मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – दक्षिणेतील आघाडीच्या यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक असलेले मणिरत्नम यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी फार कमी जणांना माहिती आहे. त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक यशस्वी चित्रपट दिले आहेत. त्यांचा चित्रपट दिग्दर्शित करणे हे यशा समान मानले जातो. मणिरत्नम यांनी केवळ तामिळच नाही तर हिंदीतही चित्रपट केले आहेत. तसेच मणिरत्नम लवकरच एक पोनीयिन सेलवन सारखा मेगा बजेट चित्रपट घेऊन येत आहेत. मोठमोठे बिग बजेट सिनेमे बनवणाऱ्या मणिरत्नम यांचे वैयक्तिक आयुष्यही खूप रंजक आहे, त्यांच्या संपत्ती आणि आयुष्याशी संबंधित महत्त्वाची माहिती जाणून घेऊ या…
तमिळ चित्रपटसृष्टीला अनेक यशस्वी चित्रपट देणाऱ्या मणिरत्नम यांचा जन्म दि. 2 जून 1956 रोजी मदुराई, तामिळनाडू येथे झाला. मणिरत्नम यांचे पूर्ण नाव गोपाल रत्नम सुब्रमण्यम आहे. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक मणिरत्नम यांनी 1983 मध्ये ‘पल्लवी अनु पल्लवी’ चित्रपटातून पदार्पण केले, तर हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी 1998 मध्ये पहिल्यांदा ‘दिल से’ चित्रपट दिग्दर्शित केला. यानंतर त्याने बॉलीवूडमध्ये रोजा, गुरु आणि बॉम्बे सारखे चित्रपटही केले.
दिग्दर्शक मणिरत्नम यांनाही सिनेमातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चार फिल्मफेअर पुरस्कार आणि सहा तमिळ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. याशिवाय मणिरत्नम यांना त्यांच्या प्रतिभेसाठी 2002 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.
मणिरत्नम यांची पत्नी सुहासिनीही चित्रपटसृष्टीत यशस्वी आहे. ती केवळ अभिनेत्रीच नाही तर ती आता एक यशस्वी दिग्दर्शकही आहे. सुहासिनीने पहिल्यांदा मणिरत्नम यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा त्यांनी नकार दिला, कारण ती एक पारंपारिक मुलगी आहे. मात्र, काही काळानंतर दोघांनी 1988 मध्ये लग्न केले. दोघेही 1992 मध्ये आई-वडील झाले. त्यांच्या मुलाचे नाव नंदन मणिरत्नम आहे. ते राज्यशास्त्रात शिक्षण घेत आहेत आणि लाइम लाईटपासून दूर राहतात.
मणिरत्नम हे केवळ दिग्दर्शकच नाहीत तर ते निर्माता आणि पटकथा लेखकही आहेत. तो जितका दक्षिणेत ओळखला जातो तितकाच त्याच्या कामाला बॉलिवूडमध्येही ओळखले जाते. मणिरत्नम यांची एकूण संपत्ती सुमारे 130 कोटी आहे.









