इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपालांना एक खळबळजनक पत्र दिले असून त्यात गंभीर आरोप केले आहे. या पत्रात त्यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक या शिस्तीच्या अधिकारी. सरकारच्या ‘कट प्रॅक्टिस’ ला थारा न देणाऱ्या सौ. सौनिक यांच्यावर सरकारतर्फे आता राजीनाम्यासाठी दबाव टाकला जात आहे. तसे न केल्यास त्यांच्या पतीवर या न त्या वाटे(गावकर) खोटी कारवाई करण्याची तयारी सरकार करते असल्याचे म्हटले आहे.
या पत्रात त्यांनी महाराष्ट्रात आपली कारकीर्द गाजवणाऱ्या भाप्रसे अधिकारी व्ही. राधा आणि आय. ए. कुंदन यांनाही अगदी अडगळीत ठेवले आहे. एकीकडे ‘लाडकी बहीण’ म्हणून राज्यात रोज इव्हेंट करायचे आणि दुसरीकडे सक्षम भगिनीला त्रास देणायसाठी षडयंत्र रचायचे, असा कारभार सुरू आहे. असेच सुरू राहिले तर तत्वाने काम करणारे अधिकारी महाराष्ट्रात राहतील का? असा सवाल केला आहे.