रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सिन्नर तालुका बनला सलग दुसऱ्या वर्षी टँकर मुक्त, युवा मित्र , टाटा ट्रस्ट व राज्य शासनाचा संयुक्त उपक्रम

जून 7, 2021 | 11:24 am
in स्थानिक बातम्या
0
unnamed 1

सिन्नर –जिल्ह्यात सर्वाधिक पिण्याच्या पाण्याचे टँकर लागणारा तालुका म्हणून शासन दरबारी वर्षानुवर्ष नावलौकिक मिळवलेला सिन्नर तालुका गेल्या दोन वर्षांपासून टँकरमुक्त बनला आहे. ‘युवा मित्र’, ‘टाटा ट्रस्ट’, ‘ए. टी. ई. चंद्रा फाउंडेशन’ व ‘महाराष्ट्र शासन’ यांच्या सहकार्यातून गेल्या ४ वर्षात राबवलेल्या ‘जलसमृद्धी’ अभियानामुळे ही किमया साधली आहे. याअभियानामुळे तालुक्यातील भूजल पातळीत वाढ झाली असून तालुक्यातील गावांसह वाड्या-वस्त्यांवरील विहिरींना भरउन्हाळ्यातही पाणी राहू लागले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करण्याची वेळ कुणावरही येत नाही.तालुका टँकर मुक्त बनल्याने त्यावर दरवर्षी होणाऱ्या करोडो रुपयांच्या खर्चाचीही बचत झाली आहे.
तालुक्यात भोजापूर(३३० दश लक्ष घनफूट) हे एकमेव मोठे धरण असून हे धरण वगळता कोनांबे, ठाणगाव, सरदवाडी या छोट्या धरणांसह ८४ गावांमधील १८२ पाझरतलाव, सिमेंट नाला बांध, छोट्या नाल्यांमधला २३ लाख ६ हजार क्युबीक मीटर गाळ शेतकऱ्यांना सोबत घेऊन संस्थेने नियोजनबद्ध रित्या काढण्यात यश मिळवले. त्यातून तालुक्याची पाणी साठवण क्षमता ८१.४३ दशलक्ष घनफुट अर्थात २३०६ टी.सी. एम. ने वाढली. या कामामुळे या सर्व गावांमधील जवळपास ३७०० विहिरी चार्ज(पुर्नभरण) झाल्या तर काढलेला गाळ शेतकऱ्यांनी स्व:खर्चाने नेत १७१९ एकर पडीक जमीन सुपीक बनवली.

unnamed 2 scaled

या कामासाठी ‘टाटा ट्रस्ट’ने ६ पोकलॅन मशीन्स व ३ जे.सी. बी. मशिन्स ‘युवा मित्र’ ला उपलब्ध करुन दिली. ए.टी. ई. चंद्रा फाऊंडेशनने जवळपास ३० पोकलॅन मशिन्स भाड्याने घेण्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला तर राज्य शासनाने या सर्व मशिन्सकरीता आवश्यक असणाऱ्या डिझेलचा खर्च उचलला. त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांसह पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभाग, मृद व जल संधारण (स्थानिक स्तर), कृषी विभागाच्या स्थानिक व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचे योगदान महत्वाचे ठरले. काही उद्योगांनी आपला सी.एस. आर. फंडही त्यासाठी उपलब्ध करुन दिला. या कामामुळे कमी पाऊस पडूनही तालुक्याच्या भूजल पातळीत १.५ मीटरने वाढ झाली असल्याचा निष्कर्ष शासकीय यंत्रणेने दोन-अडीच वर्षांपूर्वी काढला होता.
सन १९७२ च्या भीषण दुष्काळात गावा-गावातील शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेचा उदय झाला. त्यातून राज्यातील पहिला पाझर तलाव दोडी येथे तयार झाला आणि त्यानंतर गावा-गावात पाझर तलावांची मालिकाच उभी राहिली. त्याच काळात ख्रिश्चन मिशनऱ्यांनीही गावा-गावांमध्ये उभारलेले बंधारे ‘फादर’चे बंधारे म्हणून आपली ओळख आजही टिकवून आहेत. या व्यतिरिक्त गेल्या ४०-४५ वर्षात गावा-गावांमध्ये कोल्हापूर टाईप बंधारे, सिमेंट प्लग बंधारे मोठ्या संख्येने उभारले गेले. मात्र, त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कुठलीही तरतूद नसल्याने व परिसरातील शेतकऱ्यांनाही त्याचे गांभीर्य नसल्याने या सर्वच बंधारे, तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आणि त्यांची साठवण क्षमता कमी-कमी होत गेली. याच तलाव, बंधाऱ्यामधील पाणी पाझरुन परिसरातील विहिरी भर उन्हाळ्यातही अर्ध्या अधिक भरलेल्या असत. त्यातून उन्हाळ्यातील माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागत होती. मात्र, गाळ साचत गेला तशी विहिरींची पाणी पातळी कमी होऊ लागली, विहिरी कोरड्या पडू लागल्या. त्यावर मात करण्यासाठी शासनाने टँकर सुरु करण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता. त्यावर करोडो रुपयांचा खर्च होऊ लागला. युतीच्या शासन काळात मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे जाळे उभारण्यात आले. मात्र, त्यात वाड्या-वस्त्यांचा विचार न करण्यात आल्याने भर उन्हाळ्यात पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या वाड्या-वस्त्यांची संख्या शेकडोने वाढली.
मध्यंतरी राज्यातील काँग्रेस-राष्ट्र्वादी आघाडी सरकारच्या काळात महात्मा फुले जलसंधारण अभियान सुरु करीत धरणे, तलावांमधील गाळ काढण्यासाठी मशिनरी उपलब्ध करुन देण्यात आली. मात्र, गाळ शेतकऱ्यांनी स्व:खर्चाने उचलून नेण्याची घालण्यात आलेली अट शेतकऱ्यांना निटसी भावली नाही. त्यामुळे केवळ जनजागृती अभावी एक चांगली योजना कागदावरच अडकून पडली. नंतरच्या भाजपा-सेना युतीच्या काळात जलसमृद्धी अभियानातंर्गत ‘गाळ मुक्त धरण, गाळ मुक्त शिवार’ योजना येताच ‘युवा मित्र’ ने पुढाकार घेतला. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली. तलावांमधील रापलेला गाळ पडीक जमिनीत टाकल्यास जमिनीला सुपिक बनवू शकतो हे त्यांना पटवून दिले आणि गाळ स्व:खर्चाने उचलून नेण्यासाठी त्यांना राजी केले.’कोरोना‘ महामारीचा मधला लॉकडाऊनचा वर्ष-सव्वा वर्षाचा काळ वगळल्यास चार-साडे चार वर्षात ८४ गावांमधील १८२ बंधारे, नाल्यांमधील २३ लाख ६ हजार क्युबिक मीटर गाळ शेतकऱ्यांनी स्व:खर्चाने वाहून नेत १७१९ एकर पडीक जमीन सुपीक बनवली तर तालुक्याच्या पाणी साठवण क्षमतेत ८१.४३ दशलक्ष घनफुटाची भर घातली. गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये पर्जन्य राजा तालुक्यात सरासरी राखूनच कोसळला असला तरी पाणी साठवण्यासाठी गावा-गावांमध्ये आधीपासूनच भांडी तयार होती. त्यामुळे २०१९ च्या जुलै महिन्यानंतर यंदाचा २०२१ चा जून महिना उगवल्या नंतरही आजपर्यंत तालुक्यातील एकही गावाने अथवा वाडी-वस्तीने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी केलेली नाही.तालुका खऱ्या अर्थाने टँकर मुक्त झाला आहे. शासन, सामाजिक संस्था, शेतकरी एकत्र आल्यास कोणती किमया साधता येऊ शकते याचे हे जिते जागते उदाहरण म्हणता येईल.
…
यामुळे झाला फायदा
जामनदीच्या नांदूरशिंगोटे जवळील उगमापासून दोडी, कणकोरी, मानोरी, नि-हाळे, पांगरी, म-हळ, मिठसागरेपर्यंतच्या नदीपात्राचे खोलीकरण, रुंदीकरण करीत या नदीला मिळणाऱ्या सुरेगाव, दत्तनगर परीसारातील नाल्यांवरील ४ पाझर तलाव,१९ सिमेंट प्लग बंधाऱ्यातील गाळ या उपक्रमातून काढण्यात आला. मानोरीतील लेंडी नाला, जाम नाल्यातील गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. त्यामुळे ८-१० वर्षात पहिल्यांदाच जामनदी ४ महिने दुथडी भरून वहात होती. देवनदीवरील १८ तर म्हाळुंगी नदीवरील ४ ब्रिटीशकालीन वळण बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याबरोबरच त्यांच्यावरील पाट व्यवस्था दुरुस्त करण्यात आली. भोजापूर धरणाच्या लाभ क्षेत्रातील दातली, पांगरीपर्यंतच्या पुरचाऱ्यांची सफाई करण्यात आली. त्यामुळे या संपूर्ण भागात पूरपाणी फिरले आणि जिरले. त्याचाही फायदा झाला. मानोरी, कणकोरी, नि-हाळे, देवपूर भागातील शेतक-यांनी अनेक वर्षानंतर उसाच्या लागवडीला दिलेले प्राधान्य हे त्याचेच यश आहे.
मनीषा पोटे, कार्यकारी संचालक, युवा मित्र
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील सहकारी बँकांच्या कामकाजावर होणारा परिणाम व उपाययोजनाबाबत समिती गठीत

Next Post

१६ जूनचे आंदोलन पुढे ढकलावे, विखे पाटलांचे संभाजीराजेंना आवाहन

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
radhakrishn vikhe patil

१६ जूनचे आंदोलन पुढे ढकलावे, विखे पाटलांचे संभाजीराजेंना आवाहन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011