बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पाचवी आणि आठवीच्या परीक्षेत विद्यार्थी नापास झाले तर? शिक्षण विभागाने काढले हे आदेश

by Gautam Sancheti
जून 24, 2023 | 10:44 am
in मुख्य बातमी
0
प्रातिनिधीक छायाचित्र

प्रातिनिधीक छायाचित्र


पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बारा वर्षांपूर्वी आलेल्या शिक्षण हक्क कायद्याने नवीन पिढीचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सोपे केले. मुलांची परीक्षा घ्या, पण नापास करू नका, असे या कायद्यात म्हटले होते. पण आता कायद्यात सुधारणा करण्यात आली असून दोन परीक्षांमध्ये तर विद्यार्थ्यांना उत्तीर्ण व्हावेच लागणार आहे.

पहिली ते नववी अशा सर्व वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा होते, मात्र नापास करता येत नाही. त्यामुळे जे विद्यार्थी अभ्यासात कमी आहेत, त्यांना पुढील शिक्षणात अडचण निर्माण होऊ लागली होती. विशेषतः पाचवी आणि आठवी हे दोन वर्ग अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. कारण पाचवीनंतर खऱ्या अर्थाने उच्च माध्यमिक शिक्षण सुरू होते आणि आठवीनंतर विद्यार्थ्यांच्या भविष्यात महत्त्वाचे योगदान देणारे शिक्षण सुरू होते. त्यामुळे आता शालेय शिक्षण विभागाने पाचवी आणि आठव्या वर्गाच्या वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. या दोन्ही वर्गांच्या वार्षिक परीक्षा आजही होतात, मात्र त्यात कुणालाच नापास केले जात नाही. पण आता या दोन्ही वर्गांमध्ये नापास होऊ चालणार नाही. कारण नापास झालेल्या विद्यार्थ्याला एकदा पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळेल, मात्र त्यातही नापास झाल्यास त्याला त्याच वर्गात राहावे लागणार आहे.

विशेषतः आठव्या वर्गात विशेष अभ्यास न करता पुढच्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत या विद्यार्थ्यांना पाहिजे तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या करीयरवर परिणाम झाल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते.

पालकांसाठी आनंदाची बाब?
शिक्षक कधीही परीक्षेच्या विरोधात नसतात. त्यांना नेहमी मुलांनी आपल्या मेरीटवरच पुढे जावे असे वाटत असते. पण पालकांना चिंता वाटू लागली होती. सुरुवातीला कायदा आला तेव्हा सगळी मुले पास होऊ लागली. परिणामी आपला मुलगा हुशारच आहे, असा समज पालकांचा होऊ लागला. मात्र भविष्यात अनेक मुलांच्या हाती फारसे काही लागले नाही. त्यामुळे आता राज्य सरकारचा निर्णय पालकांसाठी आनंदाची बाब ठरणार का, हे बघण्याची उत्सुकता असेल.

शाळेतून काढणार नाही, पण
विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही, तर त्याला अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करण्यात येईल. वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांत त्याची पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. संबंधित विद्यार्थी त्याही परीक्षेत अनुत्तीर्ण झाला तर त्याला पुन्हा पाचवी किंवा आठवीच्याच वर्गात ठेवले जाईल. प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकले जाणार नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोनातून कमावले शंभर कोटी? सनदी अधिकाऱ्याकडे सापडले मोठे घबाड

Next Post

लेक पोलिस, बाप चोर… सैफ अलि आणि सारा खानची जोडी मोठ्या पडद्यावर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

539613361 1218995730272784 914712606899021038 n
स्थानिक बातम्या

मुंबई येथे नाशिकच्या उद्योजकांच्या संघटनेसोबत वीज दराबाबत महत्त्वपूर्ण बैठक….ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले हे निर्देश

ऑगस्ट 27, 2025
accident 11
क्राईम डायरी

देवदर्शनासाठी रस्त्याने पायी जाणा-या महिलेस दुचाकीची धडक…उपचारादरम्यान मृत्यू

ऑगस्ट 27, 2025
facebook insta
क्राईम डायरी

फेसबुकवरील फ्रेण्ड रिक्वेस्ट स्विकारणे महिलेस पडले महागात…सव्वा सोळा लाखाला गंडा

ऑगस्ट 27, 2025
GzWXER0a4AICfsU scaled e1756290053297
महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणेशाचे आगमन…बाप्पाला घातले हे साकडे (बघा, व्हिडिओ)

ऑगस्ट 27, 2025
Manoj Jarange Patil
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला रवाना…ठिकठिकाणी स्वागत,पत्नी व मुलीला अश्रू अनावर

ऑगस्ट 27, 2025
INDIA GOVERMENT
संमिश्र वार्ता

या महाविद्यालयातील २१ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार…महाराष्ट्रातील २ शिक्षकांचा समावेश

ऑगस्ट 27, 2025
modi 111
महत्त्वाच्या बातम्या

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा

ऑगस्ट 27, 2025
1 6 1068x1335 1 e1756283788606
संमिश्र वार्ता

गणेशोत्सवानिमित्त रील स्पर्धा….प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

ऑगस्ट 27, 2025
Next Post
FzPUTJ5WYAAtTAm

लेक पोलिस, बाप चोर... सैफ अलि आणि सारा खानची जोडी मोठ्या पडद्यावर

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011