रविवार, नोव्हेंबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

उन्हापासून बचावासाठी गोड ज्युस घेताय? आधी हे वाचा….

मे 30, 2023 | 1:08 pm
in स्थानिक बातम्या
0
summer sweat

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील तापमान वाढत असून , अधिक वेळ उन्हात वावरल्यास उष्माघाताचा फटका बसू शकतो. उष्माघात ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे जिथे शरीराचे तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढते आणि अत्यंत उष्ण हवामानामुळे शरीराचे तापमान सामान्य राखता येत नाही. साधारणपणे घाम आल्यावर आपल्या शरीराचे तापमान थंड होते पण इथे ते खूप जास्त राहते.

उष्माघात अत्यंत उन्हाळ्यात आणि दमट हवामानात होतो. त्यामुळे सकाळी ११ ते दुपारी तीनपर्यंतचे ऊन टाळा, उन्हात जावेच लागले तर डोके कान हे पांढरा रुमाल किंवा टोपीने झाका, थोडे-थोडे पाणी प्या, थोड्या-थोड्या वेळाने सावलीचा आधार घ्या आणि उष्माघाताची लक्षणे दिसताच लवकरात लवकर वैद्यकीय मदत घ्या, असे आवाहन डॉ श्रीपाल शहा ,विषेशज्ञ न्यूरोलॉजी आणि इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजी आणि स्ट्रोक विशेषज्ञ.सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक यांनी केले आहे

अधिक ‘एक्स्पोजर’ धोक्याचे
‘सन एक्स्पोजर’ किती म्हणजेच दुपारी 12 ते ३ या कडक उन्हाच्या वेळेत किती वेळ उन्हात वावरता, कसे वावरता यावरही उन्हाचा त्रास होण्याशी संबंध आहे. कमी तापमान असेल म्हणजे ३८-४० अंशांच्या आसपास तापमान असेल आणि ‘एक्स्पोजर’ तासन् तास असेल, डोके व कान उघडे असेल आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी-कमी होत असेल तर उष्माघाताचा धोका वाढल्याशिवाय राहात नाही.

‘अशक्त किंवा किरकोळ प्रकृती, अधिक वयोमान, गर्दीमुळे (ओव्हरक्राऊडिंग) मोकळी हवा न मिळणे. उपवास करणे हे घटक उष्माघातासाठी कारणीभूत ठरू शकतात. तसेच उच्चरक्तदाब व इतर आजारांमुळे शरीरायील पाण्याचे प्रमाण घटू शकते आणि अशी औषधे घेणार्यांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही

कडक उन्हात जावेच लागणार असेल तर साध्या ” कडक उन्हात जावेच किंवा, मीठ, साखर अस सरबत किंवा नारळ पाणी पिणे जास्त उपयुक्त ठरते. डोक्यावर थंड पाण्याचे कापड किंवा पट्ट्या ठेवणे, हाही उष्माघातात आपत्कालिन परिस्थितीतील उपाय ठरू शकते. अर्थात, त्रास होत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचेच आहे.

गोड ज्युसने ‘डिहायड्रेशन’
उन्हाळ्यात गोड ज्युस हमखास घेतले जातात; परंतु निव्वळ गोड ज्युसमुळे उलट ‘डिहायड्रेशन’ होण्याची म्हणजेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा गोड ज्युसेसऐवजी लिंबू पाणी, नारळ पाणी, ओआरएस घेण्याचे आवाहन केले.

कसा ओळखाल उष्माघात
– खूप तहान लागणे, श्वास घेण्यात अडचण
– अस्वस्थ वाटणे, लूज मोशन, चिडचिड
– अशक्तपणा जाणवणे
– पेटके ( क्रॅम्स) येणे
– डोकेदुखी, सतत घाम येणे, अत्यंत थकवा,
– शरीराचे तापमान वाढणे
– चक्कर येणे वा इतर त्रास होणे

अशी काळजी घ्या…
– पुरेसे पाणी प्या, तहान लागली नाही तरी दर किमान अर्ध्या तासाने पाणी प्या
– घराबाहेर पडताना डोके कान झाकण्यासाठी रुमाल, टोपी, छत्रीचा वापर करा
– छोट्या प्रवासातही पिण्याचे पाणी सोबत घ्या व थोड्या-थोड्या वेळाने आवर्जून प्या
– शरीरातील पाणी कमी झाल्यास ओआरएस, घरची लस्सी, ताक, कैरीचे पन्हे, लिंबू-पाण्याचे सेवन करा

– गरोदर महिला व आजारी व्यक्तींची जास्त काळजी घ्या
– दारू, चहा, कॉफी, कॅफेन असलेली व कार्बोनेटेड थंड पेये टाळा
– उच्च प्रथिनयुक्त व शिळे अन्न खाणे टाळा
– हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरा
– गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळा

हे नक्की करा
उन्हाळ्यात अधिक शारीरिक श्रम टाळणे गरजेचे असून, आयुर्वेदानुसार अनंतमूळ, बेलफळ, आवळा ज्यूस, कोकम सरबत, चांगले गुलकंद, नारळ पाणी व नारळाच्या अधिकाधिक पदार्थांचे सेवन करणे उपयुक्त ठरते. तसेच खोबऱ्याच्या तेलाने रात्री मालीश करणे, रात्री काळे मनुके किंवा सब्जा पाण्यात भिजवून सकाळी सेवन करणे हेही पौष्टिकत्व देत शरीरातील तापमान कमी करतात. त्याचप्रमाणे शितली व शितकारी प्राणायाम, चंद्रभेदी व चंद्र अनुलोम-विलोम प्राणायाम हेदेखील शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हितकारी असल्याचे वैद्य विनय

कोण जास्त प्रभावित आहेत?
मुले
म्हातारी माणसे
उन्हाळ्यात काम करणारे रोजंदारी कामगार
लोक उन्हाळ्यात काम करतात किंवा प्रवास करतात.
जे लोक जास्त प्रमाणात मद्यपान करतात
जे लोक कमी प्रमाणात पाणी पितात

परिणाम:
उष्माघाताच्या रुग्णांचे वेळीच निदान आणि उपचार न केल्यास मेंदूचा झटका, हृदयविकाराचा झटका, किडनीला इजा होऊन मृत्यूही होऊ शकतो.गेल्या काही वर्षांत उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ झाल्याचे भारतीय आकडेवारीवरून दिसून येते.

उष्माघाताचे निदान आणि उपचार कसे करावे?
उष्माघाताचे निदान झालेल्या व्यक्तीला थंड ठिकाणी हलवावे. ताबडतोब ओला टॉवेल किंवा बर्फाचा पॅक वापरल्याने शरीराचे तापमान कमी केले पाहिजे आणि व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात हलवावे.

Summer Heat Sun Stroke Sweet Juice Health

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जपानच्या पंतप्रधानांनी आपल्याच मुलावर केली ही कारवाई…

Next Post

२०१९पासून आतापर्यंत एवढ्या आमदार आणि खासदारांचे निधन…. अशी आहे महाराष्ट्रातील स्थिती

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
Shraddhanjali

२०१९पासून आतापर्यंत एवढ्या आमदार आणि खासदारांचे निधन.... अशी आहे महाराष्ट्रातील स्थिती

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011