रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

तहसीलदारांच्या प्रयत्नाने या गावात बांधावरच न्यायनिवाडा…दोन पिढ्यांपासून चालत आलेला वाद मिटला

जानेवारी 6, 2025 | 12:55 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20250105 WA0267 1

अहिल्यानगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांच्या प्रयत्नांमुळे कोपरगाव तालुक्यात मौ.जेऊर कुंभारी गावातील दोन वेळा न्यायालयाचा निकाल लागूनही किरकोळ गैरसमजांमुळे बंद असलेला शेतरस्ता तहसीलदारांनी बांधावरच न्यायनिवाडा करून खुला केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

मौ.जेऊर कुंभारी गावातील १० फूट रुंदीचा व ६०० मिटर लांबीचा रस्ता सख्ख्या चुलत्या – पुतण्यातील वादात अडकला होता. त्यामुळे दोघांमध्ये कटुता निर्माण झाली होती. हे प्रकरण दोन पिढ्यापासून सुरू होते. दोघी बाजूंनी न्यायालयाच्या पायऱ्याही झिजविल्या. शासकीय कार्यालयाचे हेलपाटेही झाले. दोघांच्या वेळ आणि पैसा खर्च झाला, दोनदा न्यायालयात निर्णयही झाला. असे असतांनादेखील वाद संपुष्टात येत नव्हता. अशावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे निर्देश दिल्याने त्याचाच एक भाग म्हणून तहसीलदार सावंत यांनी सुरू केलेल्या बांधावर न्यायनिवाडा करण्याच्या मोहिमेंतर्गत या प्रकरणाकडे लक्ष घातले.

त्यांनी शेतावर जावून दोघी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. किरकोळ गैरसमजातून दोघांचे नुकसान होत असल्याचे त्यांना पटवून दिले. संवेदनशील पद्धतीने सामंजस्य दाखविण्याचे दोघांना आवाहनदेखील केले. एकाने मोठेपणा दाखविणे आणि दुसऱ्याने माघार घेणे यात दोघांचे मोठेपण असल्याचे सावंत आणि इतर उपस्थित पंचांनी त्यांना पटवून दिल्याने दोन्ही २ वेळा न्यायालयाचे निर्णय होवूनही न मिटलेला आपापसांतील शेतरस्त्याचा वाद मोक्यावरच मिटवून घेण्यासाठी तयार झाले आणि आपापसात तडजोड करीत वाद मिटवला. हा शेतरस्ता आपपसांतील सहमतीने प्रतिवादीने (चुलत्याने) वादीला (पुतण्याला) मोकळा करून दिला. वादापोटी एकमेकांवर धावून जाणारे चुलते – पुतण्यांनी आपल्या भावनांना वाट करून देत एकमेकांना मिठीदेखील मारली आणि हा प्रसंग पाहून ग्रामस्थांना देखील आनंद झाला.

शेतकऱ्यांचे बरेचसे रस्त्यांचे वाद-विवाद हे किरकोळ गैरसमज किंवा थोडासा मीपणा बाजूला ठेवला तर जागेवरच मिटू शकतात. शेतकऱ्यांना कोर्टकचेरी , पोलीस केसेस करणे परवडत नाही. यामुळे वेळेचा व पैशांचा अपव्यय तर होतोच सोबत शेतीकडेही दुर्लक्ष होते , वैमनस्यात वाढ होत जातो आणि शेतकरी हा नेहमी तणावपूर्ण मानसिकतेत राहतो. दोघांनाही जिवापाड जपलेल्या शेतीची रस्त्याच्या भांडणापाई व कोर्ट केसेस लढवतां लढवतां ती जमीनच विक्री करण्याचीही कधीकधी वेळ येते. परंतु दोघांनीही मनाचा थोडासा मोठेपणा दर्शवला व मीपणा थोडावेळ दूर ठेवला तर मागच्या दोन पिढ्यांपासून चालत आलेला वाद पुढच्या पिढ्यांना करावा लागणार नाही हे तहसीलदार कोपरगाव महेश सावंत व इतर उपस्थित पंचांनी समजावून सांगितल्यावर सुरुवातीला एकमेकांवर धावून जाणारे शेतकरी जे भावनिक होतं फिल्मी स्टाईलमध्ये एकमेकांना भेटले .

सख्खे चुलते पुतणे यानिमित्ताने आपापसांतील गैरसमज व भांडणतंटा दूर करून एकत्र आल्याचा आनंद सर्वच उपस्थितांना झाला . वादी व प्रतिवादी तसेच त्यांचे नातेवाईक व उपस्थित प्रतिष्ठित पंच यांनी प्रशासनाचे आभार मानले.

अशाच प्रकारचा चुलते – पुतणे यांच्यातील आणखी एक शेतरस्ता आडवल्याबाबतचा वाद कोपरगाव तालुक्यातील मौ. शाहजापूर येथेही सुरू होता. हाणामारी आणि भांडणे होवून पोलीस स्टेशनला अनेकदा तक्रारी होवून गुन्हेही दाखल झाले होते. परंतू याच पद्धतीने शेतकऱ्यांना समजावून सांगत हा वाददेखील बांधावरच मिटविण्यात आला. प्रशासनाने संवेदनशीलतेने काम केल्यास नागरिकांचे प्रश्न सहजपणे सोडवून त्यांना दिलासा देता येतो हे कोपरगावच्या महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांचे प्रश्न सोडूवन दाखवून दिले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या कामांमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

Next Post

सौराष्ट्रात पोरबंदर येथे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त…तीन जणांचा मृत्यू

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Untitled 5

सौराष्ट्रात पोरबंदर येथे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त…तीन जणांचा मृत्यू

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011