आयुर्वेद व्यासपीठ : एक आरोग्य चळवळ
आयुर्वेद हे पाचवा वेद म्हणून भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान मिळविणारे शास्त्र. जनमानसाच्या चित्तात खोलवर रुजलेली अशी ही जीवनशैली आहे. मात्र तिला गेल्या शंभर एक वर्षात ग्रहण लागले ते आधुनिक वैद्यक शास्त्राच्या वेगवान प्रचाराने. हा अंधार नाहीसा करण्याचे आणि पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे भगीरथ कार्य केले आहे — “आयुर्वेद व्यासपीठ” या संस्थेने. सेवा-संशोधन-प्रचार -शिक्षण ही चतु:सूत्री धारण करून गेली तीन दशके संस्था व्यापक आणि समर्पित पद्धतीने कार्य करत आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आयुर्वेदाची पुनःप्रतिष्ठा आणि वैद्यांचे निरंतर शिक्षण अशा ध्येयाने कार्य सुरू आहे. त्याला आणखी बळ प्राप्त व्हावे म्हणून नाशिकमध्ये आज संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय – चरक सदन – लोकार्पण करीत आहोत.

(संस्थापक अध्यक्ष, आयुर्वेद व्यासपीठ)