सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

फडणवीस यांनीच काढला ‘जिहाद; शरद पवार यांची टीका

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 16, 2024 | 11:30 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Sharad Pawar

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः जिहाद हा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला. काही मतदारसंघात अल्पसंख्याकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले. पुण्याच्या काही भागात विशिष्ट समाज आहे, हिंदू समाज आहे. त्यांनी भाजपला मतदान केले, तर आम्हाला सवय आहे. असेच होते; पण याचा अर्थ ‘जिहाद’ होतो असे नाही, असे म्हणत शरद पवार यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले.

पवार म्हणाले, की फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘जिहाद’ हा शब्द वापरत निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना निवडणुकीत यश येणार नाही, हे लक्षात घेत त्यांनी हिंदू-मुस्लिम विषय घेऊन वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मी कॉलेजला असल्यापासून अनेक पंतप्रधानांची भाषणे ऐकली आहेत. यात विकासाच्या मु्द्यावर उद्याचा देश कसा असावा, यावर ते भाष्य करत होते; पण नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत, जे विकासाचा नाही, तर ४०० पारचा नारा देत आहे. हा ४०० पारचा नारा कशासाठी, असा सवाल ही त्यांनी या वेळी उपस्थित केला आहे. सरकार चालवण्यासाठी जर २७२ खासदार लागातात, तर ४०० पारचा पारा कशासाठी हे जनतेच्या लक्षात आल्याने जनतेने त्यांना रोखले, असे ते म्हणाले.

राज्यातील बेपत्ता महिला अन्‌‍ मुलींचा आकडा पाहिला तर तो खूप मोठा असल्याचे दिसून येते. एका बाजूने लाडकी बहिण म्हणायचे अन्‌‍ दुसरीकडे त्यांच्यावर अत्याचार होत आहे, त्या बेपत्ता होत आहेत. त्यांचा पत्ता लागत नाही. आम्ही लोकांच्या समोर ही दुसरी बाजू मांडत आहोत, असे सांगून ते म्हणाले, की सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी अस्वस्थ आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना हे सरकार काहीच करत नाही, यामुळे शेतकरी नाराज झाला आहे. सध्या राज्यातली परिस्थिती पूर्णता गंभीर झालेली आहे. समाजात विध्वंसाचे वातावरण पेरण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. रोजगार नसल्यामुळे युवकांमध्ये नैराश्य वाढू लागले आहे.

लाडकी बहीण योजनेचा फार परिणाम होणार नाही. कारण राज्यातील महिलांवर गेल्या दोन-तीन वर्षात अत्याचाराचे प्रमाण वाढू लागले आहे, हे सांगताना त्यांनी आकडेवारी सादर केली. मुलींवर व महिलांवर गेल्या दोन वर्षात ६७ हजार ३८१ अत्याचाराच्या घटना सरकारी आकडेवारीनुसार घडल्या आहेत. मुलींचे व महिलांची बेपत्ता होण्याची आकडेवारी आकडेवारी ६४ हजार आहे. यावरून महिलांना सुरक्षिततेची अधिक गरज आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी पाऊले टाकलेली आहेत आणि महाराष्ट्रातील जनता आमच्या बाजूने कौल देईल व महाविकास आघाडीच्या मागे उभे राहील, असा आत्मविश्वास पवार यांनी व्यक्त केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

फटाक्याचा आवाज बांद्र्यापर्यंत पोचवा….मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरेंना टोला

Next Post

नाशिक महापालिकेची सत्ता दिल्यानंतर पाणी प्रश्नासह चौफेर विकास मनसेमुळेच झाला…राज ठाकरे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

वक्फ संशोधन कायद्याला आव्हान देणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

सप्टेंबर 15, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274
महत्त्वाच्या बातम्या

पराभवानंतरही पाकिस्तान संघाला मिळाले इतके कोटी….संजय राऊत यांनी सांगितला धक्कादायक आकडा

सप्टेंबर 15, 2025
VO7rnvQq 400x400 e1757903064573
राष्ट्रीय

संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण खरेदी नियामावलीला दिली मंजुरी…हा होणार फायदा

सप्टेंबर 15, 2025
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन 5 1024x683 1
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन…आज शपथविधी

सप्टेंबर 15, 2025
Untitled 7
संमिश्र वार्ता

समृध्दी महामार्गावर खिळे? अखेर कंत्राटदारावर गुन्हा दाखल

सप्टेंबर 15, 2025
Screenshot 20250915 070634 Facebook
संमिश्र वार्ता

मविप्रच्या वार्षिक सभेच्या व्यासपीठावर गँग्स ऑफ वासेपुर…सरचिटणीसांनी पोस्ट केला हा फोटो

सप्टेंबर 15, 2025
G008bSZXIAAjtvu
मुख्य बातमी

क्रीकेटच्या मैदानात सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानचा धुव्वा…हस्तांदोलन टाळलं, श्रध्दांजली अर्पण केली

सप्टेंबर 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Next Post
Untitled 39

नाशिक महापालिकेची सत्ता दिल्यानंतर पाणी प्रश्नासह चौफेर विकास मनसेमुळेच झाला…राज ठाकरे

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011