शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

१०वी, १२वी परीक्षाः १५ राज्यातील विद्यार्थ्यांची सुप्रीम कोर्टात धाव; ही आहे मागणी

फेब्रुवारी 13, 2022 | 12:33 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
SC2B1

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनामुळे सर्वाधिक नुकसान शैक्षणिक क्षेत्राचे होत असल्याचे दिसून येत आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये अद्यापही कोरोनामुळे संपूर्ण शाळा सुरू झालेल्या नाहीत. काही ठिकाणी ऑनलाई, काही ठिकाणी ऑफलाईन, काही ठिकाणी दोन्ही पद्धतीने शाळा सुरू आहेत. अशातच इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन याबाबत गोंधळ सुरू आहे. आता हा प्रश्न थेट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी या मागणीसाठी तब्बल १५ राज्यातील विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

राज्य सरकार आणि इतर मंडळांच्या अशा वागणुकीमुळे विद्यार्थी असमाधानी असून त्यांच्या भवितव्याची आणि करिअरची चिंता करत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. तसेच कोविड-19 च्या परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी आणि दबाव आणि विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणातील व्यत्यय यांचाही यात उल्लेख आहे. विविध राज्य मंडळे, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि ICSE यांनी प्रस्तावित केलेल्या 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा फिजिकल मोड (ऑफलाइन) ऐवजी पर्यायी मूल्यांकन पद्धतीद्वारे आयोजित करण्यासाठी देशभरातील 15 हून अधिक राज्यांतील विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

बालहक्क कार्यकर्त्या अनुभा श्रीवास्तव सहाय आणि ओडिशाच्या स्टुडंट्स युनियनच्या माध्यमातून याचिका दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्व बोर्डांना वेळेवर निकाल जाहीर करावेत आणि विविध आव्हानांमुळे त्यांना सुधारित परीक्षांचा पर्याय द्यावा, अशी विनंती केली आहे. याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे की, 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा सीबीएसईने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित केल्या आहेत. दरम्यान, ICSE आणि NIOS ची अद्याप कोणतीही सूचना नाही. राज्य मंडळांच्या बाबतीत, काहींनी वेळापत्रक जाहीर केले आहे तर काहींनी अद्याप प्रक्रियेवर चर्चा केली आहे. याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की अजूनही परीक्षा ऑफलाइन घेण्याची परिस्थिती नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असून बाधित रुग्ण आणि मृतांचा आकडाही वाढत आहे.

देशातील अनेक राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात देखील कोरानाच्या संसर्गामुळे सरकारी आणि खासगी शाळा गेल्या दोन वर्षांपासून कधीच सुरू तर कधी बंद अशा परिस्थितीत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनेच अभ्यास करावा लागत आहे. त्यातच दहावी आणि बारावीचे वर्ग काही वेळा उघडतात तर पुन्हा काही वेळा बंद होता त्यामुळे परीक्षा ऑफलाइन घेण्याऐवजी ऑनलाईनच घ्यावी अशी विद्यार्थी आणि पालकांची मागणी होती. परंतु त्या दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्यानंतर त्याविरोधात दहावी आणि बारावीचे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या असंतोषाची योग्य ती दखल राज्य सरकारने घ्यायला हवी. मात्र हजारो विद्यार्थ्यांना अस्वस्थ ठेवणे आणि सरकार आपल्या भविष्याशी खेळत आहे, अशी भावना विद्यार्थ्यांसाठी व समाजासाठीही हिताची ठरणार नाही.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या परिस्थितीमुळे सर्वच क्षेत्रांची कोंडी झाली. त्यातही शिक्षण क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाला. शाळा, महाविद्यालयांचे वर्ग भरले नाहीत. त्यात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसह शिकवण्यापर्यंत अनेक कमतरता राहिल्या. या परिस्थितीत मुलांच्या भवितव्याचे काय आहे ? असा प्रश्‍न निर्माण झाला असून आता शैक्षणिक क्षेत्रातील ही परिस्थिती बदलून विद्यार्थ्यांचे भवितव्य सुधारण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारवर आहे. असेही म्हटले जात आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

IPL: खेळाडूंवर लागते कोटींची बोली; प्रत्यक्षात त्यांना किती पैसे मिळतात? कर कपात किती?

Next Post

मालेगाव – मुंबई – आग्रा महामार्गावर दरेगाव शिवारात प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग (बघा व्हिडिओ )

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
Screenshot 20220213 124905 WhatsApp e1644737541700

मालेगाव - मुंबई - आग्रा महामार्गावर दरेगाव शिवारात प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग (बघा व्हिडिओ )

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011