रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राजभवनात भुताटकी? शांती यज्ञाचाही सल्ला

मे 24, 2021 | 6:44 am
in संमिश्र वार्ता
0
Governor News 2 750x375 1

विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात कुरबुरी सुरूच आहेत. भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदाची योग्य भूमिका निभावत नसल्याचा आरोप राज्य सरकारकडून नेहमीच करण्यात येतो. आता मात्र आमच्या संयमाची परीक्षा कोणी पाहू नये, असा इशाराचा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.
विधान परिषेदतील १२ नामनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीसाठी सरकार राज्यपालांकडे पाठवते. पण राज्यपाल त्यावर सहा महिने झाले तरी निर्णय घेत नाहीत. आता फाइलही भुतांनी पळविली आहे काय? राजभवनात कोणत्या भुताटकीचा वावर वाढला आहे? एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल, अशी खोचक टीका शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून राज्यपालांवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हटले की, सध्या पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे राज्यपाल जास्तच चर्चेत आहेत. बंगालचे राज्यपाल जगदीश धनकड हे अतिवेगवान तर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे काही बाबतीत मंदगतीचे झाले आहेत. ही टीका नसून वस्तूस्थिती आहे. गतिमान प्रशासनाच्या व्याखेत महाराष्ट्राचे राजभवनात बसत नाही का? राज्याच्या मंत्रिमंडळाने १२ सदस्यांची शिफारस विधान परिषदेवर नामनियुक्त करण्यासाठी केली. ही शिफारस करून सहा महिने उलटून गेले तरी राज्यपाल त्यावर निर्णय घेण्यास तयार नाहीत. आता उच्च न्यायालायात हा वाद पोहोचला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपालांना जाब विचारला आहे.
महाराष्ट्रात लसींचा तुटवडा आहे. याबाबत राज्यपालांनी केंद्राकडे पाठपुरावा करावा. गुजरातमधील तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना पंतप्रधानांनी हजार कोटींचे पॅकेज दिले. महाराष्ट्रावर अन्याय का केला, याबाबत राज्यपालांनी मदतीची मागणी करून मराठी जनतेची मन जिंकली पाहिजेत. हे करायचे सोडून राज्यपाल सहा महिन्यांपासून एका फाइलचे राजकारण करत आहेत. मुंबईच्या किनारपट्टीवर धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा फाइलला बसला आहे. वादळ लाटा राजभवनात शिरल्या आणि फाइल वाहून गेली, असेही म्हणता येणार नाही. आता तर फाइलचे प्रकरण गूढ होत चालले आहे. कारण १२ जणांच्या नावांची शिफारस असलेली फाइल राज्यपाल सचिवालयातून अदृश्य झाल्याचे समोर आले आहे.
माहितीच्या अधिकारात अनिल गलगली यांनी याबाबत माहिती मागविली. तेव्हा अशी कोणती फाइलच उपलब्ध नसल्याचे राज्यपाल कार्यालयाने कळविले आहे. हा तर धक्कादायक प्रकार नसून, भुताटकीचा प्रकार आहे. फार तर त्याला गूढ गौप्यस्फोट म्हणता येईल, असे आसूड सामनामधून ओढण्यात आले.
आमदार नियुक्तीचा विशिष्ट कालावधीच निर्णय घ्यावा असे कायद्यात नमूद नाही. त्यामुळे राज्यपाल निर्णय घेत नाही, असा अर्थ काढणे चुकीचे असल्याचा आशिष शेलार यांच्या दाव्याला अर्थ नाही. या उलट सारवासारवीत राज्यपालांची नियत उघड पडत आहे. निर्णय कोणत्या व किती कालावधीत घ्यावा, असे कायद्यात म्हटले नाही, ही थापेबाजी व पळवाट आहे. कारण त्याचा अर्थ असाही होत नाही, वर्षभर नियुक्त्याच करून नका. हा राज्याचा व विधीमंडळाचा अपमान आहे.
फाइल दाबून ठेवा असा वरचा हुकूम आहे. राज्यातील सरकार घालवू अशा फाजिल विश्वासावर विरोधी पक्ष जगत आहे. परंतु हा विश्वास ऑक्सिजन नसून कार्बन डायऑक्साइड आहे. या खटपटीत गुदमरून तडफडाल हा धोक्याचा इशारा आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
महाराष्ट्र पुरोगामी, संयमी आहे म्हणजे तो भेकड आहे असे मानू नये. ज्येष्ठांचा आदर करणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळांच्या माथी हाणू काठी हे सुद्धा आमच्या संतांनी सांगितलेले आहे, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काँगोत ज्वालामुखीचा हाहाकार; शेकडो घरे उद्ध्वस्त….

Next Post

अखेर लस जातेय कुठे? उत्पादन ८ कोटी, मिळतात ५ कोटी!

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
vaccination 1 scaled e1668092358264

अखेर लस जातेय कुठे? उत्पादन ८ कोटी, मिळतात ५ कोटी!

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011