शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

केंद्र सरकार ५० टक्के हून अधिक एमएसपी निश्चित करणार… शेतकऱ्यांचे उत्पादनही खरेदी करणार

by Gautam Sancheti
डिसेंबर 7, 2024 | 12:13 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 15

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यसभेत उत्तर देताना सांगितले की काँग्रेसने यापूर्वी सत्तेवर असताना शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी किमान हमीभाव (एमएसपी ) देण्यास नकार दिला होता. याउलट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या दशकभरात सातत्याने एमएसपीमध्ये वाढ केली आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून एमएसपीवर पीक खरेदी करत राहील अशी ग्वाही चौहान यांनी दिली आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रति सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. चौहान म्हणाले की, सरकार उत्पादन खर्चाच्या ५० टक्के पेक्षा जास्त किमान हमीभाव निश्चित करण्याबरोबरच शेतकऱ्यांकडून उत्पादनाची खरेदी देखील करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार शेतकऱ्यांना फायदेशीर भाव मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे.

शेतकऱ्यांच्या शेतमालाची किमान हमीभावानुसार खरेदी केली जाईल असे आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले. आमचे सरकार ५० टक्के पेक्षा जास्त एमएसपी निश्चित करेल आणि उत्पादनाची खरेदी देखील करेल. हे नरेंद्र मोदींचे सरकार आहे, मोदींची ग्यारंटी आश्वासन पूर्ण करणे आहे असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी म्हटले होते की आम्ही एमएस स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारू शकत नाही. २०१९ मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने निर्णय घेतला की खर्चावर ५० टक्के नफा जोडून एमएसपी दर निश्चित केले जातील. काँग्रेस सरकार सत्तेवर असताना त्यांनी कधीही शेतकऱ्यांना ५० टक्क्यांपेक्षा जास्त नफा दिला नाही, मात्र आम्ही कटिबद्ध आहोत आणि किमान ५० टक्क्यांपेक्षा जास्त नफा देऊन शेतकऱ्यांचे पीक खरेदी करू.

चौहान म्हणाले की, सरकार केवळ खतेच पुरवत नाही तर शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी अनुदानही देते. अलिकडेच शेतकऱ्यांना १ लाख ९४ हजार कोटी रुपयांचे भरीव अनुदान वितरित करण्यात आले. यामुळे शेतकरी युरिया आणि डीएपी सारख्या आवश्यक वस्तू कमी किमतीत खरेदी करू शकतात. शेतकऱ्यांना अनुदानित खते पुरवण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही चौहान यांनी दिली. आम्ही सातत्याने पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध करून दिली आहेत आणि यापुढेही देऊ असे ते म्हणाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देशातील २८ जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालये स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी…ठाणे जिल्‍ह्याचा समावेश

Next Post

अजित पवार यांना आयकर विभागाचा मोठा दिलासा…जप्त केलेली संपत्ती केली रिलिज

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
ajit pawar11

अजित पवार यांना आयकर विभागाचा मोठा दिलासा…जप्त केलेली संपत्ती केली रिलिज

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011