शुक्रवार, ऑक्टोबर 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

विशेष लेखमाला… पितृपक्ष महात्म्य… बिहारच्या गया येथे श्राद्ध का करावे

ऑक्टोबर 9, 2023 | 5:15 am
in इतर
0
C4SLt5uVUAA3LgR

पितृपक्ष महात्म्य…
 बिहारच्या गया येथे श्राद्ध का करावे

गरुड पुराणातील उल्लेखानुसार, गया येथे करण्यात आलेल्या श्राद्ध विधीमुळे पूर्वजांसाठी स्वर्गाकडे जाण्याचा एक एक टप्पा पुढे सरकतो. गया येथील श्राद्ध पूर्वज आणि स्वर्ग यातील दुवा मानले जाते. गया येथे करण्यात आलेल्या श्राद्ध कर्मामुळे वारसांनाही पुण्य प्राप्त होते. कारण या ठिकाणी श्रीविष्णू विराजमान असल्याचे सांगितले जाते. गया या भागाला पितृस्थळ असेही संबोधले जाते. गया स्थानाचे महत्त्व केवळ गरुड पुराणात आढळत नाही, तर विष्णू पुराण आणि वायु पुराणातही गया स्थानाची महती वर्णन करण्यात आलेली आहे. गया येथे श्राद्ध केल्याने पूर्वजांना मुक्ती कशी मिळते ते आज आपण पाहू या…

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

रामायण आणि महाभारत काळापासून चालत आलेली चातुर्मासातील भाद्रपद महिन्यात येणाऱ्या वद्य पक्षात पूर्वजांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आजतागायत सुरू आहे. रामायण आणि महाभारत काळापासून श्राद्ध तर्पण विधी केल्याचे काही उल्लेख आढळून येतात. या पितृपंधरवड्यात करण्यात आलेल्या तर्पण विधींमुळे पूर्वज प्रसन्न होतात. त्यांना शांतता लाभते, अशी मान्यता आहे. देशभरात विविध ठिकाणी एकत्रित श्राद्ध तर्पण विधी केले जातात. यातील बिहार राज्यात असलेल्या गया या स्थानाला अनन्य साधारण महत्त्व आहे.

गया हे भारत देशाच्या बिहार राज्यामधील गया जिल्ह्याचे मुख्यालय व पाटणा खालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. गया शहर पाटणाच्या १०० किमी दक्षिणेस फल्गू नदीच्या काठावर वसले असून ते हिंदू, बौद्ध व जैन धर्मीयांसाठी एक पवित्र स्थान आहे. हिंदू आणि बौद्ध धर्मियांसाठी गया हे श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. पूर्वजांच्या आत्म्याला शांतता मिळावी, यासाठी देशभरात अनेक ठिकाणी श्राद्ध विधी करण्यात येतात. मात्र, गया येथे केलेल्या श्राद्ध विधीमुळे अधिक पुण्य प्राप्त होते. पूर्वजांची जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता होते, अशी मान्यता आहे. केवळ देशातील नाही, तर विदेशातूनही अनेक श्रद्धाळू गया येथे श्राद्ध विधी करण्यासाठी येतात. गया या भागात अनेक रहस्ये आजही दडलेली आहेत. काही पुराणांमध्येही गया येथील अद्भूत गोष्टींचा उल्लेख असलेला आढळतो.

पुराणातील उल्लेख
गरुड पुराणातील उल्लेखानुसार, गया येथे करण्यात आलेल्या श्राद्ध विधीमुळे पूर्वज स्वर्गाकडे जाण्याचा एक एक टप्पा पुढे सरकतो. गया येथील श्राद्ध पूर्वज आणि स्वर्ग यातील दुवा मानले जाते. गया येथे करण्यात आलेल्या श्राद्ध कर्मामुळे वारसांनाही पुण्य प्राप्त होते. कारण या ठिकाणी श्रीविष्णू विराजमान असल्याचे सांगितले जाते. गया या भागाला पितृस्थळ असेही संबोधले जाते. गया स्थानाचे महत्त्व केवळ गरुड पुराणात आढळत नाही, तर विष्णू पुराण आणि वायु पुराणातही गया स्थानाची महती वर्णन करण्यात आलेली आहे.

फल्गु नदीचे रहस्य
गया येथून फल्गु नावाची नदी वाहते. या नदीबाबत अनेक रहस्ये सांगितली जातात. फल्गु नदीचे पाणी जमिनीखालून वाहते, असे सांगितले जाते. पुढे जाऊन ही नदी गंगा नदीला मिळते. या नदीचे वर्णन वायु पुराणात आढळते. या नदीच्या घाटावर पिंडदान आणि श्राद्ध तर्पण विधी केल्याने पूर्वजांना मोक्ष प्राप्ती होते, असे मानले जाते. याशिवाय या घाटावर पिंडदान करणाऱ्या वारसांनाही पुण्य लाभते. सीता देवीने दिलेल्या शापामुळे ही नदी जमिनीखालून वाहते, अशी एक कथा आढळते. यासाठी या नदीला सलिला असेही म्हणतात. या नदीच्या तटावर श्रीराम आणि पांडवांनी श्राद्ध केले होते, अशी मान्यता आहे.

