शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राजद्रोहाच्या कलमाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल

by Gautam Sancheti
मे 11, 2022 | 12:18 pm
in मुख्य बातमी
0
SC2B1

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयाने आज राजद्रोहाच्या कलमासंदर्भात मोठा निकाल दिला आहे. राजद्रोहाचे कलम १२४ अ यास तूर्तास स्थगिती देण्यासह पुढील आदेशापर्यंत या कलमाअंतर्गत कुठलाही गुन्हा दाखल करु नये, असेही न्यायालयाने बजवाले आहे. या कलमाद्वारे गुन्हे दाखल झालेल्या आणि प्रलंबित गुन्ह्यांबाबत आरोपींनी न्यायालयात दाद मागावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

देशात सध्या लागू असलेले देशद्रोहाचे कलम हे गेल्या अनेक दशकांपासून कायम आहे. या कलमातील अनेक तरतुदींवर पुनर्विचार करण्याचे न्यायालयाने सांगितले होते. यासंदर्भात केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसे प्रतिज्ञापत्र न्यायालयात केंद्राने सादर केले आहे.

देशद्रोह कायद्यातील दंड संहिता (आयपीसी)च्या कलम १२४ए च्या वैधतेची चौकशी आणि फेरविचार करणार असल्याचे केंद्राने सांगितले. प्रतिज्ञापत्रात सरकारने म्हटले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनातून देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. पारतंत्र्यात असताना बनवलेल्या या कायद्यावर फेरविचार करणे आवश्यक आहे. देशद्रोह कायद्याच्या आक्षेपांबद्दल केंद्र सरकारला माहिती आहे. अनेकदा मानवाधिकारावरूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखणे हे या कायद्याचे उद्दिष्ट असायला हवे.

प्रतिज्ञापत्रानुसार, आयपीसीच्या १२४ ए या कलमातील तरतुदींवर फेरविचार करण्याची वेळ आली आहे. या कायद्याच्या वैधतेच्या चौकशीची प्रक्रिया सुरू असताना वेळ वाया घालवू नये, अशी विनंती केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. देशावर इंग्रजांचे राज्य असताना बनवलेल्या या कायद्याची चौकशी करण्याची मागणी अनेक याचिकांद्वारे करण्यात आली होती. केंद्राने याच याचिकांना उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

देशद्रोह कायद्याचा आढावा घेण्याची गरज नाही, असे केंद्राने यापूर्वी सांगितले होते. या कायद्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिका रद्द कराव्यात अशी मागणीही केंद्राने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. देशद्रोह कायद्याविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया, टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांचा समावेश आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चिंताजनक! यंदा चारधाम यात्रेत अचानक २१ जणांचा मृत्यू; पंतप्रधान कार्यालयाने घेतली दखल

Next Post

कसारा घाटात क्रूझरवरील नियंत्रण सुटल्याने अपघात; ७ जण जखमी, १ बालिका ठार 

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Untitled 16
महत्त्वाच्या बातम्या

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस या शहारात सुरू होणार…

सप्टेंबर 13, 2025
Maharashtra Police e1705145635707
संमिश्र वार्ता

पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मिळणार संधी….

सप्टेंबर 13, 2025
accident 11
स्थानिक बातम्या

ताहाराबाद – अंतापूर मार्गावर पिकअप व्हॅन आणि टाटा कारचा अपघात…तीन जणांचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी

सप्टेंबर 13, 2025
Untitled 14
महत्त्वाच्या बातम्या

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान टँकरने धडक दिल्याने ८ जणांचा मृत्यू, २० जण जखमी….कर्नाटकातील घटना

सप्टेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शनिवार, १३ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 12, 2025
Next Post
IMG 20220511 WA0013 1 e1652256229881

कसारा घाटात क्रूझरवरील नियंत्रण सुटल्याने अपघात; ७ जण जखमी, १ बालिका ठार 

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011