सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बहुमत चाचणी आधीच राजीनामा देणे उद्धव यांना महागात? शिंदेंच्या वकीलाने मांडला हा मुद्दा

by India Darpan
ऑगस्ट 3, 2022 | 6:07 pm
in संमिश्र वार्ता
0
uddhav thackeray

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणी आधीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन चूक केली का? बुधवारी सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या दाव्यावरील सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे यांचे वकील महेश जेठमलानी यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. या बाबीचा न्यायालयाच्या निकालावर काही परिणाम होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जेठमलानी म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा अर्थ म्हणजे सरकारकडे बहुमत नाही. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर नवीन सरकार स्थापन झाले आहे. उद्धव ठाकरे यांचा राजीनामा हा महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठे वळण देणारा असल्याचे त्यांच्या युक्तिवादावरून स्पष्ट झाले आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे सरकार विरुद्ध शिवसेनेचा युक्तिवाद कमजोर होत असल्याचे मानले जात आहे.

उद्धव ठाकरेंचा घाईगडबडीत राजीनामा ही मोठी चूक असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वीच म्हटले होते. आता सर्वोच्च न्यायालयात जेठमलानी यांनी केलेला युक्तीवाद खरा ठरला आहे. जेठमलानी यांनी या दोन मुद्यांवर भर दिला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बहुमताच्या चाचणीत पराभव झाला होता. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या सरकारची स्थापना झाली. जेठमलानी म्हणाले की, जर मुख्यमंत्र्यांनी बहुमताच्या चाचणीला सामोरे जाण्यास नकार दिला तर त्यांच्याकडे बहुमत नाही असे मानले जाते.

त्यामुळे बहुमत चाचणीला सामोरे न जाता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे ही मोठी चूक होती का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत आमदारांच्या क्रॉस व्होटिंगला सामोरे जाण्याऐवजी राजीनामा देणे योग्य असल्याचे मानले जात आहे. उद्धव ठाकरे यांना पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची संधी होती, मात्र त्यांनी ज्या घाईत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला ती माझ्या दृष्टीने मोठी चूक होती, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीतूनही असेच काही प्रश्न निर्माण झाले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, त्यांना पक्षांतराचा कायदा लागू होत नाही. याचे कारण या लोकांनी शिवसेना सोडली नाही तर पक्षाचे नेतृत्व बदलण्याची इच्छा आहे. एवढेच नाही तर महेश जेठमलानी यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीसंदर्भातील प्रश्नांनाही उत्तरे दिली. ते म्हणाले की, जुन्या सरकारने वर्षभराचा कालावधी लोटूनही विधानसभा अध्यक्षांची निवड केली नाही. राज्यघटनेनुसार नवीन सरकारला विधानसभेच्या अध्यक्षांची निवड करण्याची मुभा आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर नवीन सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर विधानसभेत १६४ विरुद्ध ९९ मतांद्वारे नवे सभापती निवडून आले आहेत.

…तर असे झाले असते
उद्धव हे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर शिवसेनेने त्यासाठी व्हिप बजावला असता. बंडखोरांनी जर पक्षाचा व्हिप पाळला नसता आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले असते तर हे सिद्ध झाले असते की बंडखोर हे पक्षाला जुमानत नाहीत. उद्धव यांनी चाचणीपूर्वीच राजीनामा दिला. त्यामुळे बंडखोरांचे बंडखोरत्व सिद्ध करण्याबाबत ती एक महत्त्वाची घडामोड असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Shivsena Chief Uddhav Thackeray CM Resignation Before Floor Test

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Next Post

इकडे लक्ष द्या! विक्स अॅक्शन 500, डी कोल्ड टोटल यासारख्या औषधांवर बंदी? केंद्राकडून लवकरच घोषणा

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

इकडे लक्ष द्या! विक्स अॅक्शन 500, डी कोल्ड टोटल यासारख्या औषधांवर बंदी? केंद्राकडून लवकरच घोषणा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011