प्रेतशिला
गया येथून जवळच एक भाग असून, त्याला प्रेतशिला नावाने ओळखले जाते. या ठिकाणी पिंडदान केल्यास पूर्वजांपर्यंत ते थेट पोहोचते, असे मानले जाते. याशिवाय अभौतिक शरीरात प्रवेश करावा लागत नाही. या प्रेतशिलेत अनेक छिद्र आणि भेगा आहेत. हे पिंडदान करणारे वारस आणि पूर्वजांमध्ये दुवा समजले जातात. वारसांनी केलेले पिंडदान या माध्यमातून पूर्वजांपर्यंत पोहोचते. अशा प्रकारचे अनेक दगड या भागात आहेत, असे सांगितले जाते. याशिवाय या ठिकाणी श्रीविष्णूंची पदचिन्हे असून, गयासुराच्या पाठीवर एक मोठी शिळा ठेवून त्यावर श्रीविष्णू उभे राहिले होते, अशी कथा पुराणात आढळते.

गया आणि गयासुर
गयासुराच्या नावावरून या ठिकाणाला गया नाव पडल्याचे सांगितले जाते. भस्मासुराच्या वंशातील गयासुर नामक दैत्याने आपल्या तपाने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले. माझे शरीर देवतांप्रमाणे पवित्र होऊन केवळ माझ्या दर्शनाने लोकांना मुक्ती मिळो, असे वरदान ब्रह्मदेवांकडून प्राप्त करून घेतले. यामुळे गयासुराचे दर्शन घेतल्यावर लोकांना मुक्ती मिळू लागली आणि स्वर्गात गर्दी होऊ लागली. या समस्येतून मार्ग काढण्याचे आवाहन देवतांनी गयासुराला केले. तेव्हा गयासुराच्या पाठीवर देवतांनी यज्ञ सुरू केला. देवतांनी प्रसन्न होऊन या ठिकाणी येऊन श्राद्ध विधी करणाऱ्यांच्या पूर्वजांना मुक्ती मिळेल, असा आशिर्वाद दिला. यज्ञ समाप्त झाल्यावर श्रीविष्णूंनी गयासुराच्या पाठीवर एक मोठी शिळा ठेवली आणि त्यावर उभे राहिले, अशी कथा सांगितली जाते.

रेतीचे पिंडदान
गया येथे श्रीरामांनी लक्ष्मण आणि सीता देवी यांच्या उपस्थितीत दशरथ राजाच्या नावाने पिंडदान केले होते, त्यामुळे त्यांना मुक्ती मिळाली असे सांगितले जाते. श्रीराम आणि लक्ष्मण श्राद्धाचे साहित्य आणण्यासाठी नगरात गेले. मात्र, काही कारणास्तव त्यांना परतण्यास विलंब होत होता. श्राद्ध करण्याच्या ठिकाणी देवी सीता एकटीच होती. वेळ निघून जात असल्यामुळे राजा दशरथांनी सीता देवीला दर्शन देत श्राद्ध विधी करण्याची विनंती केली. सीता देवीने रेतीचे पिंड तयार केले. फल्गु नदी, अक्षय वड, एक ब्राह्मण, तुळस आणि गोमातेला साक्षी मानून सीता देवीने पिंडदान केले. श्रीराम आणि लक्ष्मण पोहोचल्यावर सीतेने हकीकत सांगितली. अक्षय वडाने याला अनुमोदन दिले. मात्र, फल्गु नदीने मौन बाळगले. यामुळे नाराज झालेल्या सीता देवीने फल्गु नदीला शाप दिला. यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण यांनी दशरथ राजाच्या नावाने पिंडदान केले, अशी कथा आढळते.

बौद्ध धर्मियांसाठी पवित्र तीर्थस्थळ
बौद्ध धर्मियांसाठी गया स्थानाचे विशेष महत्त्व आहे. बोधगया हे स्थान गयाच्या ११ किमी दक्षिणेस स्थित असून ते बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाच्या ४ स्थळांपैकी एक आहे. गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थ गौतम ध्यानस्थ बसले. वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या दिव्य ज्ञानाला संबोधी, बुद्धत्व किंवा निर्वाण, असेही म्हणतात. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमांना सर्वजण बुद्ध संबोधू लागले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. बुद्ध म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य. बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झाले, त्या वृक्षाला बोधिवृक्ष असे म्हणतात. तसेच या ठिकाणाला ज्ञानस्थळ असेही म्हटले जाते. ऐतिहासिक काळात मगध प्रांतामध्ये पाटलीपुत्रपासून जवळ स्थित असल्यामुळे गया हे एक मोठे शैक्षणिक केंद्र होते.

कसे जावे?
गया विमानतळ बिहारमधील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे विमानतळ आहे. येथून यांगून, भूतान, बॅंकॉक इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय स्थानांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. गया रेल्वे स्थानक हावडा-मुंबई व दिल्ली-गया-हावडा रेल्वेमार्गावर स्थित असून येथे दररोज राजधानी एक्सप्रेससह सुमारे १०० गाड्या थांबतात.

(सौजन्य विकिपीडिया व धार्मिक ग्रंथ)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – लग्नातील जेवणाचा मेन्यू

Next Post

तातडीने काढा डिजिटल हेल्थ कार्ड… असे आहेत त्याचे फायदे… येथे क्लिक करा…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
ABHA CARD

तातडीने काढा डिजिटल हेल्थ कार्ड... असे आहेत त्याचे फायदे... येथे क्लिक करा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011