गुरूवार, डिसेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

विशेष लेख – आयुर्वेद व्यासपीठ : एक आरोग्य चळवळ

जुलै 14, 2021 | 12:35 am
in इतर
0
IMG 20210713 WA0026

आयुर्वेद व्यासपीठ : एक आरोग्य चळवळ

आयुर्वेद हे पाचवा वेद म्हणून भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान मिळविणारे शास्त्र. जनमानसाच्या  चित्तात खोलवर रुजलेली अशी ही जीवनशैली आहे. मात्र तिला गेल्या शंभर एक वर्षात  ग्रहण लागले ते आधुनिक वैद्यक शास्त्राच्या वेगवान प्रचाराने. हा अंधार नाहीसा करण्याचे आणि पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे भगीरथ कार्य केले आहे — “आयुर्वेद व्यासपीठ” या संस्थेने. सेवा-संशोधन-प्रचार -शिक्षण ही चतु:सूत्री धारण करून गेली तीन दशके संस्था व्यापक आणि समर्पित पद्धतीने कार्य करत आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आयुर्वेदाची पुनःप्रतिष्ठा आणि वैद्यांचे निरंतर शिक्षण अशा ध्येयाने कार्य सुरू आहे. त्याला आणखी बळ प्राप्त व्हावे म्हणून नाशिकमध्ये आज संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय – चरक सदन – लोकार्पण करीत आहोत.
IMG 20210713 WA0027
वैद्य विनय वेलणकर
(संस्थापक अध्यक्ष, आयुर्वेद व्यासपीठ)
आयुर्वेद क्षेत्रातील वैद्य विनय वेलणकर यांच्या पुढाकाराने १९९७ मध्ये ही संघटना निर्माण झाली. आयुर्वेद क्षेत्रातील काही तरुण वैद्य व काही ज्येष्ठ वैद्य एकत्र आले आणि आयुर्वेद क्षेत्रात काहीतरी भरीव, रचनात्मक, सर्व समाजावर प्रभाव टाकणारे व शास्त्राच्या वृद्धीसाठी हातभार लागेल अशा प्रकारचे काम करण्याचे ठरले. पहिली बैठक वा अभ्यासवर्ग कोयना परिसरातील राममळा या गावी संपन्न झाला. त्यामध्ये वैद्य विनय वेलणकर, वैद्य विजय कुलकर्णी, वैद्य संतोष नेवपूरकर, वैद्य उपासनी, वैद्य सरदेशमुख इ. प्रमुख वैद्य उपस्थित होते.
आयुर्वेद प्रचार-प्रसार, संशोधन, सेवा शिक्षण या चार गोष्टी समोर ठेऊन काम करण्याचे ठरले. तोपर्यंत समाजातील आयुर्वेदाची स्थिती गंभीर होती. शुद्ध आयुर्वेदीय चिकित्सा करणारे, पंचकर्म चिकित्सा करणारे वैद्य तुरळक प्रमाणात होते. आयुर्वेदाची माहिती समाजात अत्यल्प होती. आयुर्वेदीय महाविद्यालयात चांगले शिक्षण मिळत नव्हते,  प्रत्यक्ष रुग्ण चिकित्सा करण्याचा प्रात्यक्षिक अनुभव मिळत नव्हता. त्यामुळे समाजात स्वतःला वैद्य म्हणवून घेणाऱ्यांची संख्यासुद्धा कमी होती. अशा सर्व परिस्थितीत आयुर्वेदाच्या जोडीला ॲलोपथी शिकवली जात होती. अशा विपरीत परिस्थितीत आयुर्वेद व्यासपीठाचे काम चालू झाले.
*वैद्य तितुका मेळावावा ।*
*आयुर्वेद मस्तकी धरावा ।*
*अवघा हलकल्लोळ करावा ॥*
या उक्तीप्रमाणे सर्वांचा उत्साह होता आणि आहे. त्यावेळी आपला अनुभव दुसऱ्या वैद्याला सांगणे हे अपवादाने होत असे. त्यामुळे Clinical Meeting (रुग्णचर्चा सत्र) हा कामाचा मूलमंत्र ठरला. याची सुरुवात डोंबिवली पासून झाली. पुढे याचा प्रसार महाराष्ट्रातल्या २५-२६ जिल्ह्यात झाला. आता गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, दिल्ली, केरळ, गोवा इत्यादी प्रांतात चालू आहे.
 चर्चासत्रामुळे दरमहा विविध जिल्ह्यातील वैद्य एकत्र येऊ लागले. आपले रुग्णानुभव सादर करून त्यावर साधक बाधक चर्चा होऊ लागली. परिणामस्वरूप जवळ जवळ ३ हजार वैद्य दर महिना विविध ठिकाणी एकत्र येऊ लागले.
आयुर्वेदाची चिकित्सा करणार्‍या वैद्यांची संख्या वाढत गेली. वैद्यांचा आत्मविश्वास वाढला. आयुर्वेदीय औषधांचा खप वाढला, पंचकर्म चिकित्से संदर्भात समाजात जागृती निर्माण झाली. या सर्वांचा परिणाम म्हणून राज्यभर जवळ जवळ १२५च्या वर परिसंवाद संपन्न झाले. आज आयुर्वेद व्यासपीठाकडे ४५० वैद्यांची यादी उपलब्ध आहे, जे विविध राज्यात जाऊन विविध विषयांवर व्याख्याने देतात. यामध्ये महिला वैद्यांची संख्या सुद्धा उल्लेखनीय आहे.

