मंगळवार, सप्टेंबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

विशेष लेखमाला… पितृपक्ष महात्म्य… श्राद्ध पक्षात पितरांना अन्न कसं मिळत?

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 6, 2023 | 5:15 am
in इतर
0
download 7

पितृपक्ष महात्म्य
श्राद्ध पक्षात पितरांना अन्न कसं मिळत?

मृत झालेल्या पितरांना श्राद्ध पक्षात अन्न कसं पोहचू शकतं, अशी शंका पुनर्जन्म, श्राद्ध विधी, पितृपक्ष यावर विश्वास नसणाऱ्या व्यक्ती नेहमी विचारतात. खरं सांगायचं तर जगातल्या निम्म्या पेक्षा जास्त लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे. हे एक वेगळं शास्त्र आहे. त्याचे काही नियम आहेत. हिंदू धर्मांत तर रामायण आणि महाभारत काळापासून यावर अभ्यास झालेला आहे. त्यानुसार आपल्या मृत झालेल्या पितरांची शांती करण्यासाठी पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षांत पितरांना अन्न व पाणी दिलं जातं. हे कसं घडतं यामागे असलेलं शास्त्र आज आपण पाहू या….

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

पुराणांमध्ये यमलोक हे मृत्युलोकावर दक्षिणेत ८६ हजार अंतरावर असल्याचे मानले गेले आहे. एक लाख योजनेमध्ये पसरलेल्या यमपुरी किंवा पितृलोकाचे उल्लेख ‘गरूड पुराण’ आणि ‘कठोपनिषदात’ आढळतात. मृत्यूनंतर आत्मा पितृलोकात १ ते १०० वर्षांपर्यंत मृत्यू आणि पुनर्जन्म अश्या मध्य स्थितीत असतो, असे मानले गेले आहे. पितरांचा वास चंद्राच्या ऊर्ध्व भागात मानला गेला आहे.

कसे खाली येतात पितरं?
सूर्याच्या सहस्र किरणांमध्ये ‘अमा’ नावाची किरणं सर्वात प्रभावी समजली जातात.अमाच्या तेजामुळे सूर्य त्रैलोक्याला प्रकाशमान करतो. त्या अमा मध्ये तिथी विशेषला वस्य अर्थात चंद्र भ्रमण होतं. तेव्हा या किरणाच्या माध्यमातून चंद्राच्या उर्ध्वभागाने पितर पृथ्वीवर उतरतात. म्हणूनच श्राद्ध पक्षाच्या अमावस्या तिथीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अमावस्येसह मन्वादी तिथी, संक्रांती काळ व्यतिपात, गजच्दाया, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या समस्त तिथी पितरांना श्राद्ध द्वारे तृप्त केलं जाऊ
शकतं.

अशी होते पितरांना भोजन प्राप्ती?
ज्या प्रकारे पशूंचे भोजन तृण आणि मनुष्यांचे भोजन अन्न म्हणून आहे, त्याप्रकारे देवता आणि पितरांचे भोजन अन्नाचे सार तत्त्व आहे. सार तत्त्व अर्थात गंध, रस आणि उष्मा. देवता आणि पितर गंध आणि रस तत्त्वाने तृप्त होतात. दोघांसाठी वेगवेगळ्या प्रकाराचे गंध आणि रस तत्त्वांचे निर्माण केलं जातं. विशेष वैदिक मंत्रांद्वारे विशेष प्रकाराची गंध आणि रस तत्त्वच पितरांपर्यंत पोहचतात. एका जळत असलेल्या कंड्यावर गूळ आणि तूप टाकून गंध निर्मित केली जाते. त्यावरच विशेष अन्न अर्पण केलं जातं. तीळ, अक्षता, कुश आणि जल यासह तर्पण आणि पिंडदान केलं जातं. बोटांनी देवता आणि अंगठ्याने पितरांना जल अर्पण केलं जातं.

पितर आणि देवतांची योनी अशा प्रकारची असते की, ते लांबपर्यंतच्या गोष्टी ऐकू शकतात. लांबून पूजा-अन्न ग्रहण करू शकतात आणि लांबूनच स्तुतीने संतुष्ट देखील होतात. या प्रकारे ते भूत, वर्तमान आणि भविष्याबद्दल सर्वकाही जाणून घेतात व सर्वत्र पोहचू शकतात. मृत्यूलोकात केलेले श्राद्ध त्याच मानव पितरांना तृप्त करतं जे पितृलोकाच्या प्रवासावर आहेत. ते तृप्त होऊन श्राद्धकर्त्यांच्या पूर्वजांना जिथे कुठे ज्या स्थितीत असतील, जाऊन तृप्त करतात. म्हणून श्राद्ध पक्षात पितरांचे पिंडदान आणि तर्पण केल्यावर सहकुटुंब भोजन करावे.

