अजय सोनवणे, मनमाड
महाविकास आघाडी सरकारने आदिवासींच्या केंद्र व राज्य सरकारच्या योजना घरोघरी पोहचवल्या असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी सुरगाणा तालुक्यातील आवळपाडा येथे शिवसेनेने आयोजित केलेल्या एकशे एक आदिवासी जोडप्यांच्या विवाह सोहळ्या प्रसंगी केले. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे पदाधिकारी म्हाडाचे अध्यक्ष विनोद घोसळकर. जयंत दिंडे, सुनिल पाटील, भाऊसाहेब चौधरी, विजय करंजकर, शिवसेना तालुकाप्रमुख प्रमुख मोहनराव गांगुर्डे, सुरगाणा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष उपस्थित होते. यावेळी सावंत यांनी मंगलाष्टके स्वत: म्हणत इतरांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी मोहन गांगुर्डे यानी नववधूराना संसार उपयोगीचे वस्तुचे वाटप केले.