aayurved

वैद्यकीय क्षेत्रात एक वेगळा विक्रम आयुर्वेद व्यासपीठाच्या कार्यकर्त्यांनी घडविला. तो म्हणजे आयुर्वेदाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर (बी.ए.एम.एस पदवी प्राप्त केल्यावर) आपल्या आयुष्यातील किमान एक वर्ष ते दोन वर्ष आयुर्वेद प्रचारासाठी देणारे असे सात पूर्णवेळ आयुर्वेद प्रचारक बाहेर पडले. त्यांनी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर सतत प्रवास करून वैद्यांना संघटित करण्याचे व आयुर्वेद प्रचार प्रसाराचे मोठे काम केले. वैद्य गिरीश टिल्लू, वैद्य राहुल पाटील, वैद्य सुदीप चिटणीस, वैद्य अमेय भावे, वैद्य विवेक कुलकर्णी, वैद्य दीपक घुमे व वैद्य अजित पोद्दार हे ते सात पूर्णवेळ आयुर्वेद प्रचारक.
स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय व कौटुंबिक प्रपंच सांभाळून आयुर्वेद व्यासपीठाच्या कामांमध्ये असणाऱ्या वैद्यांची संख्या हजारात आहे. धन्वंतरी जयंतीच्या दिवशी एकावेळी, एकाच दिवशी, विविध स्थानी ७०० व्याख्याने देण्याचा विक्रम झाला.  चिकित्सा शिबिरे, वनौषधी प्रदर्शने, सेवाभावी दवाखाने चालविणे, विविध वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ इत्यादी माध्यमातून आयुर्वेद व्यासपीठाचे कार्यकर्ते आयुर्वेद प्रचार प्रसाराचे काम करतात.
शालेय अभ्यासक्रमात आयुर्वेद आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू असून त्याचा अभ्यासक्रम बनवून सरकार दरबारी त्याचा पाठपुरावा चालू आहेत. यामुळे  लहानपणापासून आयुर्वेदाचे बाळकडू समाजाला मिळेल. व्यासपीठाची विविध विषयावरील प्रकाशने उपलब्ध असून भारतभर त्याला मोठी मागणी आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून आयुर्वेद व्यासपीठाचे विविध कार्यकर्ते M.C.I.M (महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन), C.C.I.M (सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन) या संस्थांमध्ये ते विविध पदावर कार्यरत आहेत.आत्ता नुकतेच आयुर्वेद व्यासपीठाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वैद्य श्री. जयंतराव देवपुजारी (नागपूर) यांची राष्ट्रीय आयोग भारतीय चिकित्सा पद्धती, नवी दिल्ली च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
या सर्व कार्याचा व्याप सांभाळण्यासाठी आयुर्वेद व्यासपीठाचे केंद्रीय कार्यालय नाशिक येथे द्वारकापुरम (कन्नमवार ब्रिज परिसर) भागात आज सुरू होत आहे. त्याचा लोकार्पण समारंभ पू. सरसंघचालक माननीय डॉक्टर श्री. मोहनराव भागवत यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. एका राष्ट्र-समर्पित व्यक्तीच्या हातून हा सोहळा होत आहे.
जागतिक योग दिन जगात मान्य झाला असून सर्व देशांनी त्याचे स्वागत केले आहे. तसे “जागतिक आयुर्वेद दिन” सर्वत्र साजरा व्हावा व आयुर्वेद शास्त्र हे राष्ट्रीय वैद्यक म्हणून जाहीर व्हावे असा सर्वांनी प्रयत्न करावा असे सुचवावेसे वाटते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पत्नी जया यांचा नंबर बिग बी अमिताभ बच्चन यांच्या मोबाईलमध्ये काय नावाने सेव्ह आहे?

Next Post

कर्जबुडव्यांबाबत बँकांनी केला हा नियम; काय आहे त्यात?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

कर्जबुडव्यांबाबत बँकांनी केला हा नियम; काय आहे त्यात?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011