श्राद्ध ग्रहण करणारे पितर श्राद्धकर्त्यांना श्रेष्ठ वरदान देतात. हल्ली आपण मोबाईल वापरतो. मोबाईलच्या लहरी जगभरांत कुठेही पोहचतात. आणि त्यामुळे आवाज ऐकता येतात. फोटो, व्हिडिओ पाहाता येतात. तसंच हे मनाचं शास्त्र आहे. वंशजांनी श्रद्धा पूर्वक केलेला विधी पूर्वजापर्यंत पोहचतो. वंशजांनी मनापासून केलेली प्रार्थना पितरांपर्यंत पोहचते. वंशजांचे मनोगत पूर्वज ऐकतात. त्यामुळे संतुष्ट होतात. आणि यामुळे पितृदोष दूर होतात.असे अनुभव अनेकांना येतात.

या चुकांमुळे पितरं नाराज होऊ शकतात
पितृ पक्ष म्हणजे पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आयोजित मेजवानी. हे पक्ष पूर्ण १५ दिवसांचं असतं. या दिवसात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पंडितांना अन्न आणि दान देऊन, पूर्वजांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. तसे, अंत्यसंस्कार हे एखाद्या व्यक्तीच्या जीवन चक्रातील शेवटचे संस्कार मानले जातात. पण अंत्यसंस्कारानंतरही अशी काही कामे आहेत जी मृताचा मुलगा किंवा नातेवाईक करतात. यानंतर मृताचे श्राद्ध केले जाते. हा संस्कार हे मुलाचे, विशेषतः मुलाचे मुख्य कर्तव्य आहे. असे मानले जाते की, हे विधी केल्यास पूर्वजांना आनंद मिळतो. त्याचबरोबर त्यांना मोक्ष मिळतो.

श्राद्ध कर्म कधी केले जाते?
प्रत्येक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी श्राद्ध कर्म करता येते. परंतु भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते अमावास्येपर्यंत पूर्वजांचे श्राद्ध केले जाते. असे मानले जाते की, ते पूर्णपणे विधीपूर्वक केले पाहिजे. याला पितृ पक्ष किंवा श्राद्ध पक्ष म्हणतात. हे पूर्ण १५ दिवस केले जाते. या १५ दिवसांमध्ये, वेगवेगळ्या दिवशी, लोक त्यांच्या पूर्वजांना त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पाणी अर्पण करतात. तसेच त्याच्या मृत्यूच्या तारखेनुसार श्राद्धाचे काम करावे.

पितृ श्राद्ध काय ?
जेव्हा एखाद्याचे पालक किंवा इतर नातेवाईक निधन पावतात, जे त्याच्या आत्म्याच्या शांती आणि परिपूर्णतेसाठी श्राद्ध केलं जातं. असे म्हटले जाते की, जे लोक या जगात नाहीत ते या दिवसात पृथ्वीवर येतात आणि राहतात. अशा परिस्थितीत त्यांना आनंदी करण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वतीने अन्न आणि पाण्याचे आयोजन केले जाते. ते त्यांच्या पूर्वजांना अशा प्रकारे संतुष्ट करतात आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतात.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आरोग्य टीप्स: या कारणांमुळेही छातीत दुखते; या लक्षणांकडे जराही दुर्लक्ष करू नका

Next Post

मुंबईतील गोरगाव येथे इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग; सात जणांचा मृत्यू तर ४० जण जखमी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Screenshot 20250909 123855 WhatsApp
संमिश्र वार्ता

राहुड घाटात गॅस टँकरचा अपघात होऊन गॅस गळती सुरु…वाहतुकीची कोंडी

सप्टेंबर 9, 2025
GwyqMwabYAA1fOl e1757399728553
संमिश्र वार्ता

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू…आज या संघा दरम्यान सामना

सप्टेंबर 9, 2025
rohit pawar
महत्त्वाच्या बातम्या

मी पुराव्याशिवाय बोलत नाही, पण, हे खरं आहे काय? रोहित पवार यांचे मंत्री बावनकुळे यांना प्रश्न

सप्टेंबर 9, 2025
Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळ सरकार झुकले…सोशल मीडियावरील बंदी मागे, गृहमंत्र्यांचा राजीनामा

सप्टेंबर 9, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

आधार कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता द्यावी…बिहारमध्ये सुधारित मतदार याद्यांमध्ये समावेश करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सप्टेंबर 9, 2025
mou1 1024x496 1
महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

सप्टेंबर 9, 2025
Untitled 5
मुख्य बातमी

आज उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान…महाराष्ट्राच्या या नेत्यावर मोठी जबाबदारी

सप्टेंबर 9, 2025
rohit pawar
महत्त्वाच्या बातम्या

सिडको जमीन घोटाळ्याप्रकरणी SIT स्थापन…रोहित पवारांकडून स्वागत

सप्टेंबर 9, 2025
Next Post
UXd2xwIp e1696562423285

मुंबईतील गोरगाव येथे इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग; सात जणांचा मृत्यू तर ४० जण जखमी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011