नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह यासंदर्भातील वादावर शिंदे आणि ठाकरे गटाला आज त्यांचे म्हणणे लेखी स्वरुपात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करावयाचे होते. त्यानुसार उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील दोन्ही गटांनी त्यांच्या वकीलांमार्फत हे लेखी प्रतिज्ञापत्र आयोगापुढे सादर केले आहे. त्यात शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे भक्कम दावे केले आहेत.
शिंदेंनी त्यांच्या लेखी कागदपत्रांद्वारे दावा केली आहे की, तब्बल ४० शिवसेना नेते, ६ उपनेते, १३ खासदार, ४० आमदार, ४९ जिल्हा प्रमुख, ८७ विभाग प्रमुख आणि एकूण प्रतिनिधी सभेतले २८२ पैकी १९९ जणांचा आपल्याला पाठिंबा आबे. यासंदर्भात त्यांनी जे कागदपत्र सादर केले आहे त्यात हे सर्व नमूद केले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, हा दावा किती भक्कम आहे की पोकळ आहे यासंदर्भातील खातरजमा आयोग कसे करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/_prashantkadam/status/1620048679225933824?s=20&t=GoW7S5TvbF9D9_xwK0rocA
निवडणूक आयोगाकडे ठाकरे गटाच्यावतीने ११२ तर शिंदे गटाच्यावतीने १२४ पानांचा लेखी युक्तीवाद करण्यात आला आहे. म्हणजेच, शिंदे गटाची २ पाने अधिक आहेत. या युक्तीवादात ठाकरे गटाने म्हटले आहे की, दहाव्या शेड्ुल नुसार या लोकांनी पक्ष सोडला, त्यामुळे ते पक्षाच्या चिन्हावर दावा करु शकत नाहीत. तसा अधिकार त्यांना मिळत नाही.
तर, शिंदे गटाने दावा केला आहे की, संघटनात्मक पक्षाचा ठाकरे गटाचा दावाच अयोग्य आहे. कारण, त्यांची निवड ही लोकशाहीला धरुन नाही. त्यामुळे शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या पक्ष प्रमुख या पदालाच आव्हान दिले आहे.
https://twitter.com/_prashantkadam/status/1620047877807685633?s=20&t=GoW7S5TvbF9D9_xwK0rocA
Shinde Group Documents Claim Election Commission
Shivsena Politics