नाशिक – नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव ने महाराष्ट्र संघातर्फे जोरदार अष्टपैलु कामगिरी करून रणजी ट्रॉफी सामन्यात आसामवरील विजयात मोठा वाटा उचलला. ५२ धावा व सामन्यात ११ बळी . रोहतक, हरियाणा येथे झालेल्या एलिट गटातील ग्रुप जीच्या सामन्यात आसामवर महाराष्ट्र संघाने एक डाव व ७ धावांनी दणदणीत विजय मिळविला . सत्यजित ने आठव्या क्रमांकावर ६ चौकार व १ षटकरासह खणखणीत ५२ धावा करताना महाराष्ट्र संघाला पवन शाह च्या साथीने चारशे च्या वर धावा करण्यात मोलाची मदत केली. तर गोलंदाजीत अतिशय प्रभावी कामगिरी करताना, पहिल्या डावात आसामचे केवळ २५ धावात ४ गडी बाद करून फॉलो ऑन देण्यात महत्वाचे योगदान दिले. आसामच्या दुसर्या डावात देखील अजुनच कमाल करत ४५ धावांत ७ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक व निकाल :
महाराष्ट्र पहिला डाव सर्वबाद ४१५ – पवन शाह २१९, सत्यजित बच्छाव ५२.
आसाम पहिला डाव सर्वबाद – २४८ . सत्यजित बच्छाव – ११.२-३-२५-४.
आसाम दुसरा डाव (फॉलो ऑन नंतर) सर्वबाद – १६०. सत्यजित बच्छाव – २४-७-४५-७.
महाराष्ट्र संघाने एक डाव व ७ धावांनी विजयी .
महाराष्ट्र संघाचा पुढील सामना २४ फेब्रुवारी पासुन विदर्भ संघाशी होणार आहे.
सत्यजितच्या महाराष्ट्र संघासाठीच्या या कामगिरी मुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात, तसेच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांना अतिशय आनंद झाला आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्यजितचे अभिनंदन करून पुढील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.