नवी दिलली , विशेष प्रतिनिधी
गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शाळा, महाविद्यालयासह अनेक शैक्षणिक संस्था बंद असून केवळ ऑनलाईन क्लॉस सुरू आहेत. सहाजिकच विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. परंतु आता कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी होत असल्याने अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र पुन्हा कोरोनाची तिसरीला देऊ शकते, त्यामुळे सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातच केंद्र सरकार आणि विविध राज्यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अनेक आरोग्य तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे
आरोग्य तज्ज्ञ डॉ.नरेश त्रेहान यांनी मुलांच्या लसीकरणापूर्वी राज्यांमध्ये शाळा उघडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. डॉ. त्रेहान म्हणाले की, शाळा उघडण्याची एवढी घाई का आहे ? हे आम्हाला समजत नाही. कारण जर मुले आजारी पडू लागली तर त्यांची काळजी घेणे कठीण होईल. म्हणूनच आम्ही लोकांना आवाहन करतो की, सर्वांनी लस घेईपर्यंत धीर धरा. एकदा सर्व मुलांना लसीकरण झाले की मग तुम्ही शाळा उघडा. आपल्या लोकसंख्येचा आकार लक्षात घेऊन आपण सावध असले पाहिजे, असेही ते म्हणाले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतही आरोग्यतज्ज्ञांकडून सरकारला निवेदन देण्यात आले आहे. यापूर्वी, डॉ. त्रेहान यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल सांगितले होते की, जर आपल्याला देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर नियंत्रण ठेवायचे असेल, तर प्रत्येकाने शिस्त पाळली पाहिजे. कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल. कारण त्यांच्या मते, कोरोनाची तिसरी लाट कमी केली जाऊ शकते, पण ती येण्याची खात्री आहे.
दरम्यान, कोरोना लसीकरणाबद्दल ते म्हणाले होते की, आमची संख्या इतकी जास्त आहे की आता चार-पाच महिने लागू शकतात. आपण किती कमी करू शकतो आणि येणारी तिसरी लाट टाळू शकतो हे पाहावे लागेल. जर आपण अनेक लोकांना लसीकरण केले आणि पाच महिन्यांसाठी कोरोना लाट टळली तर तयारी देखील ठीक होईल. गेल्या २४ तासांत देशात सुमारे ४५ हजार कोरोनाची नवीन रुग्ण आढळले असून ४६० लोकांचा मृत्यू झाला आहे.