मंगळवार, सप्टेंबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाबाबत झाला हा महत्त्वाचा निर्णय

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 16, 2022 | 7:55 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातून जाणारा सुरत-चेन्नई ग्रीन फिल्‍ड महामार्ग हा जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाचा आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर जल अभियान राबविण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर ग्रामीण पाणी पुरवठा व जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात येणारी पाणी पुरवठ्याची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. भारती पवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज संसद रस्ता सुरक्षा समिती, सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग, ग्रामीण पाणी पुरवठा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाबाबत आयोजित आढावा बैठकीत डॉ. पवार बोलत होत्या. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, अधीक्षक अभियंता सुनंदा नरवाडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, वासंती माळी, जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशनचे कार्यकारी अभियंता पी. सी. भांडेकर, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग पूर्ण झाल्यास वेळेची व इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे. तसेच या महामार्गामुळे इतर राज्यासोबत जिल्ह्याची दळणवळण व्यवस्था वाढणार असून व्यापार वृद्ध होणार आहे. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नर या तालुक्यातून हा महामार्ग जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्या भागातील शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तालुकास्तरावर बैठका घेण्यात याव्यात, असेही राज्यमंत्री डॉ. पवार यांनी सांगितले.

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा मार्ग आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने होणे गरजेचे आहे. या महामार्गाचा एकूण १२२ किमी मार्ग नाशिक जिल्ह्यातून जात आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करण्याचे काम सुरू आहे. हा मोठा प्रकल्प आहे. लवकर काम सुरू होईल. शेतकऱ्यांना भूसंपादनच्या बदल्यात योग्य मोबदला मिळेल. इतर राज्याला जोडणारा हा चांगला प्रकल्प आहे .या प्रकल्पातून कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. जागेचा मोबदला देण्याबाबत अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाणाक आहे. प्रत्येक जागेनुसार दर ठरवता ठरवला जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

जलजीवन मिशन, ग्रामीण पाणी पुरवठा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागांमार्फत करण्यात येणारी कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्यात यावीत. तसेच ज्याठिकाणी ही कामे झाली आहेत तेथे त्या कामांच्या माहितीचे फलक लावण्यात यावेत. तसेच रस्ता सुरक्षेबाबत मोठ्या शहरांमध्ये करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यात येवून त्यानुसार आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच स्वयंसेवी संघटनांची मदत घेवून शाळा व महाविद्यालयांमध्ये वाहतूक नियमांची जनजागृती करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या.

Surat Chennai Highway Review Meeting Nashik

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हवाई प्रवासाबाबत केंद्र सरकारने घेतला हा निर्णय; आता हे सक्तीचे नाही

Next Post

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

bhujbal 11
संमिश्र वार्ता

छगन भुजबळांची नाराजी कायम…मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले हे पत्र

सप्टेंबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

घर गहाण प्रकरणात दहा लाखाला गंडा….अशी केली फसवणूक

सप्टेंबर 9, 2025
accident 11
क्राईम डायरी

अपघातांची मालिका सुरूच…. वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोन पादचारींचा मृत्यू

सप्टेंबर 9, 2025
Untitled 6
मुख्य बातमी

अखेर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा राजीनामा…हिंसाचारानंतर निर्णय

सप्टेंबर 9, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण चार निर्णय

सप्टेंबर 9, 2025
IMG.02
संमिश्र वार्ता

रावेरचे शरद पवार गटाचे माजी आमदार यांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश

सप्टेंबर 9, 2025
Screenshot 20250909 123855 WhatsApp
संमिश्र वार्ता

राहुड घाटात गॅस टँकरचा अपघात होऊन गॅस गळती सुरु…वाहतुकीची कोंडी

सप्टेंबर 9, 2025
GwyqMwabYAA1fOl e1757399728553
संमिश्र वार्ता

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू…आज या संघा दरम्यान सामना

सप्टेंबर 9, 2025
Next Post
FhsDsR5UoAAVNjr 1140x570 1

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011