इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळं जेवण दिल्याच्या कारणावरुन कर्मचा-यांना मारहाण केली. या मारहाणीनंतर त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. त्यानंतर यावर विरोधकांनी थेट त्यांच्या कृतीवर हल्लाबोल करत टीका केली आहे. तर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी हा मुद्दा आज विधानपरिषदेत उपस्थित केला. यावेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर दिले आहे.
आमदार परब यांनी कर्माचा-यांना मारता, हिंमत असेल तर मंत्र्यांना मारा असे सांगत जोरदार टीका करत अशा आमदाराचे निलंबण करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, असं वर्तन योग्य नाही. भाजीला वास येत होता. परंतु मारहाण करणे योग्य नाही. लोकप्रतिनिधींने मारहाण करणे योग्य नाही. अशा मारहाणीमुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. त्यामुळे सभापती यांनी याबाबत काय कारवाई करता येईल याचा निर्णय घ्यावा असे मुख्यमत्री म्हणाले.
तर काँग्रसने हे तेच आमदार महाशय आहेत ज्यांनी संरक्षणासाठी असलेल्या पोलिसाला स्वतःची गाडी धुवायला लावली होती. फडणवीस आपण गृहमंत्री म्हणून यावर काय कारवाई करणार आहात? की नेहमीप्रमाणे असल्या गुन्हेगारांना अभय देणार आहात? असा प्रश्न केला आहे.