रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

T20 विश्वचषक: भारताचा पहिला सामना पाकिस्तानशीच; बघा, संपूर्ण वेळापत्रक

by Gautam Sancheti
जानेवारी 21, 2022 | 10:57 am
in मुख्य बातमी
0
T20 world cup

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – क्रिकेट जगभरातील अनेकांचा आवडता खेळ मानला जातो. भारतात बहुतांश नागरिक क्रिकेटप्रेमी आहेत. त्यामुळे क्रिकेटचे सामने कधी होणार? याची प्रत्येकाला उत्सुकता असते, मग आयपीएल असो की टी-20 सामने. त्याच्या तारखा जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते. या वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले असून भारताचा पहिला सामना संघाच्या पारंपारिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशीच होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

भारताला या स्पर्धेतील पहिला सामना दि. 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. 2015 च्या विश्वचषकादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटचा सामना ऑस्ट्रेलियातील अॅडलेड येथे झाला होता. स्पर्धेचे पहिले 6 दिवस म्हणजे 16 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सामना खेळवला जाईल. त्यानंतर 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 चे सामने सुरू होतील.

T20 विश्वचषकाची आठवी आवृत्ती 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात ठिकाणी खेळवली जाईल. 13 नोव्हेंबर रोजी MCG येथे अंतिम सामना खेळवला जाईल. सुपर 12 साठी संघ दोन गटात विभागले गेले आहेत. गट 1 मध्ये सध्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचे संघ आहेत. तर दुसरीकडे भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश गट 2 मध्ये आहेत.

पहिल्या फेरीच्या निकालानंतर या 8 संघांव्यतिरिक्त आणखी 4 संघ सुपर 12 मध्ये पोहोचतील. गतविजेता आणि यजमान ऑस्ट्रेलियाचा सामना 22 ऑक्टोबरला सुपर 12 च्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडशी होणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 आंतरराष्ट्रीय संघ 45 सामने खेळणार आहेत.

https://twitter.com/T20WorldCup/status/1484303360954347520?s=20

टी-20 विश्वचषकात भारताला ग्रुप-2 मध्ये ठेवण्यात आले आहे. या गटात भारतासोबतच बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांचाही समावेश आहे. भारतीय संघ आपला दुसरा सामना दि. 27 ऑक्टोबर रोजी गट 1 च्या उपविजेत्या संघासोबत खेळणार आहे. यानंतर दि. 30 ऑक्टोबरला भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा सामना खेळायचा आहे. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर भारत दि. 2 नोव्हेंबरला अॅडलेडच्या ओव्हलवर बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरेल. शेवटच्या गटात त्यांचा सामना दि. 6 नोव्हेंबर रोजी एमसीजीमध्ये ब गटातील विजेत्याशी होईल.

T20 विश्वचषक 2022 चे उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी खेळवले जातील. त्याच वेळी, त्याचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळवला जाईल. साधारणता सेमीफायनल आणि फायनल या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता असते हे सामने स्टेडियमवर किंवा टीव्हीवर पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी दिसून येते.

भारताचे सामने असे
– भारत विरुद्ध पाकिस्तान, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड – 23 ऑक्टोबर
– भारत विरुद्ध गट अ उपविजेता, सिडनी क्रिकेट ग्राउंड – 27 ऑक्टोबर
– भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्थ स्टेडियम – 30 ऑक्टोबर
– भारत विरुद्ध बांगलादेश, अॅडलेडवर – 2 नोव्हेंबर
– भारत विरुद्ध गट ब उपविजेता संघ – मेलबोर्न – 6 नोव्हेंबर

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्नासाठी हे आहेत सर्वोत्तम ४ पर्याय; दरमहा मिळेल रक्कम

Next Post

वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा पूर्ण अधिकार आहे की नाही? सुप्रिम कोर्टाने दिला हा महत्त्वपूर्ण निकाल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
cbi
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये सीबीआयने दोन बेकायदेशीर कॉल सेंटर केले उदध्वस्त…दोन जणांना अटक

सप्टेंबर 14, 2025
Jayant Patil e1701442690969
संमिश्र वार्ता

भारत आणि पाकिस्तानमध्ये होणा-या सामन्यावर जयंत पाटील यांनी दिली ही प्रतिक्रिया….

सप्टेंबर 14, 2025
GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

आशिया कप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारा हायव्होल्टेज सामना रद्द होणार? पडद्यामागे हालचाली सुरु

सप्टेंबर 14, 2025
modi 111
राष्ट्रीय

पंतप्रधानाच्या हस्ते मणिपूरमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन…

सप्टेंबर 14, 2025
भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा1 971x420 1
संमिश्र वार्ता

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संरक्षण उत्पादन उद्योगासाठी सहाय्यभूत ठरेल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 14, 2025
Kia Range 1
संमिश्र वार्ता

किया इंडियाची घोषणा…ग्राहकांना मिळणार १.७५ लाख रूपयांपर्यंत हा फायदा

सप्टेंबर 14, 2025
Next Post
SC2B1

वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा पूर्ण अधिकार आहे की नाही? सुप्रिम कोर्टाने दिला हा महत्त्वपूर्ण निकाल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011