इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना- मनसेच्या युतीची चर्चा सुरु असतांनाच आज उध्दव ठाकरे यांनी मोठे विधान केले. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होणार, आता संकेत देणार नाही, थोड्या दिवसात बातमीच देतो असे थेट विधान उध्दव ठाकरे यांनी केले. ते म्हणाले की, शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही कोणताही संभ्रम नाही.
यावेळी ते म्हणाले की, युतीसंबधी जे बारकावे असतील त्यावर आम्ही काय करायचे ते पाहू असेही ते म्हणाले. या विधानावर मनसे नेते अविनाश देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. ज्यावेळी आमच्याकडे युतीचा ठोस प्रस्ताव येईल त्यावेळी त्यावर राज ठाकरे निर्णय घेतील. तर संदीप देशपांडे यांनी सांगितले की ते काय बातमी देणार याची वाट पाहू.
कालच मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॅाब्लेम नाही. मात्र त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. दोघांकडे एकमेकांचे नंबर आहे. आम्ही बोलून काही फरक पडणार नाही. दोन भावांनी एकत्र यावे हे त्यांनी ठरवावे. राज ठाकरे यांची इच्छा असेल ती माझी इच्छा. पुढाकार कोणी घ्यावा हे त्यांनी ठरवावं, आम्ही बोलून काही उपयोग नाही असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर सकाळी खा. संजय राऊत यांनी दोघांचे फोन झालेही असेल असे सांगत संकेत दिले. त्यानंतर उध्दव ठाकरे यांचे विधान आले. त्यामुळे राज ठाकरे व उध्दव ठाकरे यांचा फोन झाल्याची चर्चाही आता सुरु झाली आहे.