गुरूवार, नोव्हेंबर 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

विशेष लेखमाला… पितृपक्ष महात्म्य… श्राद्ध पक्षात पितरांना अन्न कसं मिळत?

ऑक्टोबर 6, 2023 | 5:15 am
in इतर
0
download 7

पितृपक्ष महात्म्य
श्राद्ध पक्षात पितरांना अन्न कसं मिळत?

मृत झालेल्या पितरांना श्राद्ध पक्षात अन्न कसं पोहचू शकतं, अशी शंका पुनर्जन्म, श्राद्ध विधी, पितृपक्ष यावर विश्वास नसणाऱ्या व्यक्ती नेहमी विचारतात. खरं सांगायचं तर जगातल्या निम्म्या पेक्षा जास्त लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे. हे एक वेगळं शास्त्र आहे. त्याचे काही नियम आहेत. हिंदू धर्मांत तर रामायण आणि महाभारत काळापासून यावर अभ्यास झालेला आहे. त्यानुसार आपल्या मृत झालेल्या पितरांची शांती करण्यासाठी पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षांत पितरांना अन्न व पाणी दिलं जातं. हे कसं घडतं यामागे असलेलं शास्त्र आज आपण पाहू या….

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

पुराणांमध्ये यमलोक हे मृत्युलोकावर दक्षिणेत ८६ हजार अंतरावर असल्याचे मानले गेले आहे. एक लाख योजनेमध्ये पसरलेल्या यमपुरी किंवा पितृलोकाचे उल्लेख ‘गरूड पुराण’ आणि ‘कठोपनिषदात’ आढळतात. मृत्यूनंतर आत्मा पितृलोकात १ ते १०० वर्षांपर्यंत मृत्यू आणि पुनर्जन्म अश्या मध्य स्थितीत असतो, असे मानले गेले आहे. पितरांचा वास चंद्राच्या ऊर्ध्व भागात मानला गेला आहे.

कसे खाली येतात पितरं?
सूर्याच्या सहस्र किरणांमध्ये ‘अमा’ नावाची किरणं सर्वात प्रभावी समजली जातात.अमाच्या तेजामुळे सूर्य त्रैलोक्याला प्रकाशमान करतो. त्या अमा मध्ये तिथी विशेषला वस्य अर्थात चंद्र भ्रमण होतं. तेव्हा या किरणाच्या माध्यमातून चंद्राच्या उर्ध्वभागाने पितर पृथ्वीवर उतरतात. म्हणूनच श्राद्ध पक्षाच्या अमावस्या तिथीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अमावस्येसह मन्वादी तिथी, संक्रांती काळ व्यतिपात, गजच्दाया, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या समस्त तिथी पितरांना श्राद्ध द्वारे तृप्त केलं जाऊ
शकतं.

अशी होते पितरांना भोजन प्राप्ती?
ज्या प्रकारे पशूंचे भोजन तृण आणि मनुष्यांचे भोजन अन्न म्हणून आहे, त्याप्रकारे देवता आणि पितरांचे भोजन अन्नाचे सार तत्त्व आहे. सार तत्त्व अर्थात गंध, रस आणि उष्मा. देवता आणि पितर गंध आणि रस तत्त्वाने तृप्त होतात. दोघांसाठी वेगवेगळ्या प्रकाराचे गंध आणि रस तत्त्वांचे निर्माण केलं जातं. विशेष वैदिक मंत्रांद्वारे विशेष प्रकाराची गंध आणि रस तत्त्वच पितरांपर्यंत पोहचतात. एका जळत असलेल्या कंड्यावर गूळ आणि तूप टाकून गंध निर्मित केली जाते. त्यावरच विशेष अन्न अर्पण केलं जातं. तीळ, अक्षता, कुश आणि जल यासह तर्पण आणि पिंडदान केलं जातं. बोटांनी देवता आणि अंगठ्याने पितरांना जल अर्पण केलं जातं.

पितर आणि देवतांची योनी अशा प्रकारची असते की, ते लांबपर्यंतच्या गोष्टी ऐकू शकतात. लांबून पूजा-अन्न ग्रहण करू शकतात आणि लांबूनच स्तुतीने संतुष्ट देखील होतात. या प्रकारे ते भूत, वर्तमान आणि भविष्याबद्दल सर्वकाही जाणून घेतात व सर्वत्र पोहचू शकतात. मृत्यूलोकात केलेले श्राद्ध त्याच मानव पितरांना तृप्त करतं जे पितृलोकाच्या प्रवासावर आहेत. ते तृप्त होऊन श्राद्धकर्त्यांच्या पूर्वजांना जिथे कुठे ज्या स्थितीत असतील, जाऊन तृप्त करतात. म्हणून श्राद्ध पक्षात पितरांचे पिंडदान आणि तर्पण केल्यावर सहकुटुंब भोजन करावे.

श्राद्ध ग्रहण करणारे पितर श्राद्धकर्त्यांना श्रेष्ठ वरदान देतात. हल्ली आपण मोबाईल वापरतो. मोबाईलच्या लहरी जगभरांत कुठेही पोहचतात. आणि त्यामुळे आवाज ऐकता येतात. फोटो, व्हिडिओ पाहाता येतात. तसंच हे मनाचं शास्त्र आहे. वंशजांनी श्रद्धा पूर्वक केलेला विधी पूर्वजापर्यंत पोहचतो. वंशजांनी मनापासून केलेली प्रार्थना पितरांपर्यंत पोहचते. वंशजांचे मनोगत पूर्वज ऐकतात. त्यामुळे संतुष्ट होतात. आणि यामुळे पितृदोष दूर होतात.असे अनुभव अनेकांना येतात.

या चुकांमुळे पितरं नाराज होऊ शकतात
पितृ पक्ष म्हणजे पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आयोजित मेजवानी. हे पक्ष पूर्ण १५ दिवसांचं असतं. या दिवसात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पंडितांना अन्न आणि दान देऊन, पूर्वजांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. तसे, अंत्यसंस्कार हे एखाद्या व्यक्तीच्या जीवन चक्रातील शेवटचे संस्कार मानले जातात. पण अंत्यसंस्कारानंतरही अशी काही कामे आहेत जी मृताचा मुलगा किंवा नातेवाईक करतात. यानंतर मृताचे श्राद्ध केले जाते. हा संस्कार हे मुलाचे, विशेषतः मुलाचे मुख्य कर्तव्य आहे. असे मानले जाते की, हे विधी केल्यास पूर्वजांना आनंद मिळतो. त्याचबरोबर त्यांना मोक्ष मिळतो.

श्राद्ध कर्म कधी केले जाते?
प्रत्येक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी श्राद्ध कर्म करता येते. परंतु भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते अमावास्येपर्यंत पूर्वजांचे श्राद्ध केले जाते. असे मानले जाते की, ते पूर्णपणे विधीपूर्वक केले पाहिजे. याला पितृ पक्ष किंवा श्राद्ध पक्ष म्हणतात. हे पूर्ण १५ दिवस केले जाते. या १५ दिवसांमध्ये, वेगवेगळ्या दिवशी, लोक त्यांच्या पूर्वजांना त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पाणी अर्पण करतात. तसेच त्याच्या मृत्यूच्या तारखेनुसार श्राद्धाचे काम करावे.

पितृ श्राद्ध काय ?
जेव्हा एखाद्याचे पालक किंवा इतर नातेवाईक निधन पावतात, जे त्याच्या आत्म्याच्या शांती आणि परिपूर्णतेसाठी श्राद्ध केलं जातं. असे म्हटले जाते की, जे लोक या जगात नाहीत ते या दिवसात पृथ्वीवर येतात आणि राहतात. अशा परिस्थितीत त्यांना आनंदी करण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वतीने अन्न आणि पाण्याचे आयोजन केले जाते. ते त्यांच्या पूर्वजांना अशा प्रकारे संतुष्ट करतात आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतात.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आरोग्य टीप्स: या कारणांमुळेही छातीत दुखते; या लक्षणांकडे जराही दुर्लक्ष करू नका

Next Post

मुंबईतील गोरगाव येथे इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग; सात जणांचा मृत्यू तर ४० जण जखमी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
UXd2xwIp e1696562423285

मुंबईतील गोरगाव येथे इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग; सात जणांचा मृत्यू तर ४० जण जखमी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011