स्टेशन्स आपल्या भागातील नागरिकांच्या संपर्कात असतात. त्यासाठी ते प्रामुख्याने whatsapp चा वापर करतात. त्यांच्या ग्रुपमध्ये शेअर झालेली माहिती विश्वासार्ह असते. असेच whatsapp समूह ठिकठिकाणी तयार झाले आणि त्यातून विश्वासार्ह माहितीचा प्रसार झाला तर गुरुवारी राज्यभर झाला तसा गोंधळ टाळता आला असता.
कोणत्या रुग्णालयात जागा उपलब्ध आहे, कुठे व्हेंटिलेटर उपलब्ध आहे वगैरे माहिती देणारी एखादी विश्वासार्ह यंत्रणा असायला हवी. ती सरकारनेच उभारायला हवी असा माझा आग्रह नाही. खासगी पातळीवरूनही ती उभारता येईल. सध्या वैयक्तिक पातळीवर एकमेकांना माहिती देण्याचे काम चालू आहेच. रुग्णालयांशिवाय एखाद्या हॉटेलने, सामाजिक संस्थांनी एखादे विलगीकरण केंद्र उभारले असेल तर त्याची माहिती सध्याही खासगी whatsapp  अथवा  अन्य समाजमाध्यमांद्वारे पसरविली जात आहेच. त्या प्रयत्नांना अधिक संस्थात्मक रूप यायला हवे.
मी जेव्हा कोरोनासंदर्भात समाजमाध्यमांचा अधिक उपयोग करण्याचे सुचवितो तेव्हा ते दुधारी शस्त्र आहे याची मला जाणीव आहे. कोरोनाविषयी दिशाभूल करणारी बातमी वा माहिती शेअर झाली तर त्याचे भयावह परिणाम होऊ शकतात. त्याचप्रमाणे अफवा पसरवल्या गेल्या तर त्याचेही विपरीत परिणाम होऊ शकतात. म्हणूनच या समाजमाध्यमांचा खूप जबाबदारीने वापर करणारी यंत्रणा हवी हेही सांगायला हवे.
आता गावागावात व शहरांत असे ग्रुप पूर्ण जबाबदारीने नक्की चालू असतील आणि ते खूप महत्वाचे काम करत असतील असे वाटते. ती चळवळ फक्त कोरोना संदर्भातच हवी असे नाही. ऐनवेळी रक्ताची गरज भासली तर याचा उपयोग होऊ शकेल. किंवा अन्य अनेक कारणासाठी उपयोग होईल. सगळे काम सरकारनेच केले पाहिजे असे नाही. सरकारी यंत्रणेला पूरक म्हणून समाजमाध्यमे चांगल्या पद्धतीने कशी काम करतील ही पाहण्याची आज सर्वात जास्त गरज आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

साप्ताहिक राशिभविष्य – ११ ते १८ एप्रिल २०२१

Next Post

 अबब! तब्बल १६ फुटांचा किंग कोब्रा; वनकर्मचाऱ्यांचा निघाला चांगलाच घाम

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी प्रलोभनांपासून दूर रहावे, जाणून घ्या,बुधवार, १७ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 16, 2025
IMG 20250916 WA0355 1
स्थानिक बातम्या

नाशिकच्या आधाराश्रमातील कर्णबधिर बालकाला अमेरिकेतील दाम्पत्याने घेतले दत्तक…

सप्टेंबर 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात झाली ही वाढ

सप्टेंबर 16, 2025
election11
संमिश्र वार्ता

या विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर…

सप्टेंबर 16, 2025
nsp 1024x305 1
राष्ट्रीय

राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची ही आहे अंतिम तारीख….

सप्टेंबर 16, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकल चोरीला

सप्टेंबर 16, 2025
IMG 20250916 WA0298 1
संमिश्र वार्ता

कांदा प्रश्नावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक…दिले हे निर्देश

सप्टेंबर 16, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले हे निर्देश….आता या तारखेपर्यंत मुदतवाढ

सप्टेंबर 16, 2025
Next Post
EyH76W UcAQVHeF

 अबब! तब्बल १६ फुटांचा किंग कोब्रा; वनकर्मचाऱ्यांचा निघाला चांगलाच घाम

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011