गुरूवार, ऑगस्ट 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

श्रीविष्णु पुराण… केशिध्वज व खाण्डिक्य यांची कहाणी!

by Gautam Sancheti
सप्टेंबर 13, 2023 | 5:12 am
in इतर
0
bhagwan vishnu

श्रीविष्णु पुराण
अंश-६ (भाग-३)
केशिध्वज व खाण्डिक्य यांची कहाणी!

पराशरांचे कथन पुढे चालू झाले. “परमात्म्याचा साक्षात्कार स्वाध्याय आणि संयम यांच्यामुळे होतो. या दोघांनाही ब्रह्म असेच म्हणतात. स्वाध्यायाच्याद्वारे योग साधावा म्हणजे परमात्मा प्रगट होतो, ही डोळ्यांनी बघायची गोष्ट नव्हे.”
त्यावर मैत्रेयांनी योगाविषयी उत्सुकता आहे असे सांगून तो विषय स्पष्ट करण्यासाठी विनंती केली.
तेव्हा पराशर म्हणाले की, “पूर्वकाली केशिध्वजाने खाण्डिक्याला जो उपदेश केला तोच मी सांगणार आहे.”

vijay golesar
विजय गोळेसर मो. ९४२२७६५२२७

मैत्रेयांनी केशिध्वज व खाण्डिक्य यांचा पूर्वेतिहास विचारल्यावरून पराशर सांगू लागले –
पूर्वी कोणे एके काळी धर्मध्वज जनक नावाचा एक राजा होऊन गेला, त्याचे अमितध्वज आणि कृतध्वज असे दोन मुलगे होते. त्यांपैकी कृतध्वज हा धार्मिक प्रवृत्तीचा होता. त्याचा मुलगा केशिध्वज नावाचा होता. अमितध्वज याचा पुत्र ‘खाण्डिक्य’ हा पुढे राजा झाला, तो प्रवृत्तीमार्गी असून कर्ममार्गी होता पण त्या दोघांत नेहमी चुरस असे.
पुढे असे झाले की, केशिध्वजाने खाण्डिक्य याला पदच्युत करून सत्ता घेतली. तेव्हा आपले पुरोहित आणि सेवक व काही सामानसुमान घेऊन खाण्डिक्य दूरवर वनात चालता झाला. केशिध्वज ज्ञानमार्गी असूनसुद्धा मृत्यूवर विजय मिळावा म्हणून यज्ञयाग व अनुष्ठाने करीत असे.
एकदा असे झाले की, केशिध्वजाचा यज्ञ चालला असताना यज्ञासाठी दूध देणाऱ्या गायीला चरत असताना सिंहाने हल्ला करून मारली. ते वृत्त कळले तेव्हा राजाने याज्ञिकांना विचारले की, मी गाईला पुरेसे संरक्षण देऊ शकलो नाही. तरी याला प्रायश्चित्त कोणते घ्यावे?

तेव्हा पुरोहितांनी सांगितले की, त्याबाबतीत त्यांना ज्ञान नसल्यामुळे राजाने महात्मा कशेरू याला विचारावे. जेव्हा राजाने कशेरूला विचारले तेव्हा त्यानेही आपली असमर्थता सांगून भृगुपुत्र शौनकापाशी जाण्यास सुचविले.
शौनक म्हणाला की, सांप्रतकाळी या भूमंडलावर हे ज्ञान असणारा कुणीही नाही. फक्त एका व्यक्तिला ते ज्ञान आहे आणि ती व्यक्ती म्हणजे ज्याचा तू पराभव केलास तो तुझा वैरी खाण्डिक्य, ही आहे.
तेव्हा राजा म्हणाला “तर मग ते ज्ञान मिळावे म्हणून मी लगेच खाण्डिक्यापाशी जातो.
जर त्याने प्रायश्चित्ताचा विधी सांगितला तर माझा यज्ञ पूर्ण होईल, उलटपक्षी जर त्याने माझा वध केला तर मी ज्ञानोपासकांच्या गतीला जाईन.”
असे सांगून तो रथात बसून जिथे खाण्डिक्य होता तिथे गेला. त्याला येताना खाण्डिक्याने दुरून पाहिले. तेव्हा धनुष्यबाण सज्ज करून तो म्हणाला की, “तू इथेसुद्धा आम्हाला मारण्यासाठी आला आहेस काय? पण आज मात्र मी तुला जिवंत परत जाऊ देणार नाही. कारण तू माझा वैरी आहेस.”
केशिध्वजाने उत्तर दिले की, तो काही धार्मिक शंकांचे उत्तर मिळावे यासाठी आला असून खाण्डिक्याने ती शंका निवारण करावी अगर त्याचा जीव घ्यावा.
तेव्हा खाण्डिक्याने एका बाजूला जाऊन आपल्या सर्व लोकांबरोबर विचारविनिमय केला. सर्वांचे मत असेच पडले की, शत्रू आयता हाती सापडला असताना त्याला मारून राज्य पुन्हा हाती घ्यावे पण तो सल्ला काही त्याला पसंत पडला नाही म्हणून त्याने केशिध्वजाला जवळ बोलावला आणि त्याला शंका विचारली.

केशिध्वजाने गायीच्या हत्येची सर्व हकीकत सांगून प्रायश्चित्त विचारले. मग खाण्डिक्याने त्याला तो सर्व विधी समजावून सांगितला. नंतर राज हाही खाण्डिक्याची आज्ञा घेऊन परतून गेला आणि यज्ञ पूर्ण केला.
नंतर राजाला अचानक स्मरण झाले की, सर्व काही ठीक पार पडलेखरे! पण ज्याच्यामुळे यज्ञ पार पडला त्या खाण्डिक्याला गुरुदक्षिणा देण्याची राहूनच गेली; मग तो पुन्हा रथात बसून अरण्यात जाऊन खाण्डिक्याला भेटला आणि गुरुदक्षिणा मागून घेण्यासाठी विनंती केली.
तेव्हा खाण्डिक्याने आपल्या सहकाऱ्यांना त्यांचे मत विचारले असता, ते म्हणाले की, याचे राज्यच गुरुदक्षिणा म्हणून मागून घ्यावे. विनासायास राज्य मिळवण्याची ही उत्तम संधी दाराशी चालून आली असताना ती सोडून देऊ नये.
त्यावर खाण्डिक्य बोलला की, व्यावहारिक दृष्टीने पाहता त्यांनी योग्य सल्ला दिला आहे परंतु आत्महिताचा त्यात विचार केलेला नाही.
मग तो केशिध्वजाकडे वळून बोलला की, “जर तू मला खरोखरच इच्छित गुरुदक्षिणा देणार असलास तर एवढेच कर. तू परमार्थातील मोठा अधिकारी आहेस म्हणून मला असा काहीतरी उपाय सांग की, जो केल्याने दुःख व क्लेशांची संपूर्ण शांती होईल.”
तेव्हा केशिध्वजाने बोलण्यास आरंभ केला.”हे पहा! क्षत्रियांना राज्याहून जास्त प्रिय काहीही नसते. मग तू माझे राज्यच का बरे मागितले नाहीस?”

खाण्डिक्याने उत्तर दिले – “केशिध्वजा! ते कारणही तुला सांगतो, अरे राज्याची हाव मूर्खाला असते. क्षत्रियांचा धर्म म्हणजे प्रजेचे संरक्षण व पालन करणे आणि राज्याचे जे विरोधी असतील त्यांचा धर्मयुद्धात वध करणे हा आहे.
मी दुर्बळ असल्यामुळे तू माझे राज्य जिंकून घेतलेस पण त्यामुळे मी दोषी ठरत नाही. जरी राजाचे कर्तव्य हे अविद्या असले तरी जाणूनबुजून ते सोडले तर तो दोष ठरतो. एवढ्याचसाठी मी राज्य मागितले नाही; कारण मला कर्मचक्रात पुन्हा गुंतावयाचे नाही.”
असे खाण्डिक्याचे उत्तर ऐकून केशिध्वजाने त्याचे अभिनंदन केले. तो म्हणाला “मी जो राज्यकारभार करतो आणि अनेकानेक यज्ञ करतो त्याचे कारण एवढेच आहे की, मला अविद्या म्हणजेच प्रवृत्तीमार्गाने मृत्यूला जिंकावयाचे आहे. तू मात्र विवेकसंपन्न बनला आहेस म्हणून धन्य आहेस. आता अविद्येचे स्वरूप तुला स्पष्ट करून सांगतो.

श्रीविष्णु पुराण अंश-६ भाग-३( क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल-९४२२७६५२२७

Shree Vishnu Puran Keshidhwaj Khandikya by Vijay Golesar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नंदुरबार जिल्ह्यातील या समितीला राष्ट्रीय पुरस्कार… राष्ट्रपतींनी केला गौरव

Next Post

जन्माष्टमी विशेष… धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे… भगवान श्रीकृष्ण… युद्धभूमीवर जगण्याचे तत्वज्ञान सांगणारा जगातला पहिला तत्वज्ञ!

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

manoj jarange 1
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला येणार की परत माघारी जाणार? सरकारचे प्रयत्न सुरु

ऑगस्ट 28, 2025
GzWb8 LbwAAmwZi e1756344943344
महत्त्वाच्या बातम्या

बघा, शिवतीर्थावरील हा व्हिडिओ….राज ठाकरे उध्दव ठाकरे यांच्या सहकुटुंब भेटीचे चित्रीकरण

ऑगस्ट 28, 2025
modi 111
मुख्य बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवत्सरीनिमित्त दिल्या शुभेच्छा…क्षमा, करुणा आणि नम्रतेचे केले आवाहन

ऑगस्ट 28, 2025
प्रातिनिधिक फोटो
राष्ट्रीय

या चार नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता…१२ हजार ३२८ कोटींचा अंदाजित खर्च

ऑगस्ट 28, 2025
Screenshot 20250828 063447 Collage Maker GridArt
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील या चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर…शिक्षक दिनानिमित्त दिल्लीत समारंभ

ऑगस्ट 28, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना व्यवसायात लाभाचे संकेत, जाणून घ्या, गुरुवार, २८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 27, 2025
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणरायाची भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा 1024x682 1
राष्ट्रीय

दिल्लीत महाराष्ट्र सदनात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाची प्राणप्रतिष्ठा

ऑगस्ट 27, 2025
Screenshot 20250827 184001 Dailyhunt
महत्त्वाच्या बातम्या

उध्दव ठाकरे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी…बाप्पाचे घेतले दर्शन

ऑगस्ट 27, 2025
Next Post
Shrikrishna Arjun

जन्माष्टमी विशेष... धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे... भगवान श्रीकृष्ण... युद्धभूमीवर जगण्याचे तत्वज्ञान सांगणारा जगातला पहिला तत्वज्ञ!

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011