रविवार, जुलै 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

स्पेशल रिपोर्ट…. बंदरामुळे सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाची व्यवहार्यता संपली…

by Gautam Sancheti
जून 28, 2025 | 1:44 pm
in संमिश्र वार्ता
0
road 1

श्याम उगले, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक : देशाच्या एकूण निर्यात उलाढालीत ६० टक्के वाटा असलेल्या जेएनपीटी(जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण) बंदराच्या तिप्पट क्षमता असलेले वाढवण बंदर २०२९ मध्ये सुरू होणार आहे. यामुळे भारतमाला योजनेची व्यवहार्यता संपली असून भारत सरकारने देशातील प्रमुख बंदर व औद्योगिक कॉरिडॉर यांना महामार्गाने जोडणारी भारतमाला परियोजना गुंडाळली आहे. याचा फटका सुरत चेन्नई या ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे ला बसला आहे. यामुळे वाढवण बंदरामुळे सुरत-चेन्नई एक्सप्रेसवे गुंडाळला गेल्याचे स्पष्ट झाले असून केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी त्याला यश मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

देशातील जहाजांद्वारे परदेशात माल वाहतुकीच्या ६० टक्के वाहतूक एकट्या जवाहरलाल नेहरू बंदरावरून होत असते. सध्या हे बंदर पूर्ण क्षमतेने वापरले जात आहे. जवाहरलाल नेहरू बंदराची क्षमता पूर्ण वापरली जात असल्याने भविष्यात निर्यात वाढवण्यासाठी इतर बंदराच्या क्षमतांचा वापर करणे गरजेचे होते, यामुळे देशातील प्रमुख बंदरे एकमेकांना जोडणे व देशातील प्रमुख औद्यीगिक कॉरिडॉर व बंदरे एकमेकांना जोडणे यासाठी केंद्र सरकारने भारतमाला परियोजना जाहीर केली होती. या योजनेतून देशभरात बंदरे व औद्योगिक पट्टे एकमेकाना जोडून वेगाने व स्वस्त वाहतूक जाळे उभारण्यात आले. याच योजनेतून सुरत व चेन्नई या दोन बंदराना जोडणारा १६०० किलोमीटरचा ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे प्रस्तावित केला. या महामार्गामुळे दोन बंदरे तसेच अनेक औद्योगिक वसाहती एकमेकांना जोडल्या जाणार होत्या. दरम्यान महाराष्ट्र सरकारने पालघर जिल्ह्यात वाढवण येथे नवीन बंदर प्रस्तावित केले. त्याला पर्यावरण मान्यताही मिळवली.वाढवण बंदर हे जगातील प्रमुख मोठ्या दहा बंदरांपैकी एक असून जवाहरल नेहरू बंदराच्या तिप्पट क्षमतेचे आहे. यामुळे जवाहरलाल नेहरू बंदराची क्षमता संपल्यावर काय, या प्रश्नाचे उत्तर वाढवण बंदर हे उत्तर मिळाल्याने भारत सरकारने भारत माला परियोजना गुंडाळण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी देशातील पश्चिम, उत्तर, मध्य, दक्षिण रेल्वेमार्ग एकमेकांना जोडून ते वाढवण बंदराशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आधीच एकमेकांना जोडलेले भारतमाला योजनेतील मार्ग वाढवण बंदराला जोडण्याचे नियोजन सुरू केले.

त्यासाठी मुंबई आग्रा महामार्ग व समृद्धी महामार्ग यांना जोडण्यासाठी वाढवण-इगतपुरी हा नवीन महामार्ग प्रस्तावित केला आहे. भारतमाला योजना गुंडाळल्याने सुरत चेन्नई मार्गाचे भूसंपादन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा फटका महाराष्ट्रातील नाशिक, अहल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यातील मार्गाला प्रामुख्याने बसला. सोलापूर ते चेन्नई दरम्यान या महामार्गाचे काम सुरू असून नाशिक, नगर व सोलापूरमधील काम थांबले आहे. स्वतः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच याबाबत अधिकृतपणे माहिती देऊन या कामाला केंद्रिय मंत्रिमंडळाची मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करीन, असे सांगायलाही दोन महिने उलटून गेले आहेत. वाढवण बंदरामुळे आता देशातील बंदरे एकमेकांना जोडण्याची गरज संपलेली असल्याने पेठ, सुरगाणा व गुजरातमधील जंगल जमीन वापरून त्यावर रस्ते उभारण्याची निकड उरलेली नसल्याने हा महामार्ग जवळपास रद्द झाल्यात जमा आहे.
…
पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गाचा पर्याय
सुरत चेन्नई महामार्गामुळे नाशिक-अहल्यानगर न सोलापूर यांच्या दरम्यान थेट महामार्ग होऊन त्यावरील औद्योगिक वसाहती एकमेकींना जोडल्या जाणार होत्या. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतही या मार्गाने जोडली जाणार होती. आता हा महामार्ग रद्द झाल्याने पुणे बाह्यवळण रस्ता ते रांजणगाव-नगर- शिर्डी, सिन्नर व ओझर असा नाशिक पुणे औद्योगिक महामार्ग प्रस्तावित केला आहे. नाशिकवरून तो मार्ग थेट वाढवण बंदराला जोडला जाईल. यामुळे भारत माला योजनेचा उद्देशही साध्य होईल, या हेतूने महाराष्ट्र सरकारने तो महामार्ग प्रस्तावित केला असून भविष्यात तो केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडूनही केला जाऊ शकतो.
shaymugale74@gmail.com

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी मुंबईत निधन

Next Post

मनसेच्या दणक्याने जेएनपीटीने घेतला हा निर्णय….

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Raj Thackeray

मनसेच्या दणक्याने जेएनपीटीने घेतला हा निर्णय….

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी महत्वाच्या कामांकडे लक्ष द्यावे, जाणून घ्या, सोमवार, २८ जुलैचे राशिभविष्य

जुलै 27, 2025
FB IMG 1753625870303

अखेर सुनील बागुल व मामा राजवाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 27, 2025
KIA Logo

किया इंडियाने सर्टिफाईड प्री-ओन्‍ड नेटवर्क १०० आऊटलेट्सपर्यंत वाढवले

जुलै 27, 2025
IMG 20250727 WA0342 1

नाशिकरोडला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण

जुलै 27, 2025
kanda 11

राज्य सरकारला खरोखरच कांदा धोरण ठरवायचे आहे का? कांदा संघटनेचा सरकारला सवाल

जुलै 27, 2025
alert1

राज्यातील या भागात ऑरेंज अलर्ट…सतर्क राहण्याच्या सूचना

जुलै 27